26 April 2024 10:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

अशी सरकारं फार काळ टिकत नाहीत | जेव्हा कोसळेल तेव्हा पर्यायी सरकार देऊ - फडणवीस

Devendra Fadnavis, MahaVikas Aghadi government

मुंबई, ११ नोव्हेंबर: राज्यातलं महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचे दावे भारतीय जनता पक्षाच्या दिल्ली ते गल्लीतील नेत्यांनी केले आहेत. मात्र बिहार मधील सत्ता एनडीएने कायम राखल्यानंतर भाजपच्या नेत्यांना पुन्हा स्वप्नं पडू लागली आहेत. पाच वर्षातील एक वर्ष सरकार पडण्याची वाट पाहिल्यानंतर उरलेल्या ४ वर्षांवर पुन्हा वक्तव्य येण्यास सुरुवात झाली आहे.

बिहारमधील विजयानंतर आता फडणवीस (Maharashtra Opposition Leader Devendra Fadnavis) यांनी राज्यातल्या सत्तापरिवर्तनाबद्दल वेगळी भूमिका मांडली. ‘आम्ही राज्यातल्या सत्तांतराकडे लक्ष ठेवून काम करत नाही. राज्यातलं सरकार एके दिवशी स्वत:च्याच ओझ्यामुळे कोलमडून पडेल. कारण अशी सरकारं फार काळ चालत नाहीत. ज्या दिवशी हे सरकार कोसळेल, त्या दिवशी आम्ही पर्यायी सरकार देऊ,’ असं फडणवीस म्हणाले.

दुसरीकडे, या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP Maharashtra State President Chandrakant Patil) यांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकार विषयी महत्त्वाचे विधान केले. ‘महाराष्ट्रातील सरकार चार वर्षे टिकणार नाही’, असा दावा त्यांनी केला. सरकार पाडण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार नाही. भाजप हा घटना मानणारा पक्ष आहे आणि घटनाविरोधी कोणतेही काम आमच्याकडून होणार नाही. यापुढेही राज्यात एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करत राहणार आहोत, असे पाटील म्हणाले.

 

News English Summary: Leaders of the Bharatiya Janata Party (BJP) from Delhi to the streets have claimed that the Maha Vikas Aghadi government in the state will collapse. However, after the NDA retained power in Bihar, BJP leaders have started dreaming again. After waiting for one year out of five years for the government to fall, statements have started coming again for the remaining four years.

News English Title: State opposition leader Devendra Fadnavis statement on MahaVikas Aghadi government news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x