Farm Bills | नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांना गुलाम बनवणार - राहुल गांधी
![The New Agriculture Laws, farmer Bills, Bharat Bandh, Rahul Gandhi, Marathi News ABP maza](https://www.maharashtranama.com/wp-content/uploads/the-watchman-is-a-thief-and-we-will-prove-it-rahul-gandhi.jpg?v=0.941)
नवी दिल्ली, २५ सप्टेंबर : देशात अनेक ठिकाणी नव्या कृषी विधेयकाविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. तर दुसरीकडे देशातील प्रमुख विरोधी पक्ष कॉंग्रेसनं शेतकर्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी या विधेयकावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. नवे कृषी कायदे हे शेतकऱ्यांना गुलाम बनवतील, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
“एका चुकीच्या वस्तू आणि सेवा करानं सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) संपवलं. आता नवे कृषी कायदे आपल्या शेतकऱ्यांना गुलाम बनवतील,” अशी टीका राहुल गांधी यांनी केली. राहुल गांधी यांनी ट्वीट करत सरकारवर निशाणा साधला. तर दुसरीकडे प्रियंका गांधी यांनीदेखील सरकारवर निशाणा साधला. “शेतकऱ्यांना कंत्रीटी शेतीद्वारे अब्जाधीशांचं गुलाम बनवण्यास प्रवृत्त केलं जाईल. यामुळे ना शेतकऱ्यांना मोबदला मिळेल, ना सन्मान. शेतकरी आपल्याच शेतात कामगार होईल, भाजपाचं कृषी विधेयक ईस्ट इंडिया कंपनीची आठवण करून देत आहे. आम्ही हा अन्याय होऊ देणार नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
A flawed GST destroyed MSMEs.
The new agriculture laws will enslave our Farmers.#ISupportBharatBandh
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 25, 2020
दुसरीकडे केंद्र सरकारने शेतकरी आणि कामगार विरोधी जे कायदे संमत केले आहेत त्याचा विरोध आम्ही देशभर करणार असल्याचे कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. लोकसभा आणि राज्यसभेत केलेले कायदे शेतकरी आणि कामगार विरोधी असून कृषी उत्पन्न बाजार समिती मोडीत काढण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केलाय.
कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकर्यांची फसवणूक होत नव्हती. मात्र बाजार समिती मोडून ही व्यवस्था व्यापाराच्या हातात देण्यात आली आहे. यामुळे शेतकर्यांना हमी भाव मिळणार नाही. कंत्राटी शेतामध्येही शेतकर्यांची फसवणूक होणार आहे. काँग्रेसने कामगार कायद्यात जे कामगारांना हक्क देण्यात आले होते, ते सगळे काढून टाकण्यात आल्याचेही थोरात यावेळी म्हणाले.
या संदर्भात २८ सप्टेंबरला राज्यपालांची भेट घेतली जाणार आहे. २ ऑक्टोबरला राज्यात सर्व ठिकाणी धरणे आंदोलन करणार असून जागोजागी किसान मेळावे घेणार असल्याचे थोरात यावेळी म्हणाले. २ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर राज्यातील शेतकर्यांची सह्यांची मोहीम घेतली जाणार आहे.
News English Summary: Congress leader Rahul Gandhi on Friday attacked the Narendra Modi government over the three farm bills that were passed in Parliament during the Monsoon Session, saying it will “enslave farmers”. His comments came as several farmers’ outfits intensified their agitation against the legislations and began a nationwide protest. Opposition parties, including the Congress, have extended support to the call of Bharat Bandh.
News English Title: The New Agriculture Laws Will Enslave Our Farmers I Support Bharat Bandh Says Congress Former President Rahul Gandhi Priyanka Gandhi Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | तज्ज्ञांकडून सुझलॉन शेअरसाठी 'BUY' रेटिंग, कमाईची संधी, आली फायद्याची अपडेट
-
HAL Share Price | PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची मोठी संधी, शॉर्ट टर्ममध्ये दिला 221% परतावा
-
Credit Card Application | होय! इन्कम-प्रूफ नसेल तरी मिळेल क्रेडिट कार्ड, हे आहेत सोपे आणि सुरक्षित पर्याय
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, फायदा घ्या
-
Lotus Chocolate Share Price | रिलायन्स ग्रुपच्या कंपनीचा शेअर श्रीमंत करतोय, 5 वर्षांत दिला 4000% परतावा
-
Home Loan Alert | नोकरदारांनो! वयाच्या 40 व्या वर्षी गृहकर्ज घेताय? या 5 गोष्टींची विशेष काळजी घ्या, अन्यथा...
-
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्ता वाढ होणार, आकडेवारीबद्दल अपडेट आली
-
ITR Filing | पगारदारांनो! ITR डेडलाईन चुकल्यास केवळ दंडच नव्हे, तर 'हे' 5 नुकसान देखील होणार
-
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8'व्या वेतन आयोगाची घोषणा होणार, वेतन-पेन्शन-भत्त्यांमध्ये वाढ
-
Tanla Share Price | मल्टिबॅगर तानला शेअरबाबत फायद्याची अपडेट, खरेदीला गर्दी, 2 दिवसात 15% परतावा दिला