9 May 2025 9:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
7/12 Utara | कौटुंबिक जमीनीच्या 7/12 वर तुमचं नाव आहे? वारसा हक्काने 7/12 वर नाव जोडण्यासाठी लागतात ही कागदपत्रं SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Cash Limit At Home | तुम्ही घरामध्ये किती कॅश ठेवू शकता; नियम लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस येईल Cheque Bounce Alert | चेकने पेमेंट करणाऱ्या 90% लोकांना माहित नाही, ही चुका करू नका, सर्वकाही गमावून बसाल EPFO Money Alert | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, तुमच्या खात्यात EPF चे 1,56,81,573 रुपये जमा होणार Horoscope Today | 09 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

राज्यात युतीचे सरकार येण्यास पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळातील कारभार जबाबदार: राज ठाकरे

Raj Thackeray, MNS, CM Prithviraj Chavan

वणी: राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा प्रचार जोरात सुरू आहे. त्यासाठी रोज सभा घेत ते सरकार आणि विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडत आहेत. आज त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी वणीमध्ये झालेल्या प्रचार सभेत सरकारसह विरोधकांवरही टीका केली. पाच वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारभारामुळेच त्यावेळी सत्तेत येण्यासाठी भारतीय जनता पक्ष-शिवसेनेला मदत झाली, असा घणाघाती हल्ला राज ठाकरे यांनी केला. पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळातील कारभाराचा त्यांच्या पक्षालाही काही फायदा झाला नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.

यावेळी त्यांनी विरोधी पक्ष का महत्त्वाचा आहे, हे उपस्थितांना पटवून दिले. महाराष्ट्राला सध्या सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे. त्यासाठीच मी ही निवडणूक लढवत आहे. सगळेच सत्तेत बसले तर तुमच्याबद्दल कोण बोलणार. विरोधी पक्ष कमजोर असल्यामुळेच सत्ताधारी मंडळी वाटेल ते निर्णय घेत आहेत. लोकशाही व्यवस्थेत सगळ्यात महत्त्वाची भूमिका विरोधी पक्षांचीच असते.

“सध्या महाराष्ट्राला एका सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे. अन्यथा तुमचा आवाज कोण मांडणार. सगळेच सत्तेत जाऊन बसले तर तुमच्याबद्दल कोण बोलणार. तुमचा आवाज उठवण्यासाठी मला विरोध पक्षाच्या भूमिकेतून जायचं आहे,” असं सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्याकडे विरोधी पक्षाची जबाबदारी द्यावी असं आवाहन जनतेला केलं आहे. “सत्तेच्या गुळाला सगळे डोंगळे चिकटत आहेत,” असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.

सक्षम, निडर विरोधी आवाज नसलेलं सरकार कुणालाही जुमानत नाही असंही यावेळी त्यांनी सांगितलं. महाराष्ट्राला सध्या एका सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे असं सांगताना विरोधी पक्ष कमकुवत असल्यानेच असे निर्णय घेतले जातात. बहुमत आल्यानतंर जे हवंय तेच केलं जातं असं सांगताना तरीही तीच माणसं पुन्हा सत्तेत येणार असतील तर वरवंटा तुमच्यावरही फिरणार आहे असा इशाराही राज ठाकरेंनी दिला.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या