मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा मोदी सरकारच्या मागील चार साडेचार वर्षाच्या कार्यकालावर व्यंगचित्रातून टीका केली आहे. केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासूनच्या त्यांनी भारतात काय परिस्थिती निर्माण केली आहे आणि त्यामुळे भारत देशच सध्या आयसीयूमध्ये गेला आहे असं म्हटलं आहे. परंतु, आगामी लोकसभा निवडणुकीनंतरच आता तो शुद्धीवर येईल’, अशी टीका व्यंगचित्राच्या माध्यमातून व्यक्त करण्यात केली आहे.

कालच राज ठाकरे यांनी दिवाळीचं औचित्य साधून व्यंगचित्राची मालिका घेऊन येणार असल्याचे समाज माध्यमांच्या माध्यमातून जाहीर केले होते. त्यातील पहिलं व्यंगचित्र त्यांनी आज धनत्रयोदशीनिमित्त रेखाटले आहे. धनत्रयोदिवशी हा दिवस देशभरात वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. विशेष म्हणजे वैद्यकीय शास्त्राचा देव “धन्वंतरी” ह्याचा जन्मदिवस म्हणून सुद्धा काही लोक हा दिवस महत्त्वाचा मानतात, असे राज ठाकरे यांनी प्रसिद्ध केलेल्या व्यंगचित्रात म्हटले आहे.

या व्यंगचित्रात राज ठाकरेंनी धन्वंतरीचे चित्र सुद्धा रेखाटले आहे. यात भारत ICU मध्ये दाखवण्यात आला आहे. परंतु, धन्वंतरी ICU बाहेर एकत्र जमलेल्या सामान्य लोकांना उद्देशून सांगतात, ‘काळजीचे कारण नाही. गेल्या साडे चार वर्षात त्याच्यावर (म्हणजे भारतावर) खूप अत्याचार झाले आहेत. परंतु, लोकसभा निवडणुकीनंतर येईल शुद्धीवर.’ राज ठाकरेंचे हे व्यंगचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर अनेकजण रिट्वीट सुद्धा करत आहेत.

MNS chief raj thackeray has published first cartoon from the diwali series