10 May 2025 9:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पगारदारांनो, या पोस्ट ऑफिसच्या योजनेत 2 लाख रुपये जमा करा, मिळावा 89,989 रुपये निश्चित व्याज Horoscope Today | 10 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 10 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हल जवळ, अपडेट जाणून घ्या - NSE: RTNPOWER IRB Infra Share Price | कंपनीच्या टोल उत्पन्नात वाढ; शेअर प्राईसवर होणार सकारात्मक परिणाम - NSE: IRB NTPC Share Price | एनटीपीसी शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर, मंदीत स्वस्तात BUY करा - NSE: NTPC AWL Share Price | मल्टिबॅगर शेअरमध्ये मोठ्या तेजीचे संकेत, ग्लोबल ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: AWL
x

भाजपच्या १०५ पैकी काही आमदार महाविकास आघाडीच्या संपर्कात - यशोमती ठाकूर

Congress, Minister Yashomati Thakur, BJP MLA, MahaVikas Aghadi

मुंबई, १७ जुलै: राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय वादळ सर्वत्र चर्च आहे. त्यात महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्र सरकार स्थिर असल्याचं त्यांनी म्हटलं असून उलटपक्षी भाजपचे १०५ पैकी काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचं मोठं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं.

भाजपाचे आमदार आमच्या संपर्कात असून त्यांची नावं कळली तर राज्यात भूकंप येईल असा गौप्यस्फोट महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यकारी अध्यक्ष आणि महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सरकार स्थिर असल्याचा विश्वासही व्यक्त केला आहे. आमचे कोणी फुटणार नाहीत असंही त्यांनी म्हटलं आहे. यशोमती ठाकूर यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

सध्या कार्यकर्त्यांकडून सातत्याने विचारलं जात आहे की महाराष्ट्रात काय होईल? मात्र मला सर्वांना सांगायचं आहे की राज्यातलं सरकार स्थिर आहे. कुणी हे स्थिर सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे, असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं. “जर कोणी सरकार अस्थिर करण्याचा किंवा पक्ष सोडण्याचा प्रयत्न केला तर त्याला चांगलं बडवू. आम्ही गांधीवादी आहोत पण दादागिरी किती दिवस सहन करायची. नाठाळांच्या माथ्यावर काठी कशी हाणायची याची शिकवण आम्हाला मिळालेली आहे. तुमची गाठ आमच्ययाशी आहे लक्षात ठेवा,” असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.

यापूर्वीही महाआघाडीचे सरकारच्या नेत्यांनी राजस्थान राजकीय परिस्थिती बिघडली असली तरी महाराष्ट्रातील सरकार हे स्थिर असल्याचं वक्तव्य केलं होतं. कल भाजप नेते नारायण राणे यांनी सामना वृत्तपत्रातून पूर्वी शरद पवारांविरोधात आलेल्या बातम्यांचा उल्लेख केला होता. तर त्यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती. संजय राऊत हे नोकरी जरी सामनात करीत असले तरी ते काम शरद पवारांचं करतात असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

 

News English Summary: BJP MLAs are in touch with us and if their names are known, there will be an earthquake in the state, said Maharashtra Pradesh Congress Committee Executive President and Women and Child Welfare Minister Yashomati Thakur.

News English Title: Congress Yashomati Thakur Bjp MLA Maharashtra Government News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या