26 April 2024 2:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली Bonus Shares | खरेदी करा हा शेअर! फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील, शेअरने 6 महिन्यांत 210% परतावा दिला Post Office Interest Rate | होय! या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, फायद्याचा मोठा व्याज दर
x

कांदा ८० किलो झाला असता आंदोलन व टीका करणाऱ्या या नेत्यांना देश चालविण्याचा अर्थ कळला? सविस्तर

Union Minister Onion High Rates Twit

नवी दिल्ली: आज देशभर कांद्याच्या भावाने १८० किलोच्या आसपास एवढा उच्चांक गाठलेला असताना देशभर मोदी सरकारवर टीका होतं आहे. त्यात काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना लोकांच्या भावना लक्षात घेऊन आणि उपाय योजनावरून संसदेत प्रश्न उपस्थित केला आणि त्यावर ‘मी आणि माझ्या घरात कोणीही कांदा खात नाही’ असं उत्तर देत त्यांच्या बुद्धीच्या विचारशक्तीचा उंची सिद्ध केली.

मात्र विषय केवळ अर्थमंत्री सीतारामन यांच्यापुरता मर्यादित नसून, २०१० मध्ये याच भारतीय जनता पक्षातील अनेक नेत्यांनी कांद्याचे भाव ८० रुपये प्रति किलो झाले असताना रस्त्यावर उतरत मोठा घाम गाळत लोकांच्या भावना तत्कालीन सरकारकडे मांडल्या होत्या. त्यात सध्या मोदींच्या मंत्रिमंडळात असलेल्या स्मृती इराणी यांनी तर कहरच केला होता असं म्हणावं लागेल. एका ट्विटमध्ये त्यांनी ‘सध्या प्राप्तिकर विभाग मोठ्या सौद्यांवर नजर ठेऊन आहे आणि त्यामुळे कांदा खरेदी करू नका’ असं म्हटलं होतं.

त्यानंतर विषय केवळ स्मृती इराणी यांच्या पुरता विषय मर्यादित नव्हता, तर सध्याचे आणि तेव्हाही पंचतारांकित आयुष्य जगणारे कट्टर मोदी भक्त देखील त्याच रांगेत उभं राहून कांद्याच्या किमतीने हैराण झाले होते आणि सरकारवर तुटून पडले होते. मात्र, आज हेच भाजप नेते सामान्य माणसाला शोधूनही सापडणार आणि त्यांना सामान्य माणसासाठी किती प्रामाणिक तळमळ होती हे आजच्या परिस्थितीवरून सिद्ध होतं आहे. देश चालवणं आणि समाज माध्यमांचं अकाउंट चालवणं त्यांना सारख्याच गोष्टी वाटल्या असाव्यात असंच मत व्यक्त करून गप्प पाहत राहण्यापलीकडे सामान्य माणसाच्या हातात दुसरं काहीच नाही.

 

Union Minister Smriti Irani old twit on Onion High Price gone Viral on Social Media

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x