5 May 2024 8:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

काँग्रेसचा एकही आमदार पक्ष सोडायचे धाडस करणार नाही...आणि केल्यास

MLA Balasaheb Thorat, Congress

मुंबई: आमचा कोणताही आमदार पक्ष सोडायचे धाडस करणार नाही, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला. सध्या राज्यात सत्तास्थापनेवरून सुरु असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती वाटते का, असा प्रश्न विचारण्यात आला.

त्याला उत्तर देताना बाळासाहेब थोरात यांनी म्हटले की, आमदार फुटतील अशी भीती आम्हाला अजिबात वाटत नाही. कारण, राज्यातील जनमत हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे. त्यामुळे कोणताही आमदार फुटण्याचे धाडस करणार नाही. यानंतरही कोणी तशी हिंमत केलीच तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिघेजण मिळून त्या आमदाराचा पराभव करतील, असा सज्जड इशारा बाळासाहेब थोरात यांनी दिला.

आतापर्यंत भारतीय जनता पक्षानं सत्ता स्थापन करायला हवी होती, पण असं होताना दिसत नाही आहे. कारण भारतीय जनता पक्षा आपल्या मित्रांना सांभाळू शकत नाही, याला जबाबदार भारतीय जनता पक्षाच आहे”, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. जर भारतीय जनता पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा किंवा अध्यक्षांचा पराभव झाल्यास तो सरकारचा पराभव समजला जातो, असं म्हणत विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून थोरातांनी भारतीय जनता पक्षाला सूचक इशारा दिला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान असून, काळजीवाहू सरकारनं जनतेची काळजी घ्यावी, असा सल्ला थोरातांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा पेच निकालच्या १२ दिवसानंतरही सुटलेला नाही. शिवसेनेने वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. तर शिवसेनेने चर्चेची दारं बंद केल्याने भाजपानेही वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. जर सरकार स्थापनेचा दावा भाजपाने केला नाही तर राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x