अजित दोवालांमुळे नव्हे, भारतीय लष्कर अधिकाऱ्यांच्या ३० जूनचा चर्चेचं फलित - चीन परराष्ट्र मंत्रालय

बीजिंग, ६ जुलै : गलवान खोऱ्यात चीनने घुसखोरी केली असल्याचे समोर आल्यानंतर तणाव वाढला होता. त्यातच १५ जून रोजी भारत-चीनच्या जवानांमध्ये हिंसक संघर्ष झाला. त्यात २० भारतीय जवान शहीद झाले होते. त्याच्या परिणामी दोन्ही देशांमधील तणावात आणखी वाढ झाली. तणाव कमी करण्याच्या उद्देशाने आता पर्यंत दोन्ही देशांदरम्यान लष्करी अधिकारी पातळीवर अनेक बैठका झाल्या आहेत.
तर, दुसरीकडे चीन सरकारच्या मालकीचे ‘ग्लोबल टाइम्स’ने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कमी झाला असल्याचे म्हटले आहे. भारत आणि चीनचे सैन्यांनी फ्रंट बॉर्डरहून सैन्य कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही देशांमध्ये ३० जून रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार हे सैन्य माघारी घेण्यात आले आहेत. कमांडर पातळीवरील बैठकीत दोन्ही देशांनी तणाव कमी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याआधारे ही कृती करण्यात येत आहे. भारताने चीनसोबत शांतेचे धोरण ठेवले पाहिजे आणि आपले सैन्य कमी करायला हवे, असे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे.
China and India have made progress coming up with effective measures for frontline troops to disengage and deescalate the border situation at the third commander-level talks between the two militaries on June 30, said FM spokesperson Zhao Lijian. https://t.co/zQehtHIUok pic.twitter.com/wFys0FLgyB
— Global Times (@globaltimesnews) July 6, 2020
दरम्यान, ३० जूनला झालेल्या कोअर कमांडर स्तरावरील बैठकीमध्ये पडताळणीची प्रक्रिया देखील ठरवण्यात आली होती. यात एक पाऊल उचलल्यानंतरच पुरावे पाहून दुसरे पाऊल उचलले जाईल असे ठरवण्यात आले होते. या पडताळणीसाठी तीन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. शिवाय गस्ती पथक देखील प्रत्यक्षात पाहणी करेल. जेव्हा अशी पडताळणी होईल, तेव्हाच दुसरे पाऊल उचलले जाणार असल्याची माहिती भारतीय लष्करातील अधिकाऱ्याने दिली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) दोन्ही देशांच्या सैन्याने रिलोकेशनवर आपली सहमती दर्शवली आहे. अशा प्रकारची घटना भविष्यात होऊ नये यासाठी आता गलवान खोरे आता बफर झोन झाले आहे.
मागील महिनाभर भारतीय लष्कराचे वरिष्ठ अधिकारी आणि चीन लष्कराचे अधिकारी यांच्यात तणाव कमी करण्यावरून चर्चा सुरु होती आणि त्यानिमित्ताने अनेक बैठका देखील पार पडल्या होत्या. ३० जून रोजीची बैठक देखील त्याचाच भाग होती. असं असताना याविषयात अचानक प्रकाश झोतात आलेले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सध्या भारतीय प्रसार माध्यमांच्या केंद्रस्थानी आले असून त्यांनी काल रविवारी रात्री चीनच्या प्रतिनिधींसोबत फोनवर चर्चा केली आणि चीन राजी झाला अशा बातम्या प्रसारित होऊ लागल्या आहेत, मात्र चीनने त्यांना भारताचे सुरक्षा सल्लागार म्हणून माहिती दिली आहे. मात्र तणाव निवळण्यावर आणि २ किलोमीटर पर्यंत चिनी सैन्य मागे घेण्याचं कारण ३० जून रोजी भारतीय सैन्याचे वरिष्ठ अधिकारी आणि चिनी सैन्याचे अधिकारी यांच्यात झालेल्या सकाराम्तक चर्चेचं फलित असल्याचं स्वतः चीनच्या परराष्ट्र खात्याने सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समध्ये स्पष्ट केलं आहे.
#Chinese State Councilor and FM Wang Yi had phone conversation with #Indian National Security Advisor Ajit Doval on Sunday night. The two sides reached a positive consensus on China-India border dispute: FM pic.twitter.com/dqJDuWb1XJ
— Global Times (@globaltimesnews) July 6, 2020
News English Summary: China and India have made progress coming up with effective measures for frontline troops to disengage and deescalate the border situation at the third commander-level talks between the two militaries on June 30, said FM spokesperson Zhao Lijian.
News English Title: China and India have made progress coming up with effective measures for frontline troops to disengage and deescalate the border situation News latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
TCS Share Price | टाटा ग्रुपचा शेअर मालामाल करणार, केव्हाही बिनधास्त करावा असा शेअर - NSE: TCS
-
Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Infosys Share Price | आयटी शेअरबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा जाणून घ्या - NSE: INFY
-
NTPC Green Energy Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, मिळेल मजबूत परतावा - NSE: NTPCGREEN
-
Vodafone Idea Share Price | धमाल होणार, पेनी स्टॉक प्राईसवर होणार असा सकारात्मक परिणाम - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY