महत्वाच्या बातम्या
-
घरपोच दारु विक्रीसाठी राज्य सरकारची योजना
कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन सुरू आहे त्यामुळे काही ठिकाणी खासगी दवाखाने बंद आहेत अशा परिस्थितीत नागरिकांना आरोग्य विषयक तपासणी, सल्ला घेताना येणारी अडचण लक्षात घेऊन ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सेवा सुरू करण्यात आली आहे. राज्यात प्रायोगिक तत्वावर सुरू झालेली ही सेवा पूर्णपणे सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी www.esanjeevaniopd.in या संकेतस्थळाला रुग्णांनी भेट देऊन तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
KDMC - त्या ७ गावांतील कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णालय द्यावं, आ. राजू पाटील यांची मागणी
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र निळजे अंतर्गत येणाऱ्या निळजे, घेसर, नांदिवली, गोळ्वली, हेदुटणे, काटई, कोळेगाव या ७ महसुली गावांना जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत केवळ आरोग्य सुविधा पुरविण्यात येत आहेत. परंतु सद्यस्थितीत या ७ महसुली गावांची कर वसुली कल्याण डोंबिवली महानगरपालिका करीत आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र आजदे अंतर्गत येणाऱ्या घरीवली, संदीप, मानपाडा, सोनारपाडा, दावडी या गावांची आरोग्यसेवा यापूर्वीच कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेकडे वर्ग करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईत अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींसाठी उपनगरीय रेल्वे सेवा सुरु करावी - मुख्यमंत्री
मुंबईत उपनगरीय रेल्वे सेवा सुरु करावी. मात्र फक्त अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींसाठीच ती असावी व केवळ ओळखपत्र पाहून प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशी मागणीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्याशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही मागणी केली.
4 वर्षांपूर्वी -
....त्यामुळे आंतरजिल्हा एसटी वाहतुकीचा निर्णय बदलला - अनिल परब
कोरोनाचा फ़ैलाव रोखण्यासाठी सध्या तरी आंतरजिल्हा एसटी वाहतूक बंद रहाणार असल्याची माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली आहे. ही वाहतूक टप्प्याटप्याने सुरु करण्यात येणार आहे. रेड झोनमधून लोकांना आमच्या जिल्ह्यात सोडू नका असा विरोधाचा सूर उमटल्यानंतर हा निर्णय घ्यावा लागल्याचे परब म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
नालासोपारा एसटी आगारात स्थानिकांची गावाला जाण्यासाठी गर्दी
राज्यातील नागरिकांना त्यांच्या घरी जाण्यासाठी आजपासून मोफत एसटी सोडण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली होती. मात्र सरकारच्या या घोषणेचे तीन तेरा वाजले आहेत. नालासोपारा एसटी आगारात जमललेल्या प्रवाशांना तुम्हाला गावाला जाण्यासाठी एसटीतून मोफत प्रवास करता येणार नाही, असं सांगितलं जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
BLOG - रेशनिंग दुकानदारांच्या व्यथेची कथा..!!
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आज जीवनावश्यक सेवा देणाऱ्या सर्व घटकांचा सन्मान होत आहे.अगदी डॉक्टर,पोलीस पासून सफाई कर्मचारी यांच्या पर्यंत सर्वच लोकांचा सन्मान होतोय आणि ते योग्यही आहे.परंतु याच काळात जीव धोक्यात घालुन रोज २०० ते ४०० लोकांना धान्य वाटप करणाऱ्या रेशन दुकानदार यांना मात्र सन्मानाची वागणूक मिळताना दिसत नाही,लोकांच्या दृष्टिने अजूनही ते लुटारू असेच आहेत बहुदा त्यामुळे त्यांना सहानुभूती मिळत नाही.परन्तु जेवढे महत्त्वाचे काम डॉक्टर आणि पोलिसांचे आहे तेवढेच महत्वपूर्ण काम रेशनिंग दुकानदार यांचे आहे कारण आज अनेकांची पोटाची भूक तो भागवत आहे.
4 वर्षांपूर्वी -
पोलिस दल हादरलं! २४ तासांत राज्यात १५० पोलिसांना कोरोनाची लागण
डॉक्टर, नर्स, सफाई कामगारानंतर आता पोलिसांनाही करोनानं ग्रासलं आहे. राज्यात आतापर्यंत ७८६ पोलिसांना कोरोनानं ग्रासलं आहे. तर सात जणांचा करोनानं बळी घेतला आहे. ७६ पोलिसांनी करोनावर मात केल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे. मागील २४ तासांत राज्यात तब्बल दीडशे पोलिसांना करोनानं ग्रासलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
सूचक इशारा? भाजपच्या 'त्या' चारही उमेदवारांना आशिर्वाद! - पंकजा मुंडे
महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त ९ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होत आहे. भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठी आपल्या चार उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र, त्यात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं नाव नाही. याचा अर्थ त्यांना पक्षानं डावललं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईत लष्कराची गरज नाही, सगळे नागरिक हे सैनिकांसारखेच आहेत - मुख्यमंत्री
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. औरंगाबादमध्ये रेल्वेने मजुरांना चिरडलेली घटना अत्यंत वेदनादायी असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. दुसरीकडे लॉकडाऊन कधीपर्यंत ठेवायचा हे जनतेच्या हातात आहे, मुंबईत लष्कराची गरज नाही असंही त्यांनी सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
भाजप कुठल्या दिशेला? पक्षाला शिव्या देणाऱ्यांना संधी दिली - एकनाथ खडसे
भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे माजी मंत्री एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचे राजकीय पुनर्वसन लांबल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपचे विधानपरिषदेचे उमेदवार, एकाचं अजित पवारांविरुद्ध डिपॉझिट जप्त झालेलं
भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे माजी मंत्री एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचे राजकीय पुनर्वसन लांबल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपचा खडसे, तावडे, पंकजा मुंडे, बावनकुळेंना नकार, इतरांना संधी
भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे माजी मंत्री एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचे राजकीय पुनर्वसन लांबल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
गुजरात सरकार गुजराती नागरिकांना राज्यात घेत नाही - बाळासाहेब थोरात
नोंदणी होऊन आपापल्या गावी परतण्याची इच्छा असणाऱ्या लाखो मजुरांची स्थिती गेल्या दोन-चार दिवसांपासून आगीतून फुफाटय़ात पडल्यासारखी झाली आहे. अपुरी माहिती, अफवा यांच्यासह रेल्वे स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे राज्यभरातील सर्वच शहरांमधील मजुरांचे अडकलेले तांडे कुटुंबकबिल्यासह महामार्गावरून वणवण फिरत असल्याचे चित्र आहे.
4 वर्षांपूर्वी -
औरंगाबाद: १६ मजूरांचा अपघाती मृत्यू, मदतीबाबत मोदींचं आश्वासन
जालन्यातील एका कंपनीत काम करणाऱ्या १६ मजूरांचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. शुक्रवारी पहाटेच एक मोठी भीषण दुर्घटना झाल्याचे समोर आले आहे. बदनापूर ते करमाडदरम्यान मालगाडीखाली चिरडून १४ जणांचा जागीच मृत्यू झाला. उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती: राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे 'या' सूचना मांडल्या...सविस्तर
राज्यातील वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली. मंत्रालयात झालेल्या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. या बैठकीनंतर राज ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधत मुख्यमंत्र्यांना केलेल्या सूचनांची माहिती दिली.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीसांनी कालच्या प्रकारावर सर्व शिव-शाहू भक्तांची माफी मागावी - संभाजीराजे भोसले
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून छत्रपती राजर्षि शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj) यांना अभिवादन केलं होतं. यामध्ये त्यांनी छत्रपती शाहू महाराजांचा उल्लेख ‘थोर सामाजिक कार्यकर्ते’ असा केला. यातील ‘कार्यकर्ते’ या शब्दावर आक्षेप घेत शाहूप्रेमी नागरिकांनी फडणवीस यांच्या टीका केली. त्याचबरोबर अनेकांनी माफीची मागणीही केली. या वादावरून संभाजीराजे भोसले (Chhatrapati Sambhajiraje Bhosale) यांनी आपली भूमिका स्पष्ट करत विरोधकांचा समाचार घेतल आहे.
4 वर्षांपूर्वी -
चिंता वाढली! एका दिवसात महाराष्ट्रात १२३३ नवे कोरोना रुग्ण; ३४ जणांचा मृत्यू
कोरोना व्हायरसनं देशात तसंच राज्यात थैमान घातलं आहे. देशात, राज्यात करोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. दरम्यान एका दिवसात महाराष्ट्रात तब्बल १ हजार २३३ नवे रुग्ण समोर आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तर दिवसभरात ३४ करोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याचंही सांगण्यात आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात दोन दिवसांत ७०० कोरोना रुग्णांना डिस्चार्ज
राज्यात गेल्या दोन दिवसात कोरोनाच्या सुमारे ७०० रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. सोमवारी आणि मंगळवारी अनुक्रमे ३५० आणि ३५४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सलग दोन दिवस एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होण्याची ही पहिलीच वेळ असून सुमारे सव्वा महिन्यात २८१९ रुग्णांना घरी सोडण्यात आले.
4 वर्षांपूर्वी -
नोकरभरती रद्द केल्याने अनेकांची वयाची मर्यादा संपुष्टात येईल; सरकारने विचार करावा
कोरोना आपत्तीने साऱ्या जगाला संकटात टाकून अगदी वेगाने फोफावत असतानाच आता त्याचे थेट परिणाम हे जागतिक अर्थव्यवस्थेवर दिसून येऊ लागले आहेत. एकिकडे कोरोनावर मात कशी करायची हा प्रश्न असतानाच भारतासह अनेक राष्ट्रांपुढे आव्हान आहे ते म्हणजे मंदावलेल्या आर्थिक चक्राला पुन्हा गती देण्याचं.
4 वर्षांपूर्वी -
राज्यातील स्थितीवरून केंद्रीय आरोग्य मंत्री आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा होणार
कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी सर्वोत्तोपरी प्रयत्न सुरु आहेत. गेल्या सुमारे तीन महिन्यांपासून राज्य शासन कोरोनाशी मुकाबला करत असून विविध उपाययोजना करत या कोरोना साथीला अद्यापपर्यंत नियंत्रणात ठेवले आहे. चाचण्यांचा वेग सुद्धा लक्षणीयरित्या वाढविल्यामुळे रुग्ण संख्या देखील वाढत आहे. रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. त्याचवेळी खबरदारी म्हणून नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि पुणे येथील आझम कॅम्पसमधील मस्जिदमध्ये कोविड-१९ विरुद्ध लढण्याची तयारी करण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करत दिली आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा
- Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- IREDA Share Price | PSU IREDA शेअर्स श्रीमंत करू शकतात, अवघ्या 5 महिन्यात दिला 440% परतावा, खरेदी करणार?
- Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
- RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत सरकारात्मक अपडेट आली, शेअर सुसाट तेजीत धावणार, पुन्हा मल्टिबॅगर?
- IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या
- Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- Vesuvius Share Price | अल्पावधीत 400% परतावा देणाऱ्या शेअरची एकदिवसात 15% उसळी, खरेदीला ऑनलाईन गर्दी
- Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल
- 8th Pay Commission | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच 8'वा वेतन आयोग लागू होणार, पगारात किती वाढ होणार?