29 April 2024 8:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

मोदींच्या त्या वक्तव्याने त्यांनी सरदार पटेलांच्या कर्तुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं?

नवी दिल्ली : स्वातंत्र्याच्या काळात भारतातील नेत्यांकडे शहाणपण नसल्यामुळे पंजाबमधील तीर्थस्थळ कर्तारपूर हे पाकिस्तानात गेले, असे सांगत पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेलांच्या कर्तुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. तसेच नरेंद्र मोदी स्वतःला सर्वेश्रेष्ठ नेता सिद्ध करण्यासाठी गांधी, पटेल आणि इतर नेत्यांना खालच्या पातळीवर घेऊन जाऊ शकतात, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्षांनी मोदींवर निशाणा साधला.

राजस्थानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका प्रचार सभेत काँग्रेसवर टीका करताना मोदी म्हणाले होते की, स्वातंत्र्याच्यावेळी कर्तारपूर हे पाकिस्तानमध्ये गेले. कारण त्यावेळच्या काँग्रेस नेत्याकडे दूरदृष्टी आणि शीख समाजाच्या भावनांची कदर नव्हती. दरम्यान त्या टीकेला राहुल गांधी अचूक पकडत मोदींना लक्ष केलं आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x