महत्वाच्या बातम्या
-
गिरगावात मेट्रो-३ विरोधात शिवसेनेचं आक्रमक आंदोलन
शिवसेनेनं मेट्रो 3 प्रकल्पा विरोधात पुन्हा एकदा तीव्र आंदोलन सुरू केलं आज गिरगावातील मेट्रो तीन प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या खोदकामांमुळे स्थानिक नागरिकांना जो त्रास होतेय त्या संदर्भात शिवसेना आंदोलन करत आहे. शाळेत जाणार्या विद्यार्थ्यांना दररोजचा त्रास तसेच रहिवाशांना त्यांच्याच घरी येण्याजाण्यासाठी करावी लागणारी कसरत. या संदर्भात शिवसेनेनं हे आंदोलन सुरू केलं. या आंदोलनादरम्यान गिरगावात मेट्रो ३ प्रकल्पासाठी सामानांची ने आण करणारे डंपर शिवसैनिकांनी फोडले. डंपरच्या काचा तोडण्यात आल्यात. तसेच डंपरमधील ड्रायव्हर आणि क्लिनर यांना शिवसैनिकांनी पळवून लावलं.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO - ते पुन्हा आले, पण बाळासाहेबांच्या चरणी; शिवसैनिकांची घोषणाबाजी
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी शिवतीर्थावर जाऊन शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं. यावेळी फडणवीस यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाचे नेते विनोद तावडे, पंकजा मुंडे तर शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर यांची उपस्थिती होती. आदरांजली वाहिल्यानंतर फडणवीस यांनी माध्यमांना हात जोडत बोलण टाळलं. मात्र, परत जात असताना फडणवीसांना बघून शिवसैनिकांनी मी पुन्हा येईन अशी घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनाप्रमुख स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरे यांचा आज ७वा स्मृतिदिन
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज ७वा स्मृतिदिन आहे. बाळासाहेबांच्या विचारांतून मराठी माणसाला कायम स्फूर्ती मिळत राहते. स्मृतिदिनाच्या निमित्ताने राज्यभरातून लाखो शिवसैनिक शिवसेनाप्रमुखांच्या अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्क येथील शिवतीर्थावर दाखल झाले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
गडकरींचा संबंध सिमेंट, इथेनॉल, डांबर वगैरे वस्तूंशी, क्रिकेटशी नाही: शिवसेना
‘सरकार स्थापन करण्यास असमर्थ आहोत असं सांगणारे राष्ट्रपती राजवट लागू होताच ‘आमचेच सरकार येणार’ असं कोणत्या तोंडानं सांगत आहेत’, असा खडा सवाल करतानाच, ‘श्रीरामासही राज्य सोडावे लागले होते. त्यामुळं इतकं मनास लावून घेऊ नका,’ असा खोचक सल्ला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज्यात नवी समीकरणे जुळत असल्याने अनेकांना पोटाचे विकार सुरू झाले: शिवसेना
सरकार स्थापन करण्यास असमर्थ आहोत असं सांगणारे राष्ट्रपती राजवट लागू होताच ‘आमचेच सरकार येणार’ असं कोणत्या तोंडानं सांगत आहेत’, असा खडा सवाल करतानाच, ‘श्रीरामासही राज्य सोडावे लागले होते. त्यामुळं इतकं मनास लावून घेऊ नका,’ असा खोचक सल्ला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेना-एनसीपी-काँग्रेस नेते राज्यपालांना भेटणार असल्याने फडणवीस लगबगीने राज्यपालांकडे
राज्यात सत्तास्थापनेचा तिढा लवकर सुटण्याची चिन्हे दिसत आहे. सरकार बनविण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र येत आहेत हे स्पष्ट झालं आहे. या तीन पक्षांमध्ये किमान समान कार्यक्रम ठरविण्यासाठी चर्चा सुरु आहे. मात्र राज्यात सुरु असणाऱ्या राष्ट्रपती राजवटीमुळे ओला दुष्काळात अडकलेल्या शेतकऱ्यांना मदत करावी या मागणीसाठी महाशिवआघाडीचे नेते राज्यपालांना भेटणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंवर राग व्यक्त करण्यासाठी भाजपकडून ठाकरेंच्या कौटुंबिक नात्याचा वापर?
गुरूवारी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली होती. यावेळी त्यांनी भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला होता. ‘मुख्यमंत्रीपदाबाबतची चर्चा बंद दाराआड अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये झाली होती. ती बंद दाराची खोली खुद्द शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची होती. त्यामुळे त्यांची ती खोली आम्हाला मंदिरापेक्षा कमी नाही. तिथे झालेली शहा-ठाकरे यांच्यातील चर्चा शहांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितली नाही, त्यामुळे गोष्टी बिघडल्या’, असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी थेट अमित शहा यांच्यावर केला होता. त्यामुळे आशिष शेलार यांनी आज संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचा मोदींबद्दलचा आदर स्वाथी की नि:स्वार्थी? आशिष शेलार
गुरूवारी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली होती. यावेळी त्यांनी भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला होता. ‘मुख्यमंत्रीपदाबाबतची चर्चा बंद दाराआड अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये झाली होती. ती बंद दाराची खोली खुद्द शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची होती. त्यामुळे त्यांची ती खोली आम्हाला मंदिरापेक्षा कमी नाही. तिथे झालेली शहा-ठाकरे यांच्यातील चर्चा शहांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितली नाही, त्यामुळे गोष्टी बिघडल्या’, असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी थेट अमित शहा यांच्यावर केला होता. त्यामुळे आशिष शेलार यांनी आज संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.
6 वर्षांपूर्वी -
आरे वृक्षतोडीवरून सत्य संदेश देणारी चिमुकली; दिल्लीत ऑक्सिजनची दुकानं सुरु
दिल्ली: सध्या दिल्लीतील वाढलेल्या प्रचंड प्रदूषणामुळे जगणं देखील कठीण झालं असून, शुद्ध हवा आणि श्वास घेण्यासाठी लोकांना लवकरच ऑक्सिजनच्या दुकानांचा आसरा घ्यावा लागेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. प्रदूषणाच्या वाढलेल्या पातळीने स्वतःच हवेत जगण्याचा लोकांच्या अधिकारच संपुष्टात येऊ शकतो. मेट्रो’सारखे प्रकल्प राबवून देखील येथील कार्बनडाय ऑक्साइडचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे आणि सुप्रीम कोर्टाने देखील त्यावर ताशेरे ओढले आहेत. स्वच्छ हवा आणि ऑक्सिजनच्या बाबतीत वृक्ष महत्वाची भूमिका बजावत असतात हे आपल्या देशात अजून उमगलेलं नाही याचं मोठं उदाहरण म्हणजे मुंबईतील मेट्रो-३च्या निमित्ताने आरे’सारख्या जंगलात हजारो वृक्षांची कर्फ्यू लावून करण्यात आलेला कत्तल.
6 वर्षांपूर्वी -
आम्ही सारखं 'मी पुन्हा येईन पुन्हा येईन' बोलणार नाही; शिवसेनाच येणार: संजय राऊत
नव्या सरकारच्या फॉर्म्युल्याची चिंता करू नका. त्यासाठी उद्धव ठाकरे सक्षम आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार येणार आहे. लाख प्रयत्न करा, कुणीही शिवसेनेला रोखू शकणार नाही,’ असा विश्वास शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज बोलून दाखवला.
6 वर्षांपूर्वी -
मुंबई पालिका कंत्राटदारांवरील धाडीमार्गे सेना लक्ष? राज्यात सत्ता येताच सेना उत्तर देणार?
मुख्यमंत्रीपदावरून भाजप-शिवसेनेचे बिनसले असताना केंद्र सरकारच्या अखत्यारीतील प्राप्तीकर विभागाने सेनेच्या ताब्यातील महापालिकेतील कंत्राटदारांवर छापे टाकले आहेत. यावरून भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेत्यांनी शिवसेना पक्ष नैत्रुत्वाच्या विरुद्ध आघाडी उघडल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, राज्यात सत्ता स्थापन होताच शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी देखील भाजपच्या संबंधित घोटाळ्यांमध्ये लक्ष घालण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी चालवलेला हा खेळ काही दिवसचं बघायचा आणि सत्ता येताच चोख प्रतिऊत्तर द्यायचं अशी चर्चा शिवसेना आणि मित्रपक्षांमध्ये रंगली आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO - महाशिवआघाडीची पहिली संयुक्त बैठक; किमान समान कार्यक्रमावर चर्चा
महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे ठोस पावले टाकायला सुरुवात केली असून या तिन्ही पक्षांची पहिली संयुक्त बैठक आज मुंबईत सुरू झाली आहे. या बैठकीत किमान समान कार्यक्रम व सत्ता वाटप यावर चर्चा करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
6 वर्षांपूर्वी -
ओला दुष्काळ जाहीर करावा म्हणून आ. बच्चू कडू यांचा राजभवनावर शेतकरी मोर्चा
अवकाळी पावसानं पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज राजभवनावर धडक देण्याचा प्रयत्न केला. अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. मात्र, राजभवनावर जाण्याआधीच हा मोर्चा पोलिसांनी अडवला. कडू यांच्यासह काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. त्याचवेळी, आमदार बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या वाहनांसमोर ठिय्या देत आंदोलन सुरू केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. या आंदोलनामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
6 वर्षांपूर्वी -
#VIDEO: उद्धव यांचा हाच तो पुरावा ज्यावरून भाजप खोटं बोलत आहे हे सिद्ध होतं
सध्या भाजप आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री पद आणि सत्तेत समसमान वाटा यावरून आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. मात्र अमित शहा यांनी मातोश्रीवर भेट दिल्यानंतर जी चर्चा झाली होती, त्यानंतर स्वतः उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर शिवसैनिकांशी संवाद साधत यावर भाष्य करत शिवसैनिकांना खात्री दिली होती. त्याचा पुरावा म्हणजे सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झालेला हा व्हिडिओ मोठा पुरावा म्हणावा लागेल.
6 वर्षांपूर्वी -
शहांशी चर्चा झाली ती बंद खोली बाळासाहेबांची; आमच्यासाठी ते मंदिर: संजय राऊत
शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्याचं ठरलंच नव्हतं असा दावा करणारे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना शिवसेनेनं आज चोख प्रत्युत्तर दिलं. ‘शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असं शिवसेनेचे पक्षप्रमुख प्रत्येक सभेत सांगत असताना अमित शहा गप्प का होते. त्यांनी त्यावेळी आक्षेप का घेतला नाही,’ असा सवाल करतानाच, ‘अमित शहा यांनी युतीच्या सत्तावाटपाची चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून लपवली,’ असा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज केला.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेस-एनसीपी बैठकीतील काही गोष्टी गुपित असल्याने अजित पवार तसं म्हणाले: आ. जितेंद्र आव्हाड
काँग्रेस-राष्ट्रवादीची समन्वय समितीची आजची बैठक अचानक रद्द झाल्याचं खुद्द अजित पवार यांनी सांगितलं. मात्र, त्यानंतर झालेल्या गदारोळानंतर तात्काळ ही बैठक पुन्हा सुरु झाली आहे. किमान समान कार्यक्रम ठरवून शिवसेनेशी युती करण्यासाठी दोन्ही पक्षांनी ही पहिलीच बैठक आयोजित केली होती. आता नव्याने काँग्रेस-राष्ट्रवादीची ही बैठक सुरु असल्याचे फोटो समोर आले आहेत. त्यात बारामतीला जात असल्याचे सांगणारे अजित पवार देखील सहभागी झाल्याचे दिसत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेस-राष्ट्रवादीची समन्वय बैठक पत्रकारांना चकवा देत पार पडली
काँग्रेस-राष्ट्रवादीची समन्वय समितीची आजची बैठक अचानक रद्द झाल्याचं खुद्द अजित पवार यांनी सांगितलं. मात्र, त्यानंतर झालेल्या गदारोळानंतर तात्काळ ही बैठक पुन्हा सुरु झाली आहे. किमान समान कार्यक्रम ठरवून शिवसेनेशी युती करण्यासाठी दोन्ही पक्षांनी ही पहिलीच बैठक आयोजित केली होती. आता नव्याने काँग्रेस-राष्ट्रवादीची ही बैठक सुरु असल्याचे फोटो समोर आले आहेत. त्यात बारामतीला जात असल्याचे सांगणारे अजित पवार देखील सहभागी झाल्याचे दिसत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मावळलेल्या सरकारची पिल्ले खूश असल्याचं त्यांचे आनंदी चेहरे सांगतात: सेनेची जहरी टीका
राष्ट्रपती राजवट लादली म्हणजे महाराष्ट्रातील सत्ता परिवारातच राहिली. त्यामुळे मावळलेल्या सरकारची पिल्ले खूश आहेत हे त्यांच्या आनंदी चेहऱ्यावरून दिसत आहे. आता सरकार कोणी व कसे बनवायचे? राष्ट्रपती राजवटीचा खेळखंडोबा लवकरात लवकर कसा दूर करायचा हाच प्रश्न आहे अशा शब्दात सामना अग्रलेखातून शिवसेनेने भारतीय जनता पक्षावर टीकास्त्र सोडलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
राष्ट्रपती राजवट लागू होणे हा महाराष्ट्राचा घोर अपमान: राज ठाकरे
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणे हा महाराष्ट्राचा घोर अपमान असून हा नतद्रष्टांचा खेळखंडोबा आहे, अशा तिखट शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली. राज्यात सुरू असलेल्या सत्तापेचावर राज यांनी पहिल्यांदाच मौन सोडत शिवसेना-भाजपवर टीका केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
संध्याकाळी ५ वाजता काँग्रेस-एनसीपी'च्या बैठकीत सर्व स्पष्ट होईल: राष्ट्रवादी
राज्यात सत्तास्थापनेचा पेच अजूनही कायम असून राज्यपाल कोश्यारी यांनी तिसरा सर्वात मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता स्थापनेचे आमंत्रण दिले आहे. भारतीय जनता पक्षाने वेट अँड वॉचची भूमिका घेतली असून शिवसेनेने पुन्हा दावा करण्याचा निर्णय घेतला आहे. आज काँग्रेस पक्ष काय भूमिका घेतो यावर सगळी गणितं अवलंबून असून आजचा दिवस निर्णायक मानला जात आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH
-
Mazagon Dock Share Price | मल्टिबॅगर शेअर रेकॉर्ड हाय लेव्हलवर, आता मोठ्या तेजीचे संकेत, टार्गेट अपडेट - NSE: MAZDOCK