पंजाब : अमृतसरमध्ये ब्रिटिश काळात झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाला आज, १३ एप्रिलला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने याठिकाणी या हत्याकांडातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती वंकय्या नायडू आणि पंजाबचे राज्यपाल शहिदांना श्रद्धांजली वाहणार आहेत.

याचबरोबर, यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी सुद्धा अमृतसमध्ये दाखल झाले आहेत. राहुल गांधी सकाळी ८ वाजता शहीदांना श्रद्धांजली वाहणार आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा राहुल गांधी यांनी अमृतसरमध्ये दाखल झाल्यानंतर येथील सुवर्ण मंदिराला दिली भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह उपस्थित होते.

जालियनवाला बाग हत्याकांडातील शहिदांना राहुल गांधींकडून श्रद्धांजली