29 March 2024 7:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आनंदच होईल : नीलम गोऱ्हे

MLA Nilam Gorhe, Shivsena, Uddhav Thackeray, Maharashtra Assembly Election 2019

मुंबई : विधानसभा निवडणूक जस जशा जवळ येत आहेत तसतशी शिवसेनेतील नेत्यांची रोज निरनिराळी वक्तव्य समोर येत आहेत. अनेकांनी यापूर्वी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्याबाबतर अनेक वक्तव्य केली आहेत. सामान्य मतदार निवडणुकीत कौल कुणाच्या बाजूने देणार आणि पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. अशातच विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यास आपल्याला आनंदच होईल अस वक्तव्य केले आहे.

सोलापुमधील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू म्हणून आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव म्हणून युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधिमंडळात यावे ही आम्हा सर्वांचीच इच्छा आहे, असे मत व्यक्त करतानाच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आनंदच होईल असंही त्या म्हणाल्या आहेत.

दरम्यान, पुढे बोलताना उद्धवसाहेबांचा विश्वास आमच्या दृष्टीने महत्वाचा आहे. राजकारणापासून उदासीन असलेला युवक आदित्य ठाकरे यांच्या कामाकडे आकर्षित होऊन येत आहे. आदित्य यांच्यामध्ये असलेल्या गुणांची ती चुणूकच आहे असे सांगतानाच राज्यातील जनतेच्या युतीकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा पूर्ण करण्यात येतील असेही गोऱ्हे म्हणाल्या.

त्यामुळे शिवसेना भाजपमध्ये युती झाली असली आणि देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा पुढील मुख्यमंत्री होणार हे भाजपने जाहीर केले असले तरी शिवसेनेतील नेत्यांची रोज नवनवीन वक्तव्ये युतीत खोडा घालण्यासाठीच तर नाही ना, अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे जागावाटपात शेवटच्या क्षणी काय होईल ते देखील सांगता येणार नाही असं आजही अनेकांचं मत आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x