मुंबई : रणजी करंडक स्पर्धेत विदर्भ संघाने सलग दुसऱ्यांदा इंटिम फेरी गाठली आहे. जलद गोलंदाज उमेश यादवच्या तुफान गोलंदाजीच्या बळावर विदर्भ संघाने हा पराक्रम केला आहे. दरम्यान, उमेश यादव याचे बारा बळी आणि फैझ फझलच्या एकूण ७५ धावांच्या बळावर उपांत्य सामन्यात केरळवर एका डावाने विजय प्राप्त केला. तसेच उमेशने पहिल्या डावात केवळ ४८ धावांच्या मोबदल्यात तब्बल ७ फलंदाजांना तंबूत परतवले. आज पर्यंतच्या इतिहासातील प्रथमश्रेणी क्रिकेटमधील ही त्याची सर्वात उत्तम कामगिरी आहे.
दरम्यान, या सामन्यात उमेशने घेतलेल्या ७ बळींच्या जोरावर विदर्भाच्या संघाने केरळचा पहिला डाव केवळ १०६ धावांवर रोखला. त्यानंतर सलामीवीर फैज फेजलाच्या ७५ धावांच्या जोरावर विदर्भाने एकूण २०८ धावा पूर्ण केल्या. त्यानंतर सुरु झालेल्या दुसऱ्या डावात पुन्हा केरळचा संघ गडगडला. उमेश यादव आणि यश ठाकूरच्या गोलंदाजीच्या जोरावर केरळचा डाव केवळ ९१ धावांत आटोपला. तब्बल १२ फलंदाजांना तंबूत घडणाऱ्या उमेश यादवला सामन्याचा मानकरी म्हणून घोषित करण्यात आले.
