महत्वाच्या बातम्या
-
कोकणातून आंब्याची वाहतूक करणाऱ्या चालकाला कोरोना, ग्रीन झोन संकटात
राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या १४ हजार ५४१ वर पोहोचली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत राज्यातील आकडेवारीची माहिती दिली आहे. यानुसार सोमवारी महाराष्ट्रात नवे ७७१ करोना रुग्ण आढळले. तर ३५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सोमवारी ३५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत एकूण २६४५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सरकारच्या नोकरभरती रद्द करण्याच्या निर्णयामुळे तरुणांमध्ये नैराश्य येईल - विनोद पाटील
कोरोनामुळे करण्यात आलेलं लॉकडाऊन आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेचा गाडाच बिघडल्याने राज्यरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. कोरोनाचं संकट दीर्घकाळ चालणारं असल्याने भविष्यातली तरतूद लक्षात घेऊन अर्थमंत्रालयाने सर्व विभागांवर कठोर आर्थिक निर्बंध लादले आहेत. यात फक्त आरोग्य, औषधी आणि अन्न पुरवढा विभागाला सुट देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कल्याण-डोंबिवलीतील नोकरदारांना मुंबईला जाण्यास मनाई
कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगरच्या हद्दीतून मुंबई-ठाण्यात कामानिमित्त जाणाऱ्यांना पुन्हा कल्याण-डोंबिवली आणि उल्हानगरात प्रवेश मिळणार नाही. कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कल्याण-डोंबिवली आणि उल्हानगरातून मुंबईला कामासाठी जाणाऱ्यांना पुन्हा शहरात प्रवेश देण्यात येऊ नये, असे आदेशच या दोन्ही पालिकांच्या आयुक्तांनी काढले आहेत. येत्या ८ तारखेपासून हे आदेश लागू करण्यात येणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
ठाण्यातील रांजणोलीत १,००० खाटांचे सुसज्ज कोविड सेंटर उभं राहणार
ठाणे जिल्ह्यात करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रांजणोली येथे एक हजार खाटांचे सुसज्ज असे कोविड सेंटर उभारण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. टाटा आमंत्रा या गृहसंकुलाच्या आवारात हे केंद्र उभारण्यात येणार आहे. मुंबई-नाशिक महामार्गाला लागूनच ही व्यवस्था उभी केली जात असून ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, शहापूर आणि ग्रामीण भागातील रुग्णांनाही येथे पोहचणे शक्य होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
एवढी घाई का करताय? पुढे आयुष्यभर निवांत 'बसता' येईल ना! - आ. रोहित पवार
जवळपास दीड महिन्यानंतर दारूचा थेंब घशाखाली ओतायला मिळणार या आशेने दारूच्या दुकानांसमोर गर्दी करून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवणाऱ्या तळीरामांना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मार्मिक भाषेत शालजोडीतून टोले लगावले आहेत. जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. एवढी घाई कसली करता? आता घरात थांबा. नंतर ‘निवांत’ बसा, असा चिमटा रोहित पवार यांनी काढला आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रातील तुमचे मित्र मंडळी, नातेवाईक विदेशात अडकले? हा फॉर्म भरा
देशात करोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून राज्याला याचा मोठा फटका बसला आहे. करोनामुळे जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन आणि करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेचं खूप मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारने आपल्या खर्चात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच अनेक नव्या विकास योजना आणि भरती प्रक्रियांवर काही दिवसांसाठी स्थगिती आमली आहे.
4 वर्षांपूर्वी -
चिंता वाढली: राज्यात कोरोनाचे ६७८ नवे रुग्ण, मृत्यूची संख्या ५२१ वर
मुंबईत करोनाचे ५१० नवे रुग्ण आढळले आहेत. तर करोनाची लागण झाल्याने १८ जणांचा मृत्यू झाला आहे. नवे रुग्ण आढळल्याने मुंबईतील करोनाग्रस्ताची संख्या ९ हजार १२३ इतकी झाली आहे. करोनाची लागण होऊन आत्तापर्यंत एकट्या मुंबईत ३६१ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई महापालिकेने ही माहिती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
दिवसभरात कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे सर्वाधिक १८ रुग्ण वाढले
महाराष्ट्रातला कोरोनाचा वेग कायम आहे. राज्यात आज ६७८ नवीन रुग्ण आढळून आलेत त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या १२९७४ एवढी झाली आहे. तर आज २७ रुग्णांचा मृत्यू झाला. आज ११५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. आतापर्यंत २११५ रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. रुग्णांचा मृत्यू आटोक्यात आणण्यासाठी सरकार अटोकाट प्रयत्न करत असून अनेक उपाय योजना करण्यात येत असल्याची माहिती दिली जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
वाईन शॉप खुले; सरकारने हत्ती सोडला आणि शेपूट धरून ठेवलंय - डॉ. अभय बंग
देशभरात लॉकडाउनचा तिसरा टप्पा आजपासून सुरू झाला आहे. आजपासून रेड, ऑरेन्ज आणि ग्रीन झोनमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. याबरोबरच आजपासून देशभरात दारूची दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. गेल्या दीड महिन्यांपासून दारूपासून दूर असलेल्या लोकांनी सूट मिळताच आज सकाळपासूनच दारूच्या दुकानांपुढे रांगा लावल्या. काही ठिकाणी तर सकाळी दुकाने उघडण्याच्या दोन तास आधीपासूनच लोकांनी रांगा लावायला सुरुवात केलेली दिसली.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांनी आपल्या नावाआधी ‘गुजरात का चौकीदार’ असं लिहावं
देशाची आर्थिक राजधानी मुंबईचं आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र होण्याचं स्वप्न मोदी सरकारने गुंडाळलं आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र म्हणजेच आयएफएससीचं मुख्यालय गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये होणार असल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं असून याबाबतची अधिसूचना काढण्यात आली आहे. गांधीनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट गिफ्ट सिटी आकारास येत आहे. त्यातच आता आयएफएससीचं मुख्यालय गांधीनगरला हलवल्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
रेड झोनमधील (कंटेन्मेंट झोन वगळून) काय सुरू करण्यास परवानगी...सविस्तर
राज्य सरकारनं रेड झोनमधल्या मद्यविक्रीला परवानगी दिली आहे. मात्र मुंबई, पुण्यातील कंटेन्मेंट झोनमधील दारुची दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. केंद्राशी समन्वय राखून राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे. मात्र रेड झोनमधील मॉल्स, सलूनबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
4 वर्षांपूर्वी -
कंटेन्मेंट झोन वगळून मुंबई-पुण्यातही दारू विक्रीला परवानगी
राज्य सरकारनं रेड झोनमधल्या मद्यविक्रीला परवानगी दिली आहे. मात्र मुंबई, पुण्यातील कंटेन्मेंट झोनमधील दारुची दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. केंद्राशी समन्वय राखून राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे. मात्र रेड झोनमधील मॉल्स, सलूनबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
4 वर्षांपूर्वी -
IFSC: २३ मार्च २०१८, सभागृहाला वेळ मारू उत्तर, प्रयत्न केलेच नाही
IFSC: २३ मार्च २०१८, सभागृहाला वेळ मारू उत्तर, प्रयत्न केलेच नाही
4 वर्षांपूर्वी -
राज्यात ७९० नवे कोरोना रुग्ण, ३६ मृत्यू, एकूण रुग्ण १२,२०० च्याही पुढे
महाराष्ट्रात ७९० नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची संख्या १२ हजार २९६ झाली आहे. तर मागील चोवीस तासात ३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात ५२१ रुग्णांचा मृत्यू कोरोनाची लागण झाल्याने झाला आहे. आज महाराष्ट्रात १२१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत महाराष्ट्रातील २ हजार रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
आईचं ह्रदयविकाराने निधन, शेजाऱ्यांचा मदतीला नकार, मुस्लिम मित्र धावले आणि
दयविकारामुळे वयाच्या ७० व्या वर्षी प्रभा कलवार यांचा मृत्यू झाला. त्यानंतर कलवार यांच्या मुलांनी शेजाऱ्यांना हाक दिली. मात्र शेजारी कोरोनाच्या भीतीपोटी पुढे आले नाहीत. अखेरीस मुलाच्या मदतीला त्याचे मुस्लिम समाजातील मित्र धावून आले. मुस्लिमांच्या मदतीने कलवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लॉकडाऊनच्या काळात माणुसकीचे दर्शन घडले.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात आज २६ मृत्यू; १००८ नवे रुग्ण, ११५०६ एकूण बाधित
राज्यात आज १०६ करोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १८७९ रुग्ण बरे झाले आहेत. आज करोनाबाधित १००८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्णसंख्या ११ हजार ५०६ झाली आहे. तर एकूण ९१४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
4 वर्षांपूर्वी -
भाजपाची धडपड व्यर्थ, दोन दिवसांत विधान परिषद निवडणूक जाहीर होणार
राज्यात महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आणि भाजप यांच्यात कितीही मतभेद असले तरी येथील राजकीय पेच सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात एकमत झाले आहे. त्यानुसार विधान परिषदेच्या ९ जागांची निवडणूक घेण्याबाबत निवडणूक आयोगाला विनंती करण्यात आली असून केंद्रातूनच सूत्र हलल्याने येत्या दोन दिवसांत या जागांसाठी निवडणूक जाहीर होणार असल्याचे कळते. सुरक्षित वावर आणि इतर सर्व नियम पाळून २० ते २२ मे पूर्वी या निवडणुका पार पडतील आणि राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीचा अस्थिर खेळ थांबेल असं म्हटलं जातं.
4 वर्षांपूर्वी -
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा...आज त्या घटनेला ६० वर्षे पूर्ण झाली
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा साठावा वर्धापनदिन अर्थात ‘हीरक महोत्सवी महाराष्ट्र दिन’ आज साधेपणानेच साजरा होत आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी १ मे १९६० रोजी महाराष्ट्र स्थापनेचा मंगल कलश आणला होता. या घटनेला आज ६० वर्षे पूर्ण झाली.
4 वर्षांपूर्वी -
विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र
महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुका लवकर जाहीर करा या आशयाचं एक पत्र महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला लिहिलं आहे. “केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानपरिषदेच्या ९ रिक्त जागांसाठीच्या निवडणुका लवकरात लवकर जाहीर कराव्यात” अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे. करोनाच्या संकटामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याची तारीख काय असेल ते जाहीर करण्यात आलेलं नाही. आता लवकरात लवकर या निवडणुकांची तारीख जाहीर करा असं राज्यपालांनी पत्रात म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मालेगावात आतापर्यंत ४२ पोलिसांना कोरोना, तर सोलापुरात एकाच दिवशी २१ रुग्ण
कोरोनाचं ‘हॉटस्पॉट’ असलेल्या मालेगावात बाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असतानाच, आता करोनाविरोधी लढणाऱ्या योद्ध्यांनाही या विषाणूच्या साखळीनं घट्ट विळखा घातला आहे. मालेगावात आतापर्यंत ४२ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल
- Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा
- 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8'वा वेतन आयोग केव्हा स्थापन होणार? बेसिक पगार किती वाढणार?
- BHEL Share Price | भरवशाचा PSU शेअर! अल्पावधित दिला 258% परतावा, कंपनीबाबत अजून एक सकारात्मक अपडेट
- IREDA Share Price | PSU IREDA शेअर्स श्रीमंत करू शकतात, अवघ्या 5 महिन्यात दिला 440% परतावा, खरेदी करणार?
- Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
- Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार
- 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! HRA पासून ग्रॅच्युइटीपर्यंत फायदा, मोठी वाढ होणार
- RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत सरकारात्मक अपडेट आली, शेअर सुसाट तेजीत धावणार, पुन्हा मल्टिबॅगर?
- Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी शेअर्सची लिस्ट, अल्पावधीत मालामाल