मला 100% खात्री आहे! पुलवामा हल्ला मोदींनी निवडणुकीत खुर्ची वाचवण्यासाठी केलेला राजकीय स्टंट होता, CRPF शहीद जवनाच्या वडिलांचा गंभीर आरोप
Politics Behind Pulwama Attack Exposed | जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी नुकत्याच ‘द वायर’ला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या धक्कादायक खुलाशाच्या पार्श्वभूमीवर २०१९ च्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या ४० जवानांच्या कुटुंबीयांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
शहीद जवानांपैकी भगीरथचे वडील परशुराम यांनी द वायरशी बोलताना सांगितले की, 14 फेब्रुवारी 2019 च्या दुर्दैवी दिवसापासून त्यांना अनेक प्रश्न सतावत आहेत. जम्मू काश्मीरचे तत्कालीन राज्यपाल आणि भाजपचे वरिष्ठ नेते सत्यपाल मलिक यांच्या खुलाशांमुळे पुलवामा हल्ला हा मोदी सरकारचा मोठा राजकीय स्टंट होता, या विश्वासाला पुष्टी मिळाली आहे. परशुराम पुढे म्हणतात, “मला 100 टक्के विश्वास आहे की हे मोदी सरकारने सत्तेत राहण्यासाठी केले गेले आहे आणि मोदी सरकारने खुर्ची मिळवण्यासाठी (लोकसभा निवडणुकीत पुन्हा निवडून येण्यासाठी) हे सर्व रचले असा गंभीर आरोप केल्याने खळबळ माजली आहे.
शहीद जवान भगीरथचे वडील परशुराम
घटनेच्या दिवशी काय घडले हे सांगताना त्यांनी सुमारे २०० किलो स्फोटकांनी भरलेले वाहन कुठूनही बाहेर येऊन जवानांना घेऊन जाणारी बस कशी उडवू शकते? असा सवाल केला. शहीद जवान भगीरथचे वडील परशुराम यांनी संतापाने विचारले की, “त्यावेळी पंतप्रधान कुठे होते? ते झोपले होते का?”. दुसरीकडे, मलिक यांनी करण थापर यांची मुलाखत घेतल्यानंतर विरोधकांनी गुप्तचर यंत्रणेच्या अपयशाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून उत्तर देण्याची मागणी पुन्हा सुरू केली आहे.
शहीद जवान जीतराम यांचे बंधू विक्रम
पुलवामा दहशतवादी हल्ला मोदी सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे आणि निष्काळजीपणामुळेच झाला असून केंद्रीय गृहमंत्रालयाने जवानांना एअरलिफ्ट केले असते तर जीव वाचू शकला असता, अशी टीका मलिक यांनी केली होती. आपल्या सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे जीव गमवावा लागला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितल्यावर आपल्याला गप्प राहण्यास सांगण्यात आले होते, असेही माजी राज्यपालांनी म्हटले होते. मलिक जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते, जिथे तेव्हा राष्ट्रपती राजवट लागू होती. दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जीतराम यांचे बंधू विक्रम आपल्या भावाच्या अकाली मृत्यूची चौकशी करण्याची मागणी करत आहेत. मृत्यूसमयी त्यांचा शहीद भाऊ ३० वर्षांचा होता.
शहीद जीतराम यांचे बंधू विक्रम ‘द वायरशी’ बोलताना म्हणाले की, भावाच्या मृत्यूमुळे त्याचे कुटुंब अजूनही दु:खी आहे. ज्यांनी कुटुंबातील एक सदस्य गमावला आहे त्यांनाच माहित आहे की कसे वाटते,” ते म्हणाले. मात्र, ते पुढे म्हणाले की, घटनेच्या वेळीच सत्यपाल मलिक यांनी बोलायला हवे होते.
शहीद जवान रोहिताशचे कुटुंब
अजून एक शहीद जवान रोहिताशचे कुटुंबही तितकेच व्यथित झाले असून या घटनेनंतर अनेक वर्षे उलटूनही ते दु:खात जगत आहेत. मोदी सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे आपल्या भावाचे जे झाले ते ऐकून इतर सैनिकांच्या जीवाची चिंता वाटते, असे रोहिताशचा भाऊ जितेंद्र सांगतो. जितेंद्र यांनी म्हटले की, ‘त्या सैनिकांसोबत जे घडलं ते दुसऱ्या कुणासोबत ही घडू नये. केंद्रीय गृहमंत्रालयाने या विमानाची सैन्य वाहून नेण्याची विनंती नाकारायला नको होती. सैनिकांच्या मागण्या पूर्ण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. सत्यपाल मलिक हे असे व्यक्ती आहेत की ते कुणालाही घाबरत नाहीत आणि ते जे काही बोलतात ते बरोबर आहे, असा विश्वास शहीद जवानाच्या भावाने व्यक्त केला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: After Jammu and Kashmir former governor Satyapal Malik revelations CRPF Jawans killed in Pulwama.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल
- Mastek Share Price | 40 रुपयाच्या शेअरची कमाल! तब्बल 4000 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20% वाढला
- Numerology Horoscope | 23 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
- Numerology Horoscope | 22 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल
- Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
- Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा
- Numerology Horoscope | 17 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर उसळी घेणार, दिग्गज ब्रोकिंग तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर
- IPO GMP | लॉटरी लागेल पहिल्याच दिवशी, स्वस्त IPO आला, GMP चा धुमाकूळ, अशी संधी सोडू नका