महत्वाच्या बातम्या
-
Uttar Pradesh Lakhimpur Kheri Car Run on Farmers | केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने आंदोलक शेतकऱ्यांवर कार चढविली, २ शेतकऱ्यांचा मृत्यू
काळे झेंडे दाखविणाऱ्या शेतकऱ्यांवर केंद्रीय गृह राज्य मंत्र्यांच्या मुलाने कार चढविल्याने काही जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. यामुळे संतापलेल्या आंदोलकांनी दोन गाड्यांची (Uttar Pradesh Lakhimpur Kheri Car Run on Farmers) जाळपोळ केली आहे. यामध्ये एक पत्रकार देखील जखमी झाला आहे.
3 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेशात महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू | फासाला लटकलेल्या स्थितीत आढळला मृतदेह
प्रयागराज येथील अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांची संशयास्पद मृत्यू झाला आहे. अल्लापूर येथील बाघंबरी या ठिकाणी गळफास लावलेल्या स्थितीत नरेंद्र गिरी आढळले आहेत. गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर एकच खळबळ उडाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | यूपीत धार्मिक षडयंत्र? | मुस्लिम वृद्धाला मारहाण, दाढी कापली, जय श्री राम बोलायला लावलं
उत्तर प्रदेशाच्या निवडणुका जवळ आल्याने यूपीतील धार्मिक तेढ वाढविण्यास काही विकृतांनी सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय. उत्तर प्रदेशाच्या गाझियाबादमध्ये अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. काही तरुणांनी एका वृद्ध मुस्लीम व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यांना ‘जय श्री राम’ बोलण्याची सक्ती देखील केली आहे. जबरदस्तीने त्यांना जय श्री राम बोलायला लावलं. या घटनेचा एक व्हिडीओ देखील समाज माध्यमांवर जोरदार व्हायरल झाला आहे. व्हि़डीओमध्ये काही तरुण वृद्ध व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
ममतादीदी इन ऍक्शन! पाडणार म्हणजे पाडणार | यूपीत निवडणुकीपूर्वी पिके आणि अखिलेश यांच्यात उच्चस्तरीय बैठक
पश्चिम बंगालच्या निवडणुकीत मोदी-शहा यांच्यासहित देशभरातील भाजपाला धूळ चारणाऱ्या ममता बॅनर्जी आता देशभरात मोदी-शहांच्या हात धुवून मागे लागल्याचं पाहायला मिळतंय. भाजप आगामी म्हणजे २०२२ मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेशातील निवडणुकीत पराभूत झाल्यास २०२४ मधील लोकसभा निवडणुकीनंतर देशात सत्तापालट होऊन मोदी पायउतार होतील हे जवळपास निश्चित होणार आहे. तसेच मेहनती आणि आक्रमक स्वभावाच्या तसेच राजकारणाचा दांडगा अनुभव असलेल्या ममतादीदी पंतप्रधान पदाच्या उमेदवार होण्याची शक्यता आता बळावली आहे. परिणामी त्या आक्रमक झाल्या असून संपूर्ण यंत्रणा कामाला लावत असल्याचं दिसतंय.
3 वर्षांपूर्वी -
वाराणसीत काळ्या बुरशीचं थैमान | एकाच इस्पितळात ३२ रुग्णांचा मृत्यू, ३० रुग्णांनी डोळे गमावले | मोदी कुठे व्यस्त होते पहा
उत्तर प्रदेशात आधीच कोरोनाने थैमान घातलेले असताना आता काळ्या बुरशीने देखील हाहाकार माजविण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे मोदींचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत काळ्या बुरशीने अक्षरशः थैमान घातल्याचे पाहायला मिळत आहे.
3 वर्षांपूर्वी -
२०२२ मधील यूपीतील विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये चिंता | मोदी-शहा आणि RSS दरम्यान गुप्त बैठका
सध्या कोरोना आपत्तीमुळे देशात चिंतेचं वातावरण असलं तरी देखील उत्तर प्रदेशात अत्यंत भीषण परिस्थिती असल्याचं पाहायला मिळतंय. कोरोना आपत्तीमुळे उत्तर प्रदेशात हाहाकार मजल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशात २०२२ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहेत आणि कोरोना आपत्ती २०२२ पर्यंत लांबणार असेच संकेत मिळत आहेत. परिणामी भाजप आणि आरएसएस’मध्ये चिंतेचं वातावरण असल्याचं वृत्त आहे.
