हिंसाचाराचे संकट तीव्र होणार? मणिपूरप्रमाणे संपूर्ण ईशान्य भारतात लाव्हा भडकतोय, मिझोराम आणि आसाममध्ये वातावरण तापलं
Manipur Effect in Northeast | दोन महिन्यांहून अधिक काळ पेटलेली मणिपूरमधील आग अद्याप ही आटोक्यात आलेली नाही. दरम्यान, ही आग विझवण्याचे प्रयत्न झाले नाहीत, तर ईशान्य भारतातील इतर भागातही ही आग पसरेल, असा इशारा आता तज्ज्ञांकडून दिला जात आहे. ३ मेपासून मणिपूरमधील कुकू आणि मैतेई यांच्यात सातत्याने हिंसक संघर्ष सुरू आहे. सुमारे १५० जणांना आपला जीव गमवावा लागल्याचे सरकारी आकडेवारी सांगते, पण वास्तविक आकडा मोठा असल्याचं म्हटलं जातंय.
10 महिन्यांपूर्वी