30 April 2024 1:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | IRFC सह हे टॉप 10 शेअर्स खरेदी करा, ट्रेडिंग व्हॉल्यूम विक्रम तोडत आहेत, मोठी कमाई होईल IREDA Share Price | PSU IREDA शेअर्स श्रीमंत करू शकतात, अवघ्या 5 महिन्यात दिला 440% परतावा, खरेदी करणार? Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स आता सुसाट तेजीच्या दिशेने, तज्ज्ञांकडून स्टॉक सपोर्ट लेव्हल सह टार्गेट प्राइस जाहीर Infosys Share Price | इन्फोसिस आणि TCS सह 7 IT शेअर्स मालामाल करणार, मिळेल 39 टक्केपर्यंत परतावा SBI Mutual Fund | अशी म्युच्युअल फंड योजना निवडा, अवघ्या 25 हजार रुपयांची गुंतवणूक देईल 16 लाख रुपये परतावा Guru Rashi Parivartan | 'या' 4 भाग्यवान राशींमध्ये तुमची राशी आहे? 1 मे पासून गुरू रशिपरिवर्तन नशीब बदलणार Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
x

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आनंदच होईल : नीलम गोऱ्हे

MLA Nilam Gorhe, Shivsena, Uddhav Thackeray, Maharashtra Assembly Election 2019

मुंबई : विधानसभा निवडणूक जस जशा जवळ येत आहेत तसतशी शिवसेनेतील नेत्यांची रोज निरनिराळी वक्तव्य समोर येत आहेत. अनेकांनी यापूर्वी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्याबाबतर अनेक वक्तव्य केली आहेत. सामान्य मतदार निवडणुकीत कौल कुणाच्या बाजूने देणार आणि पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. अशातच विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यास आपल्याला आनंदच होईल अस वक्तव्य केले आहे.

सोलापुमधील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू म्हणून आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव म्हणून युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधिमंडळात यावे ही आम्हा सर्वांचीच इच्छा आहे, असे मत व्यक्त करतानाच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आनंदच होईल असंही त्या म्हणाल्या आहेत.

दरम्यान, पुढे बोलताना उद्धवसाहेबांचा विश्वास आमच्या दृष्टीने महत्वाचा आहे. राजकारणापासून उदासीन असलेला युवक आदित्य ठाकरे यांच्या कामाकडे आकर्षित होऊन येत आहे. आदित्य यांच्यामध्ये असलेल्या गुणांची ती चुणूकच आहे असे सांगतानाच राज्यातील जनतेच्या युतीकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा पूर्ण करण्यात येतील असेही गोऱ्हे म्हणाल्या.

त्यामुळे शिवसेना भाजपमध्ये युती झाली असली आणि देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा पुढील मुख्यमंत्री होणार हे भाजपने जाहीर केले असले तरी शिवसेनेतील नेत्यांची रोज नवनवीन वक्तव्ये युतीत खोडा घालण्यासाठीच तर नाही ना, अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे जागावाटपात शेवटच्या क्षणी काय होईल ते देखील सांगता येणार नाही असं आजही अनेकांचं मत आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x