महत्वाच्या बातम्या
-
ब्रेकिंग न्यूज - उद्या होणार भारतीय वैमानिक अभिनंदन यांची सुटका
पाकिस्तानच्या ताब्यात असणारे भारतीय वैमानिक अभिनंदन वर्तमान यांची सुटका करण्याचा निर्णय पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांनी घेतला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ही घोषणा केली आहे. संसदेत बोलताना इम्रान खान यांनी शांततेसाठी आपण भारतीय वैमानिकाची सुटका करत असल्याचं सांगितलं. अभिनंदन यांची सुटका करत तात्काळ भारतात पाठवण्यात यावं अशी मागणी भारताकडून कऱण्यात आली होती आणि कोणतीही चर्चा न करता पाकिस्तानने आमच्या वैमानिकाला भारतामध्ये पाठवावे अशी कठोर भूमिका भारताने घेतली होती.
6 वर्षांपूर्वी -
मोदींनी पाकशी चर्चेची संधी सोडू नये, राज ठाकरेंचे आवाहन - सविस्तर वृत्त
राज ठाकरेंनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेज वर जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे कि, जर पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांनी चर्चेचे निमंत्रण दिले आहे तर त्यांनी ताबडतोब भारतीय वैमानिक अभिनंदन यांना भारतात परत पाठवावे आणि बॉर्डरवर होणारा गोळीबार थांबवावा. म्हणजेच आपण खरंच शांततेच्या मार्गाने हा विषय सोडवण्याच्या मानसिकतेत आहेत हे स्पष्ट होईल.
6 वर्षांपूर्वी -
अति-उत्साही न्युज-दलाने काय मिळवलं? सरकारी जाहिराती, व्हिडिओ गेम ते लष्कराप्रती संवेदना?
परराष्ट्र संबंध राबवणारे अधिकारी हे शब्दप्रभू असतात तेव्हा जास्त चांगले असते. त्यामुळेच भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी परवा जेव्हा “म्हणजे बिगर-लष्करी” आणि “प्रतिबंधात्मक कारवाई” हे शब्दप्रयोग केले, तेव्हा ते आश्चर्यकारक नव्हते. तरीही अनेकांनी त्याचे कौतुक केले. त्या शब्दवापरामध्ये खरोखरीच काही तरी उपयुक्त आणि अर्थवाही असं होतं. केवळ चलाख शब्दकलेच्या पलीकडे ते निवेदन आणि ज्या कारणाने ते केले गेले ते हवाई हल्ले, या दोन्ही दरम्यान एक दुहेरी दावा होता.
6 वर्षांपूर्वी -
राज्यात फडणवीसांची अधिवेशन गुंडाळण्याची चर्चा, तर मोदींची पक्ष मजबूतीची चर्चा
भारतीय वायुदलाने पाकिस्तानमध्ये केलेल्या एअर स्ट्राईक’नंतर संपूर्ण वातावरण ढवळून निघाले आहे. पुलवामानंतरच्या घडामोडींना आणखी एक रुपेरी किनार होती. ‘मागच्या सरकारांबद्दल’ आणि त्यांच्या सुरक्षाविषयक अपयशांबद्दल ‘अधिकृत सूत्रांकडून’ आडून-आडून वार केले गेले तरी विरोधी पक्षांनी या कसोटीच्या काळात आपला प्रतिसाद संयत ठेवला.
6 वर्षांपूर्वी -
भाजप नेत्यानो जबाबदारीनं वागा! 'एअर स्ट्राईक' सहभागातील महिला पायलट्सचे खोटे फोटो शेअर
भारतीय वायुदलाने केवळ बारा दिवसात जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील भ्याड हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानच्या हद्दीत घुसून त्यांना अद्दल घडवली. दरम्यान, या हल्ल्याचा भारतीय वायुदलाने केवळ १२ दिवसात बदला घेत दहशतवाद्यांचं तेरावं घातल्याच्या प्रतिक्रिया समाज माध्यमांवरून व्यक्त होत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मनसेचे मुंबईतील एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांच्याकडून पुलवामा हल्ल्यातील शहिदांना आर्थिक मदत
देशातील विविध स्तरातील लोकांनी शहिदांच्या कुटुंबियांना आर्थिक तसेच शैक्षणिक मदत जाहीर केली. महाराष्ट्र सरकारने देखील थोडी पण मदत जाहीर केली. परंतु मनसेचे मुंबईतील एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून त्यांच्या नगरसेवक पदासाठी मिळणारे पुढील एक वर्षाचे मानधन पुलवामा येथील शहिद झालेल्या CRPF जवानांना समर्पित केले. हि मदत जरी थोडी असली तरी त्यांनी दाखवलेली भावना हि मोठी आहे आणि त्यांच्या या कार्याला लक्षात घेऊन इतर राजकारण्यांनी देखील शहीद जवानांना मदत केली पाहीजे.
6 वर्षांपूर्वी -
मुंबईसह राज्यात हाई अलर्ट, दहशतवादी शालेय बसला निशाणा बनवू शकतात किंवा मुलांच्या बसचे अपहरण करु शकतात
पाकिस्तानातील बालाकोट येथे भारतीय हवाई दलाच्या एअर स्ट्राईकनंतर भारत – पाकिस्तान तणाव आणखीनच वाढला आहे. काश्मीरमध्ये सीमेवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून जम्मू, श्रीनगर, पठाणकोट येथे विमानतळांवरून प्रवासी वाहतुक बंद करण्यात आली आहे आहि हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुप्तचर संस्थांनी सर्वाधिक धोका मुंबईला असल्याचे म्हटले जात आहे. दहशतवादी शालेय बसला निशाणा बनवू शकतात किंवा मुलांच्या बसचे अपहरण करु शकतात. त्यामुळे राज्यातही हाय अलर्ट जारी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
भारताची 2 विमानं पाडून एका वैमानिकाला अटक केली, पाकिस्तानचा दावा
श्रीनगर, 27 फेब्रुवारी : सकाळी आलेल्या वृत्तानुसार भारतीय हवाई दलाचे १ विमान अपघाताने कोसळले असल्याची बातमी ताजी असतानाच ‘ आम्ही भारताची 2 विमानं पाडून एका वैमानिकाला ताब्यात घेतलं आहे’ असा दावा पाकिस्तानने केला आहे. काही वेळापूर्वी भारताची दोन विमानं काश्मीरमध्ये कोसळली आहेत. ही विमानं आम्हीच पाडली आहेत, असा दावा पाकच्या लष्कराने केला.
6 वर्षांपूर्वी -
वाह मोदीजी वाह, इतर मंत्र्यांना मीडिया सोबत व्यस्त ठेऊन पाकिस्तानला गाफील केले
भारताने केलेल्या एअर स्ट्राईकच्या दाव्यानंतर पाकिस्तान राष्ट्रीय सुरक्षा समितीने तातडीची बैठक बोलावली आणि याचे नेतृत्व पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी केले. या बैठकी नंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी पत्रकार परिषद घेऊन भारताने केलेल्या एअर स्ट्राईकच्या वृत्ताचे खंडन केले. त्यांच्या मते भारतीय हवाईदल पाकिस्तान हद्दीत शिरताच पाकिस्तान एअर फोर्स सतर्क झाली आणि भारतीय विमानांनी लगेच पळ काढला.
6 वर्षांपूर्वी -
भारताचा पाकिस्तानामधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला
जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये अत्यंत तणावाचे वातावरण आहे. अशातच पाकिस्तानकडून आगळीक सुरुच असून भारतीय हवाई दलाच्या विमानाने LoC ओलांडली. परंतु, आम्ही त्यांना हुसकावून लावल्याचा पोकळ दावा पाकने यावेळी केला आहे. भारतीय हवाई दलाने १००० किलो वजनाची स्फोटके टाकून हा बॉम्बहल्ला केल्याचेही पाकिस्तानने म्हटले आहे. भारताच्या मिराज जेट फायटरची १० विमान पाकिस्तानच्या हद्दीत घुसल्याचे सांगण्यात आले आहे.
6 वर्षांपूर्वी -
बेकायदेशीर होर्डिंग व मारहाण; भाजप नगरसेवक मुरजी पटेल यांना हायकोर्टाने झापले
मुंबई अंधेरी पूर्वेचे भाजपचे नगरसेवक मुरजी पटेल आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना बेकायदा बॅनरविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं चांगलच धारेवर धरलं आणि कडक ताशेरे ओढले आहेत. दरम्यान, घडलेल्या गंभीर प्रकरणाची जबाबदारी घेत जाहीर माफी मागा आणि मुंबई पालिका अधिकाऱ्यांना केलेल्या मारहाणीबद्दल पालिकेकडे योग्य नुकसानभरपाई देऊन सदर प्रकरण संपवा, असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले.
6 वर्षांपूर्वी -
बिकट आर्थिक परिस्थिती व आंतरराष्ट्रीय दबावानंतर इम्रान खान यांची शांततेची भाषा
बिकट आर्थिक परिस्थिती व आंतरराष्ट्रीय दबावानंतर इम्रान खान आणि पाकिस्तानची खुमखुमी कमी होताना दिसत आहे. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताकडून प्रत्युत्तराची कारवाई होऊ शकते त्यामुळे पाकिस्तान सरकार खडबडून जागा झाला आहे आणि शांततेच्या बाता करू लागला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शांततेची एक संधी द्या असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींना केले आहे. आपण आपल्या शब्दावर ठाम असून भारताने पुलवामा हल्ल्यासंबंधी ठोस पुरावे दिले तर तात्काळ कारवाई करु असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.
6 वर्षांपूर्वी -
रॉबर्ट वढेरा मुरादाबादमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात? पोस्टरबाजी
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे मेहुणे आणि प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. इतकंच नाही तर येत्या लोकसभा निवडणुकीत ते उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे पोस्टर देखील मुरादाबाद युवा काँग्रेसकडून मुरादाबादच्या रस्त्यांवर लावण्यात आले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
तुलसी जोशींचा दणका, बांधकाम व्यवसायिकाने मराठी १२ तरुणांना अखेर धनादेश दिले
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालघरचे कार्यकर्ते आणि राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक तुलसी जोशी हे शक्य असलेल्या मदतीसाठी सामान्य मराठी माणसाला कधीच नाही बोलत नाहीत, याची अनेक उदाहरणं प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी पाहिली आहेत. त्यापैकीच अजून एक मदतीचं प्रकरण वसई येथून समोर आलं आहे. तब्बल १२ मराठी तरुणांनी कष्टाचा पैसे वसईमध्ये स्वतःचे घर घेण्याच्या उद्देशाने एका प्रकल्पात गुंतवला होता.
6 वर्षांपूर्वी -
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून
महाराष्ट्र विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. आजपासून सलग सहा दिवस अधिवेशन चालणाऱ्या अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होईल. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सदर अर्थसंकल्पीय अधिवेशनाला विशेष महत्व आहे. मराठा, सवर्ण, धनगर आरक्षणाचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. अधिवेशनात शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीची मागणी करणार असल्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील पाटील यांनी सांगितले होते.
6 वर्षांपूर्वी -
अमित शहा पाकच्या पाण्यात झोपले की पाकिस्तानचं पाणी बंद होणार का? राज ठाकरेंचा टोला
सध्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापले आहे. त्यात पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ’च्या जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्यात तब्बल ४० जवान शहीद झाले आणि त्यामुळे पाकिस्तानविरोधात देशभरात रोष व्यक्त करण्यात येतो आहे. दरम्यान, सध्या पाकिस्तान विरोधात वातावरण तापलेले असताना राज ठाकरे यांनी पुन्हा एक धक्कादायक विधान केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
फक्त अजित डोभालची सखोल चौकशी करा, सर्व सत्य बाहेर येईल: राज ठाकरे
सध्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापले आहे. त्यात पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ’च्या जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्यात तब्बल ४० जवान शहीद झाले आणि त्यामुळे पाकिस्तानविरोधात देशभरात रोष व्यक्त करण्यात येतो आहे. दरम्यान, सध्या पाकिस्तान विरोधात वातावरण तापलेले असताना राज ठाकरे यांनी पुन्हा एक धक्कादायक विधान केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
सेनेला भगदाड पाडून अर्जुन खोतकर काँग्रेसमधून दानवेंच्या विरोधात लोकसभेच्या आखाड्यात?
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप आणि शिवसेनेत युती झाली खरी, परंतु आता ही युती शिवसेनेच्या अंगलट येण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेनेतून थेट मंत्री पदावर असलेले नेतेच फुटण्यास सुरुवात झाली आहे. युतीची घोषणा झाल्यानंतर मंत्री अर्जुन खोतकर यांनी युती झाली तरी लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवेंच्या विरोधात रणशिंग फुंकणार असल्याचे सूचित केले होते. परंतु त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अर्जुन खोतकर यांना भेट नाकारली होती. त्यानंतर अर्जुन खोतकर देखील संतापल्याचे समजते.
6 वर्षांपूर्वी -
सरकार केवळ धर्माच्या नावाखाली लोकांमध्ये विष पेरतंय: शरद पवार
महाराष्ट्रात गंभीर दुष्काळी परिस्थिती असताना केंद्र आणि राज्य सरकारकडून अद्याप मदत दिली जात नाही. जनतेला मदत करण्याची या सरकारची भावनाच नाही. जनावरांना चारा नाही. एकही छावणी सुरु नाही. रोजगार हमीची कामे नाहीत. याकडे लक्ष देण्याऐवजी हे सरकार धर्माच्या नावाखाली समाजामध्ये विष पसरवत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी येथे केली.
6 वर्षांपूर्वी -
आमचे भांडण किती जागा मिळाव्यात यासाठी नाही: प्रकाश आंबेडकर
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतील शिवाजीपार्क मैदानावर वंचित बहुजन आघाडीची भव्य सभा पार पडली. दरम्यान, केंद्रात सत्तेवर आल्यावर आरएसएस’ला संविधानाच्या चौकटीत आणण्याची काँग्रेसने हमी दिली तरच त्यांच्याशी आम्ही युती करू असा पुनरुच्चार वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कालच्या सभेत केला.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN