29 April 2024 9:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

अन्यथा सरकारचे आदेश झुगारुन मंदिर प्रवेश करु | राज ठाकरेंचा इशारा

MNS Raj Thackeray, CM Uddhav Thackeray, Temple reopening, Marathi News ABP Maza

मुंबई, ३ सप्टेंबर : सरकारने मंदिरं सगळ्यात शेवट उघडून उगाच नको ते पुरोगामीत्व दाखवू नये त्यापेक्षा एक नियमावली आखावी आणि हिंदुजनांच्या मंदिर प्रवेशाचा मार्ग मोकळा करावा. पण तरीही सरकारने जर ह्या विषयी लवकरात लवकर सकारात्मक पाऊल उचललं नाही तर आम्हाला नाईलाजाने सरकारच्या आदेशांना झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल, पण ही वेळ सरकार आमच्यावर येऊ देणार नाही अशी अपेक्षा आहे अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे.

मंदिर हा भक्ती पुरता विषय नाही यावर अर्थव्यवस्था अवलंबून आहे. मॉल, सार्वजनिक कार्यक्रम यासाठी जसे निर्बंध आहेत तसे मंदिराबाबत ही असू द्या. सरकारने लवकर सकारात्मक पाऊल उचलले नाही तर सरकारच्या आदेशाना झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल.

सरकारच्या डोळ्यावर गुंगीची झापड आल्याने त्यांना हिंदू भाविकांचा कंठशोष दिसत नसल्याची टीका राज ठाकरेंनी केलीय. मंदिर सुरु करणं हा विषय केवळ देवापुरता मर्यादीत नाही. याला जोडून देखील एक अर्थव्यवस्था असते. मंदिरात सेवा करणारे पुजारी, गुरव हे त्यावर अवंलंबून असतात. सर्वात शेवटी मंदिर उघडून सरकारने उगीच पुरोगामीत्व दाखवू नये. त्याआधीच नियमावली आखून हिंदुंच्या मंदिर प्रवेशाचा मार्ग मोकळा करावा.

राज ठाकरे यांनी पत्रात काय म्हटलं आहे?
“अनलॉक क्रमांक अमुक तमुक अशा अनलॉक प्रक्रियेचे अनेक टप्पे सुरु आहेत, मॉल्स उघडले जात आहेत. सार्वजनिक कार्यक्रमातील लोकांची उपस्थिती १०० करण्याची परवानगी दिली जात आहे. आणि या सगळ्यात भक्तांची आणि देवांची ताटातूट सुरुच आहे, असं का ? या सरकारला मंदिरं उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे?,” असा सवाल राज ठाकरेंनी विचारला आहे.

“करोनामुळे जेव्हा अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प होते तेव्हा मंदिरं बंद ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयाचं आम्हीदेखील समर्थन केलं होतं. पण आज जेव्हा दैनंदिन जीवन सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु असताना नेमकी महाराष्ट्रात देवळं का बंद ठेवली जात आहेत? जर मॉल आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी सरकार निर्बंध शिथील करताना काही नियमांची चौकट आखून देऊ शकते तर तशीच गोष्ट मंदिर प्रवेशासाठी देखील असू द्या,” असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

पुढे त्यांनी लिहिलं आहे की, “लॉकडाउनच्या काळात आषाढीची वारी असो, गोपळकाल्याचा उत्स्व असो की गणेशोत्सव असो..राज्यातील हिंदू बांधवांनी कमालीचं सामंजस्य दाखवलं आहे. सरकारच्या आदेशाचं अत्यंत समजूतदारपणे पालन केलं आहे. उद्या मंदिर उघडली तर या राज्यातील माझा हिंदू बांधव आखून दिलेले नियम काटेकोरपणे पाळेल याची मला खात्री आह,” असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

 

News English Summary: The government should not open the temples at the end of all and show progress, but should make a rule and pave the way for Hindus to enter the temples. But still, if the government does not take positive steps in this regard as soon as possible, we will have to enter the temple in defiance of the government’s orders.

News English Title: MNS Raj Thackeray Letter To Maharashtra CM Uddhav Thackeray Over Temple Opening Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x