27 April 2024 5:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

मनसे आणि वंचित महाआघाडीमध्ये असतील तरच स्वाभिमानी येणार : राजू शेट्टी

Raju Shetty, Prakash Ambedkar, Raj Thackeray, MNS, VBA, Swabhimani Shetkari Sanghatana, Maharashtra State Assembly Election 2019

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि हातकणंगलेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाआघाडीबद्दल मोठं विधान केले आहे. राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना, प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी यांचा समावेश असेल तरच स्वाभिमानी महाआघाडीमध्ये सामील होणार असं राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांकडून सध्या मोर्चेबांधणी सुरु आहे. या निवडणुकीत कॉंग्रेस आणि एनसीपीच्या आघाडी करून लढणार आहेत. लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी कॉंग्रेस आणि एनसीपी आघाडीसोबत होते. विधानसभा निवडणुकीविषयी बोलताना त्यांनी ‘लोकशाही टिकवण्यसाठी समविचारी पक्षांनी एकत्र येणं गरजेचे आहे. ‘त्यामुळे महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र असल्यास ते महाआघाडीचा भाग असतील अस विधान केले आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर राजू शेट्टी यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर शेट्टी यांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी राज ठाकरे यांनी कॉंग्रेस आणि एनसीपीला मदत केली होती. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेने आणि स्वाभिमानीसह वंचितही महाघाडीत सामील होऊ शकते.

मात्र राजू शेट्टी यांच्या या विधानाने भविष्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडी यांची वेगळीच आघाडी तर होणार नाही ना, अशी चर्चा राजकीय विश्लेषकांमध्ये पाहायला मिळत आहे. काही दिवसनपूर्वी राजू शेट्टी यांनी कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती, तसेच योग्य वेळी प्रकाश आंबेडकर देखील राज ठाकरे यांची विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भेट घेतील अशी शक्यता वर्तवली होती. त्यामुळे राजू शेट्टी यांच्या आजच्या विधानाला महत्व प्राप्त झाले आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x