महत्वाच्या बातम्या
-
पाकिस्तानातून येणाऱ्या मुस्लिमांना सुद्धा भारत नागरिकत्व देणार: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
संपूर्ण देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलनाचं रान पेटलं आहे. अशातच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मोठं विधान केलं आहे. जर एखादा मुस्लीम पाकिस्तानातून आला तर त्याला नागरिकत्व दिले जाईल. यासाठी कायद्यात तरतूददेखील आहे असं ते म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेश: थरारनाट्य संपलं; सुभाष बाथम मारला गेला; २० मुलांची सुटका
उत्तर प्रदेशमधील फर्रुखाबादमध्ये एका इसमानं ओलीस ठेवलेल्या २० लहान मुलांची अखेर सुखरूप सुटका करण्यात आली आहे. सुटकेच्या कारवाई दरम्यान एनएसजी कमांडोंशी झालेल्या चकमकीत आरोपी सुभाष बाथम मारला गेला आहे. तब्बल ११ तासांनंतर हे थरारनाट्य संपलं असून कारवाईत सहभागी असलेले पोलीस व एनएसजी पथकाला १० लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा उत्तर प्रदेश सरकारनं केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
नरेंद्र मोदी आणि नथुराम गोडसे एकाच विचारसरणीचे: राहुल गांधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नथुराम गोडसे यांच्या विचारधारेत फारसे अंतर नाही. ती एकच आहे, अशा शब्दात काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. नागरिकत्व संशोधन कायदा (CAA) विरोधात केरळच्या वायनाडमध्ये महारॅली आयोजित केली होती. या रॅलीनंतर झालेल्या सभेत राहुल गांधी बोलत होते. वायनाडच्या कलपेटा येथून या महारॅलीला सुरुवात झाली. या महारॅलीत काँग्रेसच्या नेत्यांसह हजारो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.
4 वर्षांपूर्वी -
शर्जीलला हवा इस्लामी भारत; पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती समोर
नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC)च्या विरोधात निदर्शनं करताना चिथावणीखोर भाषण करणारा ‘जेएनयू’चा विद्यार्थी शर्जील इमाम याच्या चौकशीतून धक्कादायक माहिती पुढं आली आहे. ‘शर्जील हा कट्टरतावादी विचारसरणीकडं झुकलेला असून भारत इस्लामी राष्ट्र व्हावं असं मानणाऱ्यांपैकी आहे,’ अशी कबुली त्यानं पोलिसांना दिल्याचं सूत्रांकडून समजतं.
4 वर्षांपूर्वी -
विनोद तावडेंच्या दिल्लीत विराट सभा; महाराष्ट्रात सरकारी शाळा बंद करण्याचा विक्रम
अवघ्या १० दिवसांवर आलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीला भाजपने आता हिंदू-मुस्लीम आणि भारत-पाकिस्तान असाच रंग देण्याची पुरेपूर योजना आखली आहे. त्यात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी आपल्या प्रचारसभेत भाजप समर्थकांना ‘गोली मारो’च्या घोषणा द्यायला उद्युक्त केल्यानंतर, मंगळवारी दिल्लीचे लोकसभेतील खासदार प्रवेश वर्मा यांनीही दिल्लीत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यास आपल्या मतदारसंघातील सरकारी जमिनींवरील सर्व मशिदी हटविण्याची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनवेळा युद्धात पराभूत झालेल्या पाकिस्तानला हरवायला ३ दिवसही लागणार नाहीत, अशी ग्वाही एनसीसीच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना दिली.
4 वर्षांपूर्वी -
माझ्यावर ६ महिन्याची बंदी; पण मोदी एअर इंडियाला कायमची बंदी घालू शकतात: कुणाल कामरा
पत्रकार अर्णब गोस्वामी यांना विमानात डिवचल्याचा व्हिडिओ टाकल्यानंतर कॉमेडियन कुणाल कामरा याच्यावर इंडिगो कंपनीने सहा महिन्यांसाठी विमान प्रवासाची बंदी घातली. त्यानंतर एअर इंडियानेही कुणाल कामरावर विमान प्रवासाची बंदी घातली.
4 वर्षांपूर्वी -
बिहार जेडीयू'त फूट आणि यूपीत ब्रँड 'प्रियांका'; रणनीतिकाराचं मिशन २०२४? - सविस्तर वृत्त
सुधारित नागरिकत्व कायद्यावरून संयुक्त जनता दलाचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी सुरूवीतीपासूनच विरोधाचा सुर आळवला आहे. एवढेच नाहीतर त्यांनी ट्विटकरून सीएए व एनआरसीविरोधात आवाज उठवल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचे जाहीर अभिनंदन देखील केले आहे. आता प्रशांत किशोर यांची कंपनी दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी आम आदमी पार्टीची रणनीती बनवण्याचे काम करत आहे. विशेष म्हणजे त्यांचा पक्ष संयुक्त जनता दल दिल्लीतील निवडणुकीत भारतीय जनता पक्षा’बरोबर आहे.
4 वर्षांपूर्वी -
मला गोळ्या घाला, सांगाल त्या ठिकाणी मी यायला तयार; ओवेसींचं अनुराग ठाकूर यांना प्रतिउत्तर
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ‘देशातील गद्दारांना गोळ्या घातल्या पाहिजे’ असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी त्यांना फटकारले आहे. तसेच ‘तुम्ही मला गोळ्या घाला. त्यासाठी तुम्ही सांगाल त्या ठिकाणी मी यायला तयार आहे.’ असे आव्हान ओवैसी यांनी अनुराग ठाकूर यांना दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपला दिल्लीत धुव्वा उडण्याची भीती? २०० खासदार, ७० केंद्रीय मंत्री, ११ मुख्यमंत्री प्रचारात
अवघ्या १० दिवसांवर आलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीला भाजपने आता हिंदू-मुस्लीम आणि भारत-पाकिस्तान असाच रंग देण्याची पुरेपूर योजना आखली आहे. त्यात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी आपल्या प्रचारसभेत भाजप समर्थकांना ‘गोली मारो’च्या घोषणा द्यायला उद्युक्त केल्यानंतर, मंगळवारी दिल्लीचे लोकसभेतील खासदार प्रवेश वर्मा यांनीही दिल्लीत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यास आपल्या मतदारसंघातील सरकारी जमिनींवरील सर्व मशिदी हटविण्याची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनवेळा युद्धात पराभूत झालेल्या पाकिस्तानला हरवायला ३ दिवसही लागणार नाहीत, अशी ग्वाही एनसीसीच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना दिली.
4 वर्षांपूर्वी -
काय बोलत आहेत? हिंदुस्थानचा युवक हा हिंदुस्थान नाही तर देशही घडवू शकतो: राहुल गांधी
सध्या राहुल गांधी यांच्या काँग्रेसमधील पुन्हा लाँचिंगचा विचार करत असताना त्यांनी पुन्हा चुका करून स्वतःचा हास्य करून घेणारी वक्तव्य करण्यास सुरुवात केली आहेत असंच म्हणावं लागेल. भारताचा युवक हा भारतच नाही तर देशही घडवू शकतो. असं एक कुणालाही बुचकळ्यात पाडेल असं वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं आहे. भारत आणि देश हे दोन्ही वेगळे आहेत का? असा प्रश्न कुणालाही पडावा असंच हे राहुल गांधी यांचं वक्तव्य आहे. जयपूरमध्ये युवा आक्रोश रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या दरम्यान झालेल्या भाषणात राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
देशविरोधी वक्तव्यं भोवलं! जेएनयू स्कॉलर शरजील इमामला अखेर अटक
जवाहरलाल नेहरु विद्यापीठ अर्थात जेएनयूचा स्कॉलर शरजील इमामला अटक करण्यात आली आहे. देशद्रोहाचा गुन्हा दाखल असलेल्या शरजील इमामला बिहारमधील जहानाबाद इथे अटक करण्यात आली. दिल्ली आणि बिहार पोलिसांनी मंगळवारी दुपारी ही संयुक्त कारवाई केली. त्याआधी पोलिसांनी सोमवारी रात्री शरजील इमामचा भाऊ आणि मित्राला ताब्यात घेतलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडीला शंभर दिवस होताच उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार: संजय राऊत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी सरकारला शंभर दिवस पूर्ण होताच अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्वत: याबाबतची घोषणा ट्विटरवरुन केली. “सरकार जोरात कामास लागले आहे. पाच वर्षे पूर्ण करणारच! प्रभू श्रीरामाची कृपा. सरकारला शंभर दिवस पूर्ण होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येस जातील. श्रीरामाचे दर्शन घेऊन पुढील कार्याची दिशा ठरवतील”, असं ट्विट खासदार संजय राऊत यांनी केलं.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO - तानाजी अन भाजप; खा. संभाजीराजे मोदी सरकारवर संतापले
दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी तानाजी सिनेमाला वापर करण्याता आला आहे. या व्हिडीओमध्ये शिवाजी महाराजांच्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जागी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असलेला चेहरा दाखविण्यात आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रभर संताप व्यक्त केला जात आहे. यातच आता खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्वीट करत या व्हिडीओबाबत नाराजी व्यक्त करत, दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
गृहमंत्रालयाच्या उत्तराने गृहमंत्री तोंडघशी; 'तुकडे-तुकडे गँगची माहिती नाही' असं RTI'ला उत्तर
देशात ‘टुकडे-टुकडे गँग’ सक्रिय असल्याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही, असे उत्तर माजी पत्रकार व कार्यकर्ते साकेत गोखले यांनी माहिती अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्नावर गृह मंत्रालयाने दिले आहे. ‘टुकडे-टुकडे गँग’ देशातील अशांततेला जबाबदार आहे, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला होता. या अनुशंगानेच गोखले यांनी अशा गँगबाबत माहिती मागितली होती.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO: हे कसले पॉलिटिकल किडे? मोदी छत्रपती शिवाजी महाराज तर अमित शहा तानाजी
आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची जोरदार तयारी सुरु केली आहे. परंतु दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिटिकल कीडा या ट्विटर हँडलवरुन तानाजी चित्रपटातील दृष्यांना मॉर्फिंग करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा लावण्यात आला आहे. तसेच तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यांवर गृहमंत्री अमित शहा यांचा चेहरा लावण्यात आल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यात वर्तविण्यात येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
जे.पी. नड्डा भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष
भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी जे. पी. नड्डा यांची वर्णी लागली आहे. पक्षाचे राष्ट्रीय निवडणूक अधिकारी राधामोहन सिंह यांनी जे. पी. नड्डा यांच्या नावाची घोषणा केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षासाठी आज दुपारी १२.३० पर्यंत अर्ज दाखल करण्याची वेळ होती. यावेळी जे. पी. नड्डा यांच्याशिवाय अन्य कोणत्याही नेत्याने अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे जे. पी. नड्डा यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
4 वर्षांपूर्वी -
मशिदीत पार पडला हिंदू विवाह, मुस्लीम समाजाचा पुढाकार आणि १० तोळं सोनं दिलं भेट
केरळमधील लोकांनी पुन्हा एकदा सामाजिक भान जपले आहे. रविवारी केरळच्या अलप्पुझामधील एका मशिदीत हिंदू जोडप्याचे रितीरिवाजानुसार लग्न पार पडले. या लग्न समारंभाला मुस्लिम आणि हिंदू समाजाचे लोक उपस्थित होते. या लग्न समारंभाचे आयोजन चेरूवली मुस्लिम जमात मशिदीने केले होते.
4 वर्षांपूर्वी -
सरकारकडे पैशांची कमतरता नसून निर्णय घेण्याचीच हिंमत नाही: नितीन गडकरी
‘देशात योजना राबवण्यासाठी पैशांची कमतरता नसून सरकारमध्ये निर्णय घेण्याचीच हिंमत नाही’, असे वक्तव्य करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारच्या कार्यशैलीवर बोट ठेवले आहे. विविध योजनांवर काम न होण्याची कारणे सरकारची मानसिकता आणि नकारात्मक दृष्टीकोन ही असल्याचेही गडकरी म्हणाले. ते नागपुरात विश्वेश्वरैया राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थेच्या कार्यक्रमात बोलत होते. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्यामुळे मोदी सरकारच्या कार्यशैलीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुस्लिमांचं राहू द्या, आता हिंदू समाजाचे काऊन्सिलिंग करण्याची वेळ आली आहे: संजय राऊत
बेळगातील गोगटे रंगमंदिरात शनिवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी राऊत यांनी काश्मीर प्रश्नावरूनही केंद्र सरकारच्या धोरणावर बोट ठेवले. अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरमधील परिस्थिती सुधारलेली नाही. तेथील बातम्या बाहेर येत नसल्यामुळे ही गोष्ट इतरांना कळत नाही. मात्र, काश्मीरमध्ये अजूनही बंदुकीच्या बळावर गाडा रेटला जात आहे. देशात सुरु असलेल्या या घडामोडींमुळे, हेच हिंदुत्व असल्याचा अनेकांना वाटू लागले आहे. त्यामुळे मुसलमान सोडा आता हिंदू समाजाचेच काऊन्सिलिंग करण्याची गरज निर्माण झाली आहे. आपले काश्मीर म्हणता म्हणता देशाचा एखादा तुकडाच तुटणार नाही ना, असे वाटू लागल्याचे राऊत यांनी सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे - राज ठाकरेंमध्ये राजकीय मतभेद; पण कौटुंबिक नातं कायमचं राहणार: संजय राऊत
बेळगातील गोगटे रंगमंदिरात शनिवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी अनेक विषयावर भाष्य केलं. यावेळी त्यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या भावडांच्या संबंधावर प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिले. ते म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये राजकीय मतभेद आहेत पण त्यांचं कौटुंबिक नातं अजूनही कायम आहे. दोघांच्या वाटा वेगळ्या असतील, त्यांचे विचार वेगळे असतील, पण त्यांचं नातं कायमचं राहणार आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही.’
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल
- Mastek Share Price | 40 रुपयाच्या शेअरची कमाल! तब्बल 4000 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20% वाढला
- Numerology Horoscope | 23 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
- Numerology Horoscope | 22 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल
- Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा
- Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
- Numerology Horoscope | 17 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर उसळी घेणार, दिग्गज ब्रोकिंग तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर
- IPO GMP | लॉटरी लागेल पहिल्याच दिवशी, स्वस्त IPO आला, GMP चा धुमाकूळ, अशी संधी सोडू नका