महत्वाच्या बातम्या
-
शिक्षण व रोजगार हक्कांसाठी पुणे- मुंबई लाँग मार्च, २१ ला मंत्रालयावर धडकणार
प्रत्येकासाठी महत्वाचा विषय असलेल्या शिक्षण तसेच रोजगाराच्या प्रश्नावर छात्रभारती विद्यार्थी संघटना आणि राष्ट्र सेवा दलाच्या वतीने पुण्यातील ऐतिहासिक महात्मा फुले वाड्यातून पुणे- मुंबई लाँग मार्चला काढण्यास सुरुवात झाली. विशेष म्हणजे यामध्ये हजारो विद्यार्थ्यांनी सहभागी नोंदवला आहे. पायी निघालेला हा मोर्चा ५- ६ दिवस रस्त्यांवरच मुक्काम ठोकत आणि येत्या २१ नोव्हेंबरला थेट मंत्रालयावर धडकेल असं वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण: ओबीसीत समावेश करण्यासाठी मागासवर्ग आयोग अनुकूल
मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक तसेच आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचे अभ्यासाअंती सिद्ध झालेल्या निष्कर्षामुळे, या समाजाचा समावेश हा इतर मागास प्रवर्गात (OBC) करावा, नागराज खटल्यानुसार मागास प्रवर्गाची लोकसंख्या ५० टक्क्यांहुन जास्त असेल, तर अशा परिस्थितीत आरक्षणाची मर्यादा अधिक वाढविता येऊ शकते. या सर्व गोष्टींचा विचार करून OBC आरक्षणाचा एकूण कोटा वाढवून मराठा समाजाला योग्य त्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावे, अशी शिफारस महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग फडणवीस सरकारला करणार असल्याची माहिती प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना प्राप्त झाली आहे.
7 वर्षांपूर्वी -
अखेर आज मराठा समाजाच्या स्वतंत्र पक्षाची स्थापना
पाडव्याच्या मुहूर्तावर आज ‘महाराष्ट्र क्रांती सेना’ या नव्या मराठा समाजाच्या पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्याची अधिकृत घोषणा सुरेश पाटील यांनी केली आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आम्ही राजकीय पक्षाची स्थापना करत असल्याचं सुद्धा ते म्हणाले.
7 वर्षांपूर्वी -
शेतकरी जोडपं...एक दमडी जरी टाकलीत ओवाळणी म्हणून तर याद राखा: व्यंगचित्र
राज्यातील बळीराजाची घोर फसवणूक करून त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या महाराष्ट्रातील युती सरकारला दमडीची सुद्धा ओवाळणी देऊ नये असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिवाळीतले त्यांचे ५वे व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे. विशेष म्हणजे या व्यंगचित्रात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांना साडी नेसलेल्या स्वरूपात दाखविले आहे.
7 वर्षांपूर्वी -
यांच्या फेकलेल्या हजारो-लाखो कोटींच्या आकड्यांनी लक्ष्मी सुद्धा थक्क: व्यंगचित्र प्रसिद्ध
भारतीय जनता पक्षाला मनसे अध्यक्षांनी व्यंगचित्रांची मालिका प्रसिद्ध करून हैराण करून सोडले आहे. आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुद्धा चार साडेचार नरेंद्र मोदी, नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी ‘फेकलेले’ हजारो, लाखो कोटींचे आकडे आकडे पाहून लक्ष्मी सुद्धा थक्क झाल्याचे व्यंगचित्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रसिद्ध केले आहे.
7 वर्षांपूर्वी -
अभ्यंगस्नान, साहेब! अख्खा महाराष्ट्र तुम्हाला धुवायला आला आहे पाठवू का?