महत्वाच्या बातम्या
-
मागील २४ तासांत १८१ पोलिस कोरोनाबाधित; तर ३ पोलिसांचा मृत्यू
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशात आपल्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस अधिकारीही कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. राज्यात गेल्या २४ तासांत तब्बल १८१ पोलीस करोनाबाधित झाले आहेत. तर ३ पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत २ हजार २११ पोलीस करोनाबाधित झाले आहेत तर यात २४९ पोलीस अधिकारी आणि १ हजार ९६२ पोलीस कर्मचारी करोना संक्रमित आहेत.
5 वर्षांपूर्वी -
सद्याच्या स्थितीत तरी शाळा लगेच सुरु करणं अत्यंत अवघड - मुख्यमंत्री
देशात सर्वाधिक कोरोना रुग्णांची ही महाराष्ट्रात आहे आणि विशेष म्हणजे त्यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यात मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये अत्यंत बिकट परिस्थिती आहे. त्यामुळे लॉकडाउनमध्ये राज्यातील शाळा बंद असून त्या पुन्हा सुरु होणार की नाही ? याबाबत पालकांच्या अनेक संभ्रम आहे. याबाबत स्पष्ट करताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळा लगेच पुन्हा सुरु करणं सध्यातरी अवघड दिसत असल्याचं म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यातील सुमारे ५ IAS, IPS अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण
राज्यातील काही मंत्र्यांना, पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचं ताजं असताना आता प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. राज्यातील सुमारे ५ आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली, या अधिकाऱ्यांवर सध्या विविध रुग्णालयात उपचार सुरु आहे. कोरोना संकट काळात पोलीस, डॉक्टर्स याप्रमाणे प्रशासकीय अधिकारीही जीव धोक्यात घालून काम करत आहे.
5 वर्षांपूर्वी -
पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच असल्याने प्रशासनाची चिंता वाढली
कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. पुणे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यात नव्याने ७५ रुग्ण सापडल्याने बाधितांचा आकडा सात हजाराच्या घरात पोहोचण्यास मदत झाली आहे. तर मृतांची एकूण संख्या ३०० वर पोहोचली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राहुल गांधी आणि आदित्य ठाकरेंचा फोनवरून संवाद; सेना-काँग्रेस जवळीक वाढली
राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडीमधील पक्ष विशेषतः काँग्रेस नाराज असल्याने सारे काही आलबेल नसल्याची चर्चा सुरु असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यात बुधवारी फोनवरून चर्चा झाली. त्यामुळे महाविकास आघाडीतील तणाव निवळला असल्याचे समजते. तर मुख्यमंत्र्यांपाठोपाठ राहुल गांधी यांनी महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशीही फोनवरून संवाद साधला. यावेळी राहुल गांधी यांनी महाराष्ट्र सरकारच्या कामाचे कौतुक केले.
5 वर्षांपूर्वी -
राज्यातील युवकांवर फडणवीसांचा अविश्वास..मग केंद्राच्या स्किल इंडीयातून काय साधलं? - जयंत पाटील
मुंबईत १० हजार वेगळे बेड्स उपलब्ध होतील. रुग्णांची संख्या वाढली तर तशी व्यवस्था सज्ज आहे. महाराष्ट्राच्या प्रश्नांविषयी चिंता व्यक्त करताना राज्य सरकारने केलेल्या कामावर केवळ टीका करण्याचे काम फडणवीसांनी केले. सर्व मजुर बाहेर गेले आहेत आणि आपल्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होईल. महाराष्ट्रातील तरुणांमध्ये हे स्किल नाही असे फडणवीस म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
दहावीचा रद्द झालेल्या भूगोल पेपरचे गुण कसे देणार? बोर्डाकडून स्पष्टीकरण
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे इयत्ता दहावीचा भुगोलाचा पेपर रद्द करण्यात आला होता. पण दहावीचा निकाल लावताना रद्द झालेल्या भुगोलाच्या पेपरचे गुण कसे देणार असा प्रश्न पालकांना पडला होता. त्यावर राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाने महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना भूगोल विषयाचे सरासरी गुण देण्यात येणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रातील संकटाच्या काळात काँग्रेस प्रत्येक निर्णयात सरकारसोबत; राहुल गांधीची ग्वाही
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यामध्ये फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
खासगी रुग्णालयांमधील ५० टक्के परिचारिकांचे राजीनामे; सरकारच्या अडचणीत वाढ
राज्यातील अनेक रुग्णालयातील परिचारिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे परिचारिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणीक वाढतच आहे. खासगी रुग्णालयांसाठीदेखील अत्यावश्यक सेवा कायदा (मेस्मा) लागू केला आहे. या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयांमधील परिचारिका काम सोडून जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
Fact-Check: मुंबई-पुणे पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याची अफवा आणि खोटा मेसेज
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याचा सोशल मीडियावरून व्हायरल झालेला मेसेज खोटा असून ती केवळ अफवा आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा खोट्या मेसेजवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात आले आहे. तसेच असे खोटे मेसेज फॉरवर्ड करु नयेत अन्यथा संबंधित सोशल मीडिया ऍडमिनवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात कोरोनाचे नवे २०९१ रुग्ण; एकूण ऍक्टिव्ह रुग्ण संख्या ३६००४ - आरोग्यमंत्री
महाराष्ट्रात आज २०९१ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ९७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांची महाराष्ट्रातली संख्या ५४ हजार ७५८ इतकी झाली आहे. राज्यात सध्या ३६ हजार ४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात कोरोनाचे ८० टक्के रुग्ण लक्षणं नसलेले आहेत - मुख्य सचिव
महाराष्ट्रात कोरोनाचे ८० टक्के रुग्ण लक्षणं नसलेले आहेत अशी माहिती मुख्य सचिव अजॉय मेहता यांनी दिली आहे. तसंच सध्याच्या घडीला महाराष्ट्रात ३५ हजार १७८ ऍक्टिव्ह केसेस आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. तर महाराष्ट्रात कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचं प्रमाण हे पाचवरुन १४ दिवसांवर आलं आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
केंद्र सरकारची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न – देवेंद्र फडणवीस
कोरोनाच्या काळात केंद्र सरकार महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र असं असताना महाराष्ट्रासोबत अन्याय केला जात असल्याची भूमिका तयार केली जात आहे. खोटा प्रचार करून केंद्र सरकराची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रकार परिषदेत केंद्र सरकारचू भूमिका मांडत सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात १५ हजार ७८६ रुग्णांची कोरोनावर मात; तर ३५,१७८ रुग्णांवर उपचार सुरू
देशासह राज्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे. सोमवारी राज्यात नव्या २ हजार ४३६ रुग्णांची भर पडली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता ५२ हजार ६६७ वर पोहोचली आहे. तर काल दिवसभरात १ हजार १८६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत राज्यात १५ हजार ७८६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या ३५ हजार १७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
5 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडी सरकार मजबूत आहे, चिंता नसावी – संजय राऊत
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल सकाळी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर सायंकाळी ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झाले. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत हेदेखील उपस्थित होते. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना मोठे उधाण आले असून सरकारच्या स्थिरतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
5 वर्षांपूर्वी -
पुणे: कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णासाठी डब्यातून जेवणासोबत दारू सुद्धा पाठवली
देशात महाराष्ट्र अद्यापही पहिल्या क्रमांकावर असून याठिकाणी काल दिवसभरात ३,०४१ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर एकट्या मुंबईत कोरोनाचे १७२५ नवे रुग्ण आढळले. यासोबत राज्याने ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर मुंबईतील करोना रुग्णांची संख्या ३० हजाराच्या पुढे गेली आहे. राज्यात ५८ नव्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या १६३५ झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाबाधित मंत्र्यांना अँब्युलन्स, इस्पितळ आणि बेड्स वेळेवर; सामान्यांचा वाली कोण?..सविस्तर
काँग्रेस नेते राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना करोनाची लागण झाली आहे. रविवारी त्यांना नांदेडमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मुंबईत अशोक चव्हाण यांच्यावर पुढील उपचार होणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
सावध राहा! राज्यात ७२% कोरोना रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसत नाहीत
देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त प्रकरणं महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रामध्ये ७१ टक्के लोकांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. त्यातही राज्यातील बहुतेक प्रकरणांमध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसत नाहीत. अशी माहिती इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्चच्या (ICMR) सूत्रांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्य सरकारकडे डॉक्टर-नर्सेसची कमतरता; मदतीसाठी केरळ सरकारला पत्र
राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत रविवारी ३ हजार रुग्णांची भर पडली. दिवसभरात ३०४१ जणांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ५०,२३१ इतकी झाली आहे. यात सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ३३,९८८ इतकी आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी -
मग ह्यापुढे महाराष्ट्रात येताना आमची, महाराष्ट्राची आणि पोलीसांची परवानगी घ्यावी लागेल
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्य सरकार राज्याबाहेर काम करणाऱ्या मजुरांच्या सामाजिक सुरक्षेसाठी कठोर नियमांचा समावेश असलेले धोरण तयार करणार असल्याचे सांगितले आहे. रविवारी योगींनी ही माहिती दिली. यापुढे दुसऱ्या राज्यांना उत्तर प्रदेशमधील व्यक्तींना कामावर ठेवायचे असेल तर त्यासाठी उत्तर प्रदेश सरकारची परवानगी घ्यावी लागेल असं ही योगींनी स्पष्ट केलं. यासंदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिलं आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH
-
Mazagon Dock Share Price | मल्टिबॅगर शेअर रेकॉर्ड हाय लेव्हलवर, आता मोठ्या तेजीचे संकेत, टार्गेट अपडेट - NSE: MAZDOCK
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL