3 May 2024 7:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

धक्कादायक! फडणवीस सरकारच्या काळात राज्यात जातीय तणाव वाढला: पोलीस खात्याचा अहवाल

Hindu Muslim Riots, dalit riots, CM Devendra Fadanvis, Hindu Violence

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील जातीय तणावाचा धक्कादायक अहवाल पोलीसांनी निवडणूक आयोगाला दिला आहे. त्यामुळे फडणवीस सरकारची गोची झाल्याचं म्हटलं जातं आहे आणि विशेष म्हणजे स्वतः फडणवीस यांच्याकडेच गृहखातं असल्यामुळे अडचणीत अधिकच भर पडली आहे. दरम्यान पोलिसांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या अहवालात फडणवीस सरकारच्या काळात राज्यातील जातीय तणाव वाढलं असल्याच समोर आलं आहे. त्यानुसार हिंदु-मुस्लिम तणावाची जागा मागील ५ वर्षात सवर्ण-अनुसूचित जातींमधील तणावाने घेतली असल्याचं दिसत आहे.

त्यामुळे फडणवीस सरकारच्या काळात राज्यातील भीषण परिस्थितीचं वास्तव उघड्यावर आलं आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला होता. त्यात पोलीस खात्याने निवडणूक आयोगाला थेट राज्यातील कायदा आणि सुव्यस्थेसंदर्भात एक सादरीकरणच केल्याचे वृत्त आहे. ज्यामध्ये राज्यातील हिंदू-मुस्लीम तणावाची जागा मागील ५ वर्षात सवर्ण-अनुसूचित जातींमधील तणावाने घेतल्याचा अहवाल पोलिस खात्याने निवडणूक आयोगाला दिला.

या अहवालानुसार, हिंदू-मुस्लीम धर्मियांतील तणावासाठी राज्यातील ८ जिल्हे संवेदनशील आहेत. तर त्या तुलनेत सवर्ण-अनुसूचित जातींमधील तणाव असलेले १४ जिल्हे आहेत. पालघर, ठाणे, पुणे, सोलापूर, अहमदनगर, बुलढाणा, वाशिम आणि औरंगाबाद हे जिल्हे मुस्लिम आणि हिंदु धर्मियातील तणावाच्या घटनांसाठी संवेदशील आहेत. तर मागील काही वर्षात राज्यात हिंदु-मुस्लिम तणावापेक्षा सवर्ण-अनुसूचित जातींमधील तणाव राज्यात वाढला आहे.

त्यामुळे सर्वत्र सुशासनाचा जागावाज करणारं फडणवीस सरकार तोंडघशी पडल्याचं म्हटलं जातं आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पोलीस खात्यानेच हा अहवाल दिल्याने विरोधकांच्या हाती आयतंच काहीतरी चालून आल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x