महत्वाच्या बातम्या
-
बहुजन वंचित आघाडी ४८ जागा लढवणार, प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा
बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसबरोबरील संभाव्य आघाडी तोडल्याची घोषणा मंगळवारी केली. येत्या १५ तारखेला राज्यातील सर्व ४८ जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. काँग्रेसबरोबरचे सर्व प्रस्ताव संपले, असे त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले.
6 वर्षांपूर्वी -
एका आठवड्यात तब्बल १८० जीआर; ह्याचा अर्थ गेल्या ५ वर्षात भाजपने झोपा काढल्या: जयंत पाटील
मागील केवळ एका आठवड्याभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल १८० जीआर काढले. याचा अर्थ या सरकारने गेल्या ५ वर्षात झोपा काढल्या, अशा शब्दांत एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकावर बोचरी टीका केली आहे. ट्विट करुन जयंत पाटील यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
मुलाच्या भाजप उमेदवारीमुळे विखे-पाटील विरोधी पक्षनेतेपद सोडणार?
नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्यास तयार नसल्याने तिढा वाढत असताना, आता काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील मुलगा सुजय यांच्या उमेदवारीवरून विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. दिल्लीत काँग्रेस श्रेष्ठींच्या दरबारातील बैठकीचा काहीही उपयोग न झाल्याने आता अंतर्मनाचा आवाज ऐकूनच पुढचा निर्णय घ्यावा लागेल, असे हताश उद्गार विखे-पाटील यांनी माध्यमांशी बोलताना काढले.
6 वर्षांपूर्वी -
मोदींच्या गुजरातमधूनच काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराचा प्रारंभ
कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज गुजरातच्या अहमदाबाद शहरात होणार आहे. या बैठकीसाठी कॉंग्रेसने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या होमपिचची निवड केल्याने याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
6 वर्षांपूर्वी -
सर्व वाघांचं शिवसेनेत स्वागत, मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांची घरवापसी
मुंबई – “सर्व वाघांचं शिवसेनेत स्वाग! शिवसेनेत फक्तं वाघच राहू शकतात आणि जो शिवसेनेचा आहे तो सेनेत परत आला आहे” असं म्हणत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांचं पक्षात स्वागत केलं. मी सोनावणेंना म्हटलं होतं शिवसेनेत प्रवेश करा, जुन्नर तर आपलंच आहे, शिरूर तर आपलंच आहे. तुम्ही काही दिवस बाहेर होतात पण तिथे आनंदी होतात का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला त्यावर शरद सोनावणे यांनी नाही असे उत्तर दिले. सोनावणे पक्षाबाहेर होते मात्र त्यांच्या मनात भगवा होता असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
फडणवीसांची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका, पण मोदींबद्दल काय विचार आहेत?
फडणवीसांची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका, पण मोदींबद्दल काय विचार आहेत?
6 वर्षांपूर्वी -
मोदीजी! मसूद अजहरला कोणी सोडलं ते शहिदांच्या कुटुंबियांना सांगावं: राहुल गांधी
पुलवामा हल्ल्यात चाळीस सीआरपीएफ जवानांच्या मृत्यूमध्ये जैश-ए-महंम्मदचा हात असल्याचे उघड झाले आहे. परंतु, त्याला अनुसरून राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. ‘जैश’चा म्होरक्या मसूद अजहरची १९९९ मध्ये भारताच्या कैदेतून सुटका कोणी केली होती, हे मोदींनी पुलवामातील त्या शहीद जवानांच्या कुटुंबियांना सांगावं, असे त्यांनी म्हटले आहे.
6 वर्षांपूर्वी -
राहुल गांधींच्या उपस्थितीत हार्दिक पटेल उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
गुजरातमधील पटेल समाजाच्या आरक्षण देण्यावरून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला आव्हान देणारे हार्दिक पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत उद्या मंगळवारी हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. स्वत: हार्दिक पटेल यांनी ट्विटरवरून अधिकृतपणे याबद्दलची माहिती दिली. गुजरातच्या जामनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूकही लढविणार असल्याची माहिती याआधी काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
फडणवीस सरकार महाराष्ट्र सरकारच्या स्क्रिप्ट गुजरातीत करण्यात व्यस्त
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टीकेला नाव न घेता प्रतिउउतर दिलं. दरम्यान बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की राज ठाकरे यांची स्क्रिप्ट सध्या बारामतीतून येते आणि ते त्याप्रमाणे बोलतात. परंतु, मागील काही महिन्यापासून देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या अनेक निर्णयाचे बारीक निरीक्षण केल्यास ते गुजरातमधून आलेल्या स्क्रिप्टप्रमाणे घेतलेले दिसतील. अगदी त्यात मराठी या राज्य भाषेला देखील सूट देण्यात आलेली नाही.
6 वर्षांपूर्वी -
भारताचे संरक्षण खाते सर्वाधिक भ्रष्ट
देशात सर्वत्र भ्रष्टाचार आहे, परंतु आपले संरक्षण खाते सर्वाधिक भ्रष्ट आहे. राफेल लढाऊ विमानखरेदीतील संशयास्पद करारावरून ही बाब मोठ्या प्रमाणावर अधोरेखित होते, असे मत ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांनी ‘मुंबई कलेक्टिव्ह’च्या परिसंवादात व्यक्त केले.
6 वर्षांपूर्वी -
आघाडीच्या नेत्यांना राजू शेट्टींचा अल्टिमेटम; ३ जागा द्या नाहीतर..
आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावटपासाठी स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी काँग्रेस-एनसीपी’च्या नेत्यांना अल्टिमेटम दिला आहे. लोकसभेच्या हातकणंगले, बुलढाणा आणि वर्धा या ३ जागांसाठी स्वाभिमानी पक्ष आग्रही आहे. आघाडीच्या नेत्यांनी २ दिवसांत याबाबत निर्णय न कळवल्यास स्वाभिमानी पंधरा जागांवर स्वतंत्रपणे उमेदवार रिंगणात उतरवेल, असा इशाराच राजू शेट्टी यांनी दिला आहे. त्यामुळे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते याबाबत काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अगोदरच भारिप बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला महाआघाडीत सामील होण्याविषयी झुलवत ठेवले आहे. त्यांची महाआघाडीत येण्याची शक्यता कमीच दिसत आहे. अशात राजू शेट्टी यांनीही वेगळा मार्ग निवडल्यास महाआघाडीचे स्वप्न भंग पावेल. मात्र, स्वत: काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेच महाआघाडीविषयी पुरते गंभीर नसल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
निवडणूक आयोगाने तंबी दिली तरी भाजपकडून प्रचारात लष्कराच्या जवानांच्या फोटोंचा वापर
लोकसभा निवडणुका आवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. तसेच निवडणुकीच्या तारखा येत्या २ ते ३ दिवसांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच प्रचाराच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. प्रत्येक पक्षाने आपली कंबर कसली आहे. याच अनुषंगाने शनिवारी केंद्रीय निवडणूक आयोगाची एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये प्रचारादरम्यान सैन्याचा वापर करू नका अशी ताकित निवडणूक आयोगाने देशातील विविध राजकीय पक्षांना दिली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देखील निवडणूक आयोगाने असे निर्देश दिले होते. तरी देखील भाजपच्या पोस्टरवर भारतीय लष्कराच्या जवानांचे फोटो बिनधास्त वापरले जात आहेत.
6 वर्षांपूर्वी -
भाजपाला तंबी? प्रचारात लष्कराच्या जवानांचे फोटो वापरू नका: निवडणूक आयोग
लोकसभा निवडणुका आवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. तसेच निवडणुकीच्या तारखा येत्या २ ते ३ दिवसांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच प्रचाराच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. प्रत्येक पक्षाने आपली कंबर कसली आहे. याच अनुषंगाने शनिवारी केंद्रीय निवडणूक आयोगाची एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये प्रचारादरम्यान सैन्याचा वापर करू नका अशी ताकित निवडणूक आयोगाने देशातील विविध राजकीय पक्षांना दिली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देखील निवडणूक आयोगाने असे निर्देश दिले होते.
6 वर्षांपूर्वी -
निवडणुकी दरम्यान पुलवामासारखा हल्ला पुन्हा घडवला जाईल : राज ठाकरे
भारतीय जनता पक्ष लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर युद्धजन्य परिस्थिती निर्माण करेल, हे आधीच सांगितल्याची आठवण करून देत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुलवामा हल्ला, एअर स्ट्राइकवर संशय व्यक्त केला. निवडणुकांआधी आणखी एक हल्ला होण्याची शंका देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. मनसेच्या १३व्या वर्धापन दिनानिमित्त वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात शनिवारी पार पडलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
6 वर्षांपूर्वी -
सर्वोच्च न्यायालयाची मध्यस्थ समितीची भूमिका आश्चर्यकारक : आरएसएस
राम जन्मभूमी-बाबरी मशीद जमीन वादाच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने काल मध्यस्थीसाठी तिघांची नियुक्ती केली. सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश फकीर महम्मद इब्राहिम खलिफउल्ला या मध्यस्थ समितीचे प्रमुख असून त्यात वरिष्ठ वकील श्रीराम पांचू तसेच आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान RSSला सुप्रीम कोर्टाने घेतलेली भूमिका पटलेली दिसत नाही. दरम्यान, देशातील हिंदूंकडे वारंवार दुर्लक्ष केलं जात असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
१३वा वर्धापनदिन: मनसे आगामी लोकसभा निवडणूक पूर्ण ताकदीनिशी स्वबळावर? सविस्तर
मागील सगळ्याच मोठय़ा निवडणुकांमध्ये स्वबळाचा नारा देत आलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे आगामी लोकसभा निवडणूक संपूर्ण ताकदीनिशी स्वबळावर लढण्याच्या विचारात असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून कळते. असं असलं तरी मनसे किती आणि कोणत्या जागा लढवेल, हे अजून स्पष्ट समजू शकलेलं नाही, पण महाराष्ट्र सैनिकांचा ‘जोश’ आणि मनसेच्या मतदारांचा उत्साह विधानसभेपर्यंत कायम ठेवण्यासाठी रिंगणात उतरण्याची तयारी ‘कृष्णकुंज’वर सुरू झाली आहे. या संदर्भातील अधिकृत घोषणा आज मनसेच्या १३ व्या वर्धापनदिनी स्वत: राज ठाकरेच करतील असे समजते. तर ते महाराष्ट्रात काही जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला बाहेरून पाठिंबा देण्याची देखील शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाची काही वेळात पत्रकार परिषद
पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील तणाव अधिकच वाढला आहे. पाकिस्तानकडून सातत्याने सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जातं. तसेच बेजगाम जिल्ह्यामधून एका भारतीय लष्कराचं अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीर भागात प्रचंड भीतीदायक वातावरण पसरले आहे.
6 वर्षांपूर्वी -
निवडणूक इफेक्ट: मुंबईत ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना कर माफ, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकराना निवडणुकीपूर्व मोठा दिलासा मिळणार आहे. स्वयंपुनर्विकास धोरणालाही राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. तसेच, रखडलेले एसआरए प्रकल्प म्हाडाच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
लोकसभा निवडणूक: राज ठाकरेंचा निर्णय विचाराअंती झाला तरी काय असतील परिणाम? सविस्तर
सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच पक्षातील वातावरण तापू लागलं आहे. अनेक पक्षांमधील वाटाघाटी पूर्णत्वाला येऊन ठेपल्या आहेत, त्यात अनेकांनी उमेदवार देखील घोषित करण्यास सुरुवात केली आहे. परंतु, मनसे किव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पक्ष आगामी निवडणुकीत नक्की काय भूमिका घेणार यावर माध्यमांमध्ये चर्चा रंगल्या आहेत. वास्तविक प्रसार माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांना स्वतः राज ठाकरे, अधिकृत प्रवक्ते आणि वरिष्ठ नेत्यांकडून कोणताही दुजोरा मिळालेला नाही आणि त्यामुळे जर तरच्या चर्चांना काहीच अर्थ उरत नाही.
6 वर्षांपूर्वी -
पुलवामा हल्ला मोदी व इम्रान खान यांच्यामधील पूर्वनियोजित मॅच फिक्सिंग: काँग्रेस नेते बी. के. हरिप्रसाद
जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला हा देशाच्या लष्करावर झालेला सर्वात मोठा हल्ला होता. पाकिस्तानातील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जवाबदारी स्वीकारली होती. त्याला भारताने हवाई हल्ला करून चोख प्रत्युत्तर देखील दिलं. परंतु, सदर प्रकरणी काँग्रेस नेत्याने एक धक्कादायक आरोप केला आहे. पुलवामा हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पूर्वनियोजित पणे फिक्स केला होता, असा हा आरोप केला आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN