20 April 2024 12:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

अर्थव्यवस्थेला तब्बल ७ ते ८ लाख कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज

Covid19, Corona Crisis, Indian Economy

नवी दिल्ली, १४ एप्रिल: देशात केंद्र सरकारकडून २५ मार्चपासून राबवण्यात येत असलेले २१ दिवसांचे लॉकडाऊन आज, मंगळवारी संपत आहे आणि तो यापुढे देखील ३ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था पार खिळखिळी झाली असून विश्लेषकांच्या मते, अर्थव्यवस्थेला ७ ते ८ लाख कोटी रुपयांचा फटका बसणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

या लॉकडाऊनदरम्यान बहुतांश कंपन्या बंद राहिल्या. विमानसेवा बंद करण्यात आल्या. रेल्वे जागच्या जागी थांबल्या. दळणवळणही बंद झाले. कोविड-१९ चा फैलाव रोखण्यासाठी २४ मार्चला २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. २५ मार्चपासून या लॉकडाऊनची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यामुळे भारतातील ७० टक्के आर्थिक व्यवहार थांबले.

देशाची अर्थव्यवस्था मंदीसदृश वातावरणातून बाहेर येऊ पहात असताना, तसेच आर्थिक वातावरण सकारात्मक होत असताना करोनाचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली. यामुळे लॉकडाऊन ही काळाची गरज असली तरी, मंदीतून बाहेर येऊ पाहणाऱ्या अर्थव्यवस्थेसाठी चुकीच्या वेळी लॉकडाऊन झाले आहे. यामुळे पुन्हा एकदा २०२०-२१ साठी आर्थिक विकास कमी होणार आहे. या लॉकडाऊनमुळे दरदिवशी देशाचे ३५ हजार कोटींचे (४.६४ अब्ज डॉलर) नुकसान होत असल्याचा अंदाज वर्तवला आहे. आता २१ दिवसांनंतर जीडीपीचे ९८ अब्ज डॉलरने किंवा सुमारे ७.५ लाख कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे.

ऍक्यूट रेटिंग्ज अँड रिसर्च लि.ने यापूर्वी लॉकडाऊनमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला दररोज ४.६४ अब्ज डॉलरचे (३५००० कोटी रुपयांहून अधिक) नुकसान होण्याचा अंदाज वर्तवला होता. याप्रमाणे २१ दिवसांच्या लॉकडाऊनच्या कालावधीत जीडीपीला सुमारे ९८ अब्ज डॉलरचे (७.५ लाख कोटी रुपये) नुकसान होईल.

लॉकडाऊनदरम्यान केवळ आवश्यक सामान, कृषी, खाण, जीवनावश्यक सेवा आणि काही आर्थिक आणि आयटी सेवांना परवानगी दिली होती. सेंट्रम इन्सिट्टयूशनल रिसर्चने म्हटले आहे की, देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याचे संकेत मिळत असतानाच या विषाणूने भारतात शिरकाव केला आहे. यामुळे आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये देशात पुन्हा एकदा आर्थिक विकास दर मंदावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

News English Summary: The 21-day lockdown, which was implemented by the central government in the country from March 25, ends today, Tuesday and has been extended till May 3. The lockdown has worsened the country’s economy and according to analysts, it is estimated that the economy will suffer a loss of Rs 7-8 lakh crore.

News English Title: Story biggest lockdown may have cost rupees 7 to 8 lakh crore of Indian Economy amid Corona virus Crisis Covid19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x