3 वर्षांपूर्वी -
माँ गंगा ने बुलाय है? गंगा घाटावर हजारो कोरोना मृतदेह पुरले | यूपीतील परिस्थिती भीषण
देशात करोनाने धुमाकूळ घातला आहे. देशात गेल्या २४ तासात ३ लाख ४३ हजार १४४ नवीन रुग्ण आढळले. पण दिलासादायक वृत्त म्हणजे सर्वाधीक रुग्ण बरे होऊण घरी गेले आहेत. ३ लाख ४४ हजार ७७६ रुग्णांनी करोनावर मात केली. तर ४००० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. देशात करोनाची लागण होण्याचे प्रमाण दोन कोटींच्या पुढे गेले आहे. तर करोनामुळे मृत्यूंचा आकडा २.६२ लाखांच्या वर पोहोचला आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO उत्तर प्रदेश | मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेत जमले 20 हजार लोकं | प्रचंड गर्दीसमोर पोलिसही हतबदल
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशात सोमवारी 3 लाख 29 हजार 379 नवीन संक्रमित आढळले, पण 3.55 लाख संक्रमित ठीकही झाले. 62 दिवसानंतर ठीक होणाऱ्या रुग्णांचा आकडा नवीन रुग्णांपेक्षा जास्त आहे. यापूर्वी, 9 मार्चला 17,873 कोरोना रुग्ण आढळले होते, तर 20,643 रुग्ण ठीक झाले होते. दुसरी दिलासादायक बाब म्हणजे, सोमवारी मागील पंधरा दिवसातील सर्वात कमी रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी, 26 एप्रिलला 3.19 लाख रुग्ण आढळले होते. दरम्यान, सोमवारी 3,877 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
3 वर्षांपूर्वी -
यूपीत बलात्काराचं सत्र सुरूच | भदोही जिल्ह्यात दलित महिलेवर सामूहिक बलात्कार
उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार प्रकरणावरुन देशात संतापाची लाट उसळलेली असतानाच उत्तर प्रदेशातीलच भदोही जिल्ह्यात ज्ञानपूर भागात एका ४४ वर्षीय दलित विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना रविवारी समोर आली. पोलिसांनी सांगितले की या महिलेच्या पतीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करुन दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेशात राष्ट्रपती शासन लागू करा | योगींना मठात पाठवून द्या - मायावती
उत्तर प्रदेशात जंगलराज आहे अशी टीका करत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे. हाथरस येथे पीडितेच्या कुटुंबीयांना भेटायला गेल्यानंतर राहुल गांधी यांना ताब्यात घेण्यात आलं त्यानंतर त्यांनी ही ट्विट करत ही टीका केली आहे. उत्तर प्रदेशात जंगलराज आहे. जेव्हा एखादी वाईट घटना घडते तेव्हा आपल्या माणसांना आधार देण्यासाठी आपण जातो. मात्र शोकसागरात बुडालेल्या एका कुटुंबाला भेटायला गेलो तरीही सरकार आम्हाला घाबरवतंय. एवढं घाबरु नका मुख्यमंत्री महोदय या आशयाचं ट्विट करत राहुल गांधी यांनी योगी सरकारवर टीका केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपाचा नारा बेटी बचाओ नाही | तथ्य लपवा आणि सत्ता वाचवा - राहुल गांधी
हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय अथवा विशेष पथकाकडे देण्यात यावा या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते सत्यम दुबे यांनी ही याचिका दाखल केली आहे. सीबीआय अथवा हायकोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील तपास पथकाने याचा तपास करावा अशी मागणी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशऐवजी दिल्ली पोलिसांकडे हा तपास देण्याची मागणी करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
युपीत महिला अत्याचार सुरूच | सामूहिक बलात्कारानंतर दलित मुलीचे पाय तोडले
उत्तर प्रदेशच्या हाथरस येथील दलित मुलीवरील सामूहिक बलात्काराच्या घटनेच्या धक्क्यांतर नागरिक सावरलेलेही नसताना युपीतील बलरामपूरमध्ये आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आणखी एका २२ वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याचं समोर आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांना आझमगड पोलिसांनी ताब्यात घेतले
बसगाव हत्याकांडातील मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी उत्तर प्रदेशात गेलेले राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांना गुरुवारी आझमगड पोलिसांनी ताब्यात घेतले. उत्तर प्रदेश पोलिसांनी आझमगडच्या सीमेवर त्यांची गाडी अडवली. आपल्याला आझमगडमध्ये प्रवेश करुन द्यावा, असे पोलिसांना सांगितले. मात्र, पोलिसांनी यासाठी परवानगी नसल्याचे सांगत नितीन राऊत यांना ताब्यात घेतले. काही दिवसांपूर्वी आझमगडमधील बांसा या गावात दलित सरपंचाची हत्या झाली होती. वाराणसीच्या दौऱ्यावर असलेले नितीन राऊत आज बांसा येथे जाऊन सरपंचाच्या कुटुंबीयांची भेट घेणार होते. मात्र, त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल, असे सांगत पोलिसांनी त्यांना प्रवेश नाकारला.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Best FD Interest Rates | बँक FD वर अधिक व्याजाच्या शोधात आहात? या बँकेत 8.10 टक्केपर्यंत व्याज दर मिळेल
- Reliance Infra Share Price | 2 दिवसात रिलायन्स इन्फ्रा शेअर 36 टक्के घसरला, पण स्टॉकला 'या' प्राईसवर सपोर्ट
- TCS Share Price | TCS शेअर्स पुन्हा उच्चांकी किमतीवर जाऊ शकतात, तज्ज्ञांना स्टॉकच्या मजबूत कामगिरीबद्दल विश्वास
- TRIL Share Price | मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, एका महिन्यात 57% परतावा दिला, तर 1 वर्षात दिला 770% परतावा
- Multibagger Stocks | कुबेर पावला! या शेअरने अवघ्या 1 वर्षात दिला 1528% परतावा, पुढेही मल्टिबॅगर परतावा?
- Rama Steel Share Price | 28 पैशाच्या शेअरने करोडपती, 4 वर्षात 4400% परतावा, 3 वेळा फ्री बोनस शेअर्स, खरेदी करणार?
- Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्समध्ये 2 दिवसात 32% घसरण, स्टॉकमधील पडझड केव्हा थांबणार?
- Bondada Share Price | स्वस्त IPO शेअरने कुबेर पावला! अल्पावधीत दिला 1350% परतावा, गुंतवणुकदार मालामाल
- HMA Agro Share Price | स्वस्त शेअरची कमाल! एका महिन्यात दिला 22 टक्के परतावा, पुढे अजून मालामाल करणार
- Govt Employees Salary | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार आणि ईपीएफ मर्यादा वाढणार, महत्वाची अपडेट आली