27 April 2024 4:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

सिने कलाकारांसह दिग्दर्शकांचं भाजपाला मतदान न करण्याचं आवाहन

BJP, Narendra Modi, Amit Shah

मुंबई: देशातल्या तब्बल शंभरपेक्षा अधिक सिनेमेकर्सनी भारतीय जनता पक्षाविरोधात मतदान करण्याचं आवाहन सामान्यांना केलं आहे. सदर विषयाला अनुसरून त्यांनी एक जाहीर निवेदन देखील प्रसिद्ध केलं आहे. आर्टिस्ट युनायटेड इंडिया अंतर्गत हे सर्व फिल्ममेकर्स एकत्र आलेत. प्रसिद्ध डॉक्युमेन्ट्री मेकर्स आनंद पटवर्धन यांच्यापासून जुजे फिल्मचा दिग्दर्शक मिरांशा नाईकपर्यंत जवळपास १११ लोकांनी भाजपा विरोधात मतदान करण्याच्या पत्रकावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जास्तीत जास्त गळचेपी व्हायला लागली असा खळबळजनक आरोप या सर्वांनी केला आहे. तसेच समाजात आणि विशेष करून हिंदू-मुस्लिमांमध्ये प्रचंड तेढ वाढवणे, मागासवर्गीयांवर होणारा अन्याय, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे होणारे दुर्लक्ष आणि सेन्सॉरशीपच्या नावाखाली उगाच होणारी गळचेपी ही या आमच्या विरोधाची प्रमुख कारणं आहेत. सरकारच्या अशा अघोरी धोरणाविरोधात आवाज उठवणे हा गुन्हा ठरत आहे. असा आवाज उठवणाऱ्यांना देशद्रोही ठरवलं जातंय असं या कलाकारांचं म्हणणं आहे. भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी लोकसभा निवडणूक ही अखेरची संधी आहे. त्यामुळे लोकांमध्ये जागृती करण्याची गरज असल्याचं आर्टिस्ट युनायटेड इंडियाचं म्हणणं आहे.

सर्वात महत्वाचं म्हणजे संबंधित पत्रकात भाजपा सरकारकडून सैन्यदलाच्या शौर्याचा केला जात असलेला गैरवापर यावर चिंता व्यक्त करण्यात आलीय. देशात उगाच युद्धाचं वातावरण तयार करणं, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक संस्था नेस्तनाबूत करणे, देशात विज्ञानविरोधी वातावरण तयार करणे, ज्या व्यक्तींचा कला, संस्कृती आणि विज्ञानाशी काहीही संबंध नाही अशा लोकांना महत्त्वाच्या पदावर बसवणे आणि देशाचं हसू करुन घेणं.

कलात्मकतेवर खासकरुन सिनेमा आणि पुस्तकांवर बंदी किंवा सेन्सॉरशीप आणणं, जेणेकरुन लोकांना चांगल्या विचारांपासून परावृत्त करणे हे सर्व भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यापासून जाणीवपूर्वक होतंय असं या पत्रकात म्हटलं आहे. त्यामुळे भाजपाला रोखण्यासाठी लोकसभा निवडणूक ही अखेरची संधी आहे, असं आर्टिस्ट युनायटेड इंडियाचं म्हणणं आहे. त्यामुळे लोकांमध्ये जास्तीत जास्त जणजागृती करण्याची नितांत गरज आहे. याविरोधात आता आवाज उठवला नाही तर देश असंभवाच्या गर्तेत लोटला जाईल आणि होणारं नुकसान पिढ्यानपिढ्या भरु शकणार नाही असं आर्टिस्ट युनाएटेड इंडियाचं म्हणणं आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x