27 April 2024 10:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

कृषी कायदे फक्त अंबानी-अदानी यांच्या सारख्या मोठ्या लोकांसाठी आणले आहेत - बच्चू कडू

New farm law, Modi government, minister Bachchu Kadu, Farmers Protest

मुंबई, १२ डिसेंबर: कृषी कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी पंजाबच्या सात जिल्ह्यांमध्ये सुमारे एक हजार गावातून 1,500 हून अधिक वाहनं येणार आहेत. त्यापैकी 1,300 ट्रॅक्टर-ट्रॉली दिल्लीकडे येणार आहे. किसान मजदूर संघर्ष समितीने दिलेल्या माहितीनुसार, पंजाब आंदोलकांनी त्यांचा एक नवीन काफिला तयार केला आहे. जो रविवारी दिल्लीच्या सीमेपर्यंत दाखल होणार आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात विविध राज्यातले शेतकरी बांधव तसंच शेतकरी संघटना एकवटल्या आहेत. हे कायदे रद्द करावेत या मागण्यासाठी दिल्लीत हजारो शेतकरी तळ ठोकून आहे. दरम्यान या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू आंदोलनास्थळी पोहोचले होते.यावेळी बोलताना त्यांनी मोदी सरकारने हे कायदे फक्त अंबानी-अदानी यांच्यासारख्या मोठ्या लोकांसाठी आणले आहे. यामुळे हे कायदे रद्द करणे सरकारला कठीण होत आहे, असा आरोप बच्चू कडू यांनी केला.

कालची रात्र पलवल बॉर्डरवर येथे घालवली, जेष्ठ समाजसेविका मेधाताई पाटकर यांचे मार्गदर्शन लाभले. केंद्र सरकारने पारित केलेल्या नव्या कायद्याची काहीच गरज नाही. सरकारकडून हे कायदे शेतकऱ्यांवर जबरदस्तीने लादले जात आहेत. जर सरकारला हे कायदे लागू करायचे होते, तर त्यांनी पहिले शेतकऱ्यांशी सल्लामसलत करायला हवे होते, असे देखील बच्चू कडू यांनी सांगितलं.

 

News English Summary: Meanwhile, Minister of State for Maharashtra Bachchu Kadu had reached the site of the agitation to support the agitation. Speaking on the occasion, he said that the Modi government has brought these laws only for big people like Ambani-Adani. This is making it difficult for the government to repeal these laws, alleged Bachchu Kadu.

New English Title: There is no need for a new farm law passed by the Modi government said minister Bachchu Kadu News updates.

हॅशटॅग्स

#BacchuKadu(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x