26 April 2024 9:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

ती जागा राम जन्मभूमीच, आता सरकारने कायदा बनवावा : मोहन भागवत

नागपूर : अयोध्येतील त्या विवादित जागेवर राम मंदिरच होते. आणि ती भूमी रामल्लाचीच आहे. कारण तिथे केलेल्या उत्खननात सुद्धा राम मंदिराचे अवशेष सापडले आहेत. तसेच कोर्टाच्या प्रक्रियेला फार विलंब होत आहे. त्यामुळे अयोध्येतील त्या विवादित जागेवर राम मंदिर उभारणीसाठी केंद्र सरकारने तसा कायदा करावा, अशी थेट मागणी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी हुंकार सभेत केली. तसेच आता राम मंदिराच्या कायद्यासाठी देशभरात जनजागृती करण्याचे थेट आवाहान सुद्धा आरएसएस प्रमुखांनी यांनी केले.

विहिंप’ने आयोजित केलेल्या हुंकार सभेला आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी संबोधित केले, त्यावेळी भाष्य करताना ते म्हणाले की, ‘हा देश रामाचा आहे. बाबर हा आपल्या देशाचा नव्हता, तर प्रभू राम आपला आहे. त्यांचे भव्य मंदिर त्या ठिकाणी बनणार नाही मग कसे होणार. देशातील हिंदू समाज प्रत्येकाचा नितांत आदर करतो. म्हणूनच या निर्माणासाठी तीस वर्ष लागत आहेत. राम जन्मभूमीबाबत कोर्टाची प्राथमिकता आहे,असे आम्हाला वाटत नाही. परंतु, सर्वाना वाटते राम मंदिराचे निर्माण लवकरात लवकर सुरु व्हावे. पण इथे कोर्टात साधी सुनांवणी सुद्धा सुरु होत नाही. आणि जनहितासाठी हा मुद्दा टाळत राहणे देशासाठी योग्य नाही, असं ते म्हणाले.

पुढे आरएसएस प्रमुख म्हणाले की, “अयोध्येतील त्या विवादित जागेवर केलेल्या खोदकामा दरम्यान राम मंदिर असल्याचे आधीच सिद्ध झाले आहे. त्यामुळे याविषयी लवकरात लवकर ठोस निर्णय होणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच न्यायव्यवस्थेतील विलंबास टाळणे गरजेचे आहे. २०१० साली कोर्टाने न मागता जागेची वाटणी सुद्धा केली.” असा थेट आरोप सुद्धा आरएसएस प्रमुखांनी न्यायव्यवस्थेवर केला.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#RSS(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x