महत्वाच्या बातम्या
-
RSS'ची कार्यालये आणि वरिष्ठ पदाधिकारी दहशतवाद्यांच्या रडारवर, सुरक्षेत वाढ
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) नेते आणि त्यांचे कार्यालय दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचा अहवाल गुप्तचर संस्थांनी दिला आहे. जागतिक दहशतवादी संघटना हल्ल्यासाठी आयईडी किंवा आयईडी (व्हीबीआयईडी) चा वापर करु शकतात. या अहवालात दावा करण्यात आला आहे की, हा हल्ला महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान आदी राज्यात होऊ शकतो.
4 वर्षांपूर्वी -
दिल्ली शाहीन बाग: निषेधासाठी तुम्ही रस्ता रोखू शकत नाही, सुप्रीम कोर्टाने ठणकावलं
दिल्लीच्या शाहीन बाग परिसरात नागरिकता दुरुस्ती कायद्याच्या विरोधातील निदर्शनांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने कठोर टिप्पणी केली आहे. कोणीही अशा प्रकारे रस्ता रोखू शकत नसल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. गेल्या दोन महिन्यांपासून अनेक महिला-पुरुष शाहीन बागेत CAA विरोधात आंदोलन करीत आहेत. निदर्शनामुळे दिल्ली आणि नोएडाला जोडणारा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. सद्यस्थितीत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात दिल्ली पोलीस, राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे जाब विचारला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
अॅट्रॉसिटीच्या प्रकरणात विनाचौकशी अटक आणि जामीनही नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्णय
अनुसूचित जाती, जमातींविरोधी अत्याचाराला प्रतिबंधक करणाऱ्या अॅट्रॉसिटी कायद्याच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. या कायद्यातील सुधारणांना सुप्रीम कोर्टाने मंजुरी देत या कायद्यांतर्गत तत्काळ अटक करण्याची तरतूद कायम राहणार असून कोणत्याही व्यक्तीला या कायद्यांतर्गत अंतरिम जामीन मिळणार नाही, असे सुप्रिम कोर्टाने स्पष्ट केले आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे अत्याचार पीडितांसह केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपाला विरोध म्हणजे हिंदूंना विरोध ठरत नाही: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
भारतीय जनता पक्ष म्हणजे हिंदू समाज नाही आणि भारतीय जनता पक्षाला विरोध करणं, म्हणजे हिंदूंना विरोध करणं नाही, असं वक्तव्य संघाचे सरचिटणीस भैय्याजी जोशी यांनी केलं आहे. राजकीय लढाई सुरुच राहणार आहे, त्याला हिंदूंशी जोडू नका, असंही भैय्याजी जोशी बोलताना म्हणाले आहेत. गोव्यातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
यमक जुळणं महत्वाचं? राहुल गांधी मोदींना दंडा मारतील तर आम्ही अंडा मारू: आठवले
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जर पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात ‘दंडा मार’ची भाषा केली तर आम्ही त्यांच्याविरोधात अंडी मारो आंदोलन करु असा इशारा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. राहुल गांधी अशा प्रकारची वक्तव्यं करत असल्यानेच अमेठीतून ते निवडणूक हरले. राहुल गांधी हे स्वतःच काँग्रेस पक्ष कमकुवत करत आहेत. ते अशाच प्रकारे बोलत राहिले तर काँग्रेस पक्ष संपेल अशीही टीका आठवलेंनी केली.
4 वर्षांपूर्वी -
दिल्ली: फिर एक बार केजरीवाल सरकार; मोदी-शहांचा प्रचार कुचकामी
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया संपल्यानंतर आता विविध वृत्तसंस्था आणि सर्वेक्षण संस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे (EXIT POLL) निकाल जाहीर झाले आहेत. त्यानुसार दिल्लीत पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांच्या ‘आम आदमी पक्षाचीच (आप) सत्ता येईल. परंतु, गेल्यावेळच्या तुलनेत त्यांच्या जागांमध्ये घट झाली आहे. याचा थेट फायदा भारतीय जनता पक्षाला मिळाला आहे. तर काँग्रेस पक्षाला गेल्या निवडणुकीप्रमाणे एकही जागा मिळवता आलेली नाही. काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
लोकांना डिजिटल इंडियाची स्वप्नं आणि म्हणे इंटरनेटचा वापर हा मूलभूत हक्क नाही?
काश्मीरमधील इंटरनेटबंदीच्या मुद्यावर सुनावणी झाली असता, इंटरनेटचा वापर हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिला असताना, ‘इंटरनेटचा वापर हा मूलभूत हक्क आहे, हा गैरसमज आहे. प्रत्यक्षात तसे नाही’, असा युक्तिवाद राज्यसभेत माहिती प्रसारणमंत्री रविशंकर प्रसाद यांनी गुरुवारी केला.
4 वर्षांपूर्वी -
राम मंदिर ट्रस्ट'वरून भाजपमध्ये जातीय राजकारण तापलं
नरेंद्र मोदी सरकारने दलित समाजातून कामेश्वर चौपाल यांना ट्रस्टमध्ये सामील केले आहे. त्यामुळे ओबीसीला देखील संधी द्यायला हवी होती. राम मंदिर आंदोलन सर्व हिंदुंनी केले होते आणि त्याचे नेतृत्व सुद्धा ओबीसीने केले आहे. राम मंदिर ट्रस्टमध्ये सरकारकडून दलित समाजातील एका व्यक्तीला स्थान देण्यात आले आहे. मात्र ओबीसी समाजातील व्यक्तीला ट्रस्टमध्ये न घेणे चुकीचे असल्याचे भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी म्हटले आहे. त्यामुळे राम मंदिराच्या ट्रस्टवरून राजकारण तापलं असून त्याला जातीय रंग देण्यास सुरुवात केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
लोकसभेत बेरोजगारी व देशाच्या प्रगतीवर भाष्य करताना राहुल गांधींकडून मोदींचा एकेरी उल्लेख
कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी दिल्लीच्या हौझ काझी निवडणुकीच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या वादग्रस्त विधानावर लोकसभेत शुक्रवारी गदारोळ झाला. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राहुल गांधी यांच्या या वक्तव्यास आक्षेप घेत संपूर्ण सभागृहाने याचा तीव्र निषेध करावा अशी मागणी केली. राहुल यांच्या विधानाचा सभागृहात उल्लेख होताच कॉंग्रेसचे खासदार संतापले.
4 वर्षांपूर्वी -
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांच्या 'ओएसडी'ना लाच घेताना अटक
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचे ‘ओएसडी’ गोपाल कृष्ण माधव यांना लाच घेताना सीबीआयने गुरुवारी रात्री अटक केली आहे. त्यानंतर आरोप प्रत्यारोपवरून दिल्लीतील राजकीय वातावरण तापले आहे.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीस यांची थेट केंद्रीय अर्थमंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता - सविस्तर वृत्त
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत पाठवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना राज्यसभेवर पाठवून त्यांच्याकडे केंद्रीय अर्थ मंत्रीपदाची जबाबदारी द्यावी, असे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटत असून, याबाबत दिल्लीत एक बैठक झाल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. त्यात राज्यात भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये अंतर्गत वाद उफाळून येण्याच्या शक्यतेने भाजपच्या वरिष्ठांनी हे पाऊल उचलून अनेक गोष्टी म्यान केल्याचे समजते.
4 वर्षांपूर्वी -
मध्य प्रदेश सरकारकडून सीएए विरोधातील ठराव मंजूर; राज्यात सेनेच्या अडचणीत वाढ?
देशात यापूर्वी केरळ, पंजाब, राजस्थान आणि पश्चिम बंगाल या राज्यांनी CAA रद्द करण्यात यावा यासाठी ठराव संमत केला होता. आता मध्य प्रदेशच्या मंत्रिमंडळाने देखील CAA विरोधात ठराव संमत केला आहे. हा कायदा भारतीय राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्ष चौकटीला छेद देणारा आहे. म्हणून हा कायदा लवकरात लवकर रद्द करण्याची मागणी मध्य प्रदेशने ठरावाच्या माध्यमातून केली आहे. तत्पूर्वी काही सामनाच्या मुलाखतीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देखील याबाबत आपली भूमिका मांडली आहे आणि त्यात सीएए कायद्याच समर्थन करताना NRC’ला विरोध दर्शविला होता.
4 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडीमुळे फडणवीस राज्यात पुन्हा येणार नसल्याने केंद्रात घेण्याची तयारी; थेट मंत्रीपदी
महाराष्ट्रामध्ये यशाच्या दरवाज्यातून परतलेल्या भारतीय जनता पक्षामध्ये एका मोठ्या संभाव्य बदलाची चाहूल लागली आहे. माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे कदाचित केंद्रामध्ये एक मोठी जबाबदारी घेऊ शकतात अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यात ३० वर्ष जुना मित्रपक्ष म्हणजे शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत सरकार स्थापन करताना पाहण्याची नामुष्की सुद्धा भारतीय जनता पक्षावर ओढवली. त्यात महाविकास आघाडीच्या प्रयोगाने २०२४ मध्ये शिवसेना युपीएच्या गोटात किंवा पवारसोबत तिसरी आघाडी उघडून वेगळीच रणनीती आखू शकतात अशी शंका भारतीय जनता पक्षालाच असल्याचं समजतं.
4 वर्षांपूर्वी -
शाहीनबाग: ५०० रु. प्रतिदिन आणि एक प्लेट बिर्याणी मिळाली होती जाण्यासाठी..पण तुम्ही: गुंजन कपूर
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या शाहीनबाग आंदोलनात बुरखा परिधान करून आंदोलकांवर प्रश्नांची सरबत्ती करणाऱ्या यूट्यूबवरील राजकीय विश्लेषक गुंजा कपूरला महिला आंदोलकांनी घेरून तिची खरी ओळख उघड केल्यामुळे खळबळ माजली होती. दिल्ली पोलिसांनी तिला लगेच ताब्यात घेतले होतं.
4 वर्षांपूर्वी -
मनसे हिंदुत्वाचा झेंडा खांदयावर घेऊन देशभर विस्तार करण्यासाठी तरुणांची राज ठाकरेंना विनंती
२०२४ मधील निवडणुका या हिंदुत्वाच्या मुद्यावर लढल्या जातील अशी सध्याची परिस्थिती सांगते. दरम्यान, मनसेने देखील भगव्याला स्वीकारून नवे बदल केल्याने त्यांना सध्या चांगले येण्याची शक्यता आहे. शिवसेना त्यांच्या कट्टर आणि पारंपरिक विरोधक असलेल्या काँग्रेस-राष्ट्र्वादीसोबत गेल्याने शिवसेनेचा मूळ मतदार प्रचंड नाराज आहे. त्यात अल्पसंख्यांक धार्जिणे निर्णय घेण्यास त्यांना महाविकास आघाडी भाग पाडत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
ब्रेकिंग-न्युज: शाहीन बागमध्ये घुसणारी बुरखाधारी महिला आणि मोदी एकमेकांचे फॉलोअर
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या शाहीनबाग आंदोलनात बुरखा परिधान करून आंदोलकांवर प्रश्नांची सरबत्ती करणाऱ्या यूट्यूबवरील राजकीय विश्लेषक गुंजा कपूरला महिला आंदोलकांनी घेरून तिची खरी ओळख उघड केल्यामुळे खळबळ माजली होती. दिल्ली पोलिसांनी तिला लगेच ताब्यात घेतले होतं.
4 वर्षांपूर्वी -
बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या! प्रवीण तोगडियांची जाहीर मागणी
दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याची मागणी हिंदुत्ववादी नेते प्रवीण तोगाडिया यांनी केली आहे. राम मंदिर आंदोलनात बाळासाहेब ठाकरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी तोगडियांनी केली.
4 वर्षांपूर्वी -
अयोध्येत भव्य राम मंदिर बांधण्यासाठी श्री रामजन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्टची घोषणा
अयोध्येत रामजन्मभूमीवर भव्य राम मंदिर बांधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत आज एक अतिशय महत्त्वाची घोषणा केली. अयोध्येत भव्य आणि दिव्य मंदिर बांधण्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या निर्देशानुसार एका ट्रस्टची स्थापना करण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. श्री रामजन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्ट असं त्या ट्रस्टचं नाव असून सर्व ६७ एकर जमीन या ट्रस्टला दिली जाणार आहे. त्याचबरोबर मशिद बांधण्यासाठी सुन्न वक्फ बोर्डाला ५ एकर जमीन देण्यासाठी कार्यवाही सुरु झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
हिंदू निर्वासितांच्या मुद्द्याआड मुख्यमंत्र्यांचं CAA समर्थन; महाविकास आघाडीत बिघाडी होणार? सविस्तर वृत्त
सध्या देशभर CAA वरून आंदोलनं पेटलेली असताना आणि काँग्रेससहित अनेक पक्ष त्या कायद्याला विरोध करत असताना शिवसेनेने वेगळी भूमिका घेतल्याचे काँग्रेस नाराज होण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा हा एकप्रकारे काँग्रेसला धक्का असल्याचं मानलं जातं आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेकडे काँग्रेस कसं पाहणार ते पाहावं लागणार आहे. कारण CAA अंतर्गत बाहेरील निर्वासित हिंदूंना भारतात नागरिकत्व देणार असल्याने शिवसेनेने स्वतःचा स्वार्थ साधला असून, देशभरातील मुस्लिम समाजाची आणि आंदोलकांच्या भावना दुखावण्याची शक्यता नाकारता येत नाही असं राजकीय तज्ज्ञांना वाटतं. कदाचित हाच संदेश दिल्ली दरबारी पोहोचेल आणि यावरून भाजप देखील शिवसेनेला राजकीय कोंडीत पकडेल अशी शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
२०२४'ला शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात - आ. रोहित पवार
“साहेब अजूनही तरुण आहेत. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढलो तर मराठी माणूस पंतप्रधान पदावर बसल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रासारखीच महाविकास आघाडी देशातही झाली तर आपण पाहिलेलं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. शरद पवार यांच्यावर लोकांचा विश्वास आहे. पवारसाहेब जेव्हा कुठेही जातात तेव्हा सामान्य लोकांना काय पाहिजे ते ओळखून घेतात. साहेबांचा लोकांवर विश्वास आहे. लोकांचा साहेबांवर विश्वास आहे.”असंही रोहित पवार म्हणाले.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल
- Railtel Share Price | रेलटेल शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी सांगितली पुढची टार्गेट प्राईस
- Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर्समध्ये मजबूत तेजी येणार, नवीन अपडेट येताच शेअर्सची खरेदी वाढली
- Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार! झटपट पैसा दुप्पट करणारा शेअर खरेदी करा, संधी सोडू नका
- L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर स्वस्तात खरेदी करा, यापूर्वी 350% परतावा दिला, ऑर्डरबुक मजबूत झाली
- Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल
- Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार?
- Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा
- Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा