16 April 2024 4:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IDFC First Bank Share Price | बँक FD असा परतावा देणार नाही! पण या बँकेचा शेअर अल्पावधीत देईल 50 टक्केपर्यंत परतावा Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! या टॉप 3 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत 57 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरमध्ये मोठी घसरण होणार? गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं? अपडेट आली Lloyds Metal Share Price | कुबेर कृपा करणारा 11 रुपयाचा शेअर, गुंतवणूकदार 3 वर्षात करोडपती झाले, खरेदी करणार? TCS Share Price | तज्ज्ञांकडून टीसीएस शेअर्सला 'ओव्हरवेट' रेटिंग, जाहीर केली मजबूत टार्गेट प्राईस Ambuja Cement Share Price | अदानी ग्रुपचा सिमेंट शेअर! कंपनीने नवीन अपडेट दिली, शेअर 35 टक्के वाढणार Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सची ट्रेडिंग रेंज 20-30 रुपये मध्ये अडकली, सकारात्मक बातमीनंतर तज्ज्ञांनी काय म्हटलं?
x

नाहीतर आत्महत्याग्रस्त शेतकरी भावाच्या अस्थी ‘मातोश्री’वर पाठवणार: शेतकरी कुटुंबीय

Shivsena, Udhav Thackeray

उस्मानाबाद : भावाने आत्महत्या करुन ४ दिवस झाले. मात्र अजून देखील पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. पोलीस अधीक्षकांना देखील निवेदन देऊन आलो. परंतु, सगळ्यांना लोकसभा निवडणूक महत्वाची वाटते. जर सदर प्रकरणी पोलिसांनी आणि स्थानिक प्रशासनाने योग्य कारवाई केली नाही, तर भावाच्या अस्थी थेट मातोश्रीवर आणि जिल्हाधिकाऱ्यांना पाठवणार, असा गर्भित इशाराच उस्मानाबादमधील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.

मराठवाड्यातील आठही लोकसभा मतदार संघात प्रचाराचा धुरळा उडत असताना शेतकरी आत्महत्येची ही घटना घडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मराठवाड्यात अनेक ठिकाणी जाहीर प्रचारसभा झाल्या. परंतु, त्यांनी या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांची साधी सदिच्छा भेट देखील घेतली नाही. याविषयी बोलताना राज ढवळे म्हणाले, आत्महत्या झाल्यानंतर पोलिसांनी अद्याप गुन्हा नोंदवला नाही. गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह पोलीस स्टेशनसमोर ठेवण्याचा सल्ला नातेवाईकांनी दिला होता. परंतु, सध्या लोकसभा निवडणुकीचा काळ असल्यामुळे अधिकाऱ्यांना त्रास नको म्हणून आम्ही थोडं सबूरीनं घेतलं. परंतु, मागील ४ दिवस पोलीस स्टेशनमध्ये फेऱ्या मारून देखील कोणतीही दखल घेतली जात नाही.

याप्रकरणी सोमवारी उस्मानाबाद पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन कारवाई करण्याची विनंती केली आहे. तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी यांनी संबधित अधिकाऱ्यांना सुचना दिल्यास तातडीने कारवाई होऊ शकते. येत्या काही दिवसांमध्ये कोणतीच कारवाई झाली नाही, तर भावाच्या अस्थी पोलीस स्टेशनमध्ये विसर्जित करेल. तसेच उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर आणि जिल्हाधिकाऱ्यांनाही पाठवणार, असा इशाराच त्यांनी दिला. भावाचा जीव तर घेतलाच आहे, बदनामी कशासाठी करताय?, असा सवालही त्यांनी विचारला. माझी राजकीय भूमिका तुम्हाला माहीत असताना एवढी गलिच्छ पातळी तुमच्या जवळचे लोक गाठतील असे मला वाटले नव्हते, असेही त्यांनी म्हटले आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x