29 April 2024 12:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

केंद्राने सुरुवातीला भारतातील कोरोना लस परदेशात पाठवली, त्यामुळे भारतात तुटवडा निर्माण झाला - उपमुख्यमंत्री

Vaccination

मुंबई, १ मे | सुरुवातीच्या काळात भारतात तयार होणारी कोरोनाची लस केंद्र सरकारने परदेशात न पाठवता आपल्याच नागरिकांसाठी वापरली असती तर आज कोरोना लसींची कमतरता जाणवली नसती, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. महाराष्ट्राने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी 12 कोटी लसींचे डोस मागितले आहेत. मात्र, आतापर्यंत आपल्याला फक्त 3 लाख डोस मिळाले आहेत. त्यामुळे सुरुवातीपासूनच वेगाने लसीकरण करण्याचा मनसुबा राज्य सरकारला अंमलात आणता येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले.

ते शनिवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी लसीकरण वाढवण्यासाठी राज्य सरकार सिरम आणि परदेशी कंपन्यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले. केंद्र सरकारने परवानगी दिल्यास आम्ही फायझर, स्पुटनिक, मॉडर्ना या परदेशी कंपन्यांच्या लसीही विकत घेऊ शकतो. तसेच 12 कोटी लसींच्या खरेदीसाठी महाराष्ट्र सरकार सिरम किंवा भारत बायोटेकला एकरकमी पैसे देण्यासही तयार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राज्यातील एकूण कोरोनास्थिती तसेच उद्यापासून देशभरात सुरु होणाऱ्या लसीकरणावर मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी काल (३० एप्रिल) फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. आज (१ मे ) महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देत त्यांनी या संवादला सुरुवात केली.

तसेच, आजपासून म्हणजेच १ मे महाराष्ट्र दिनापासून १८ ते ४४ या वयोगटाच्या सगळ्यांच्याच लसीकरणाला सुरुवात होणार आहे. केंद्राकडून लसीचा साठा येत आहे. आणि जसजशी लस उपलब्ध होत राहील तशी ही संख्या वाढवणार आहोत. यावेळी उद्धव ठाकरेंनी लसीकरण सेंटरला कोविड सेंटर करु नका अशी विनंतीही केली आहे. पुढे ते असंही म्हणाले की, ही पहिली लस आहे शेवटची नाही. त्यामुळे संय्यम बाळगण्याची विनंतीही केली आहे.

 

News English Summary: Deputy Chief Minister Ajit Pawar said that if the corona vaccine made in India in the early days had been used by the central government for its own citizens without being sent abroad, there would have been no shortage of corona vaccines today.

News English Title: State deputy CM Ajit Pawar criticized Modi govt over exporting corona vaccine in initial stage news updates.

हॅशटॅग्स

#AjitPawar(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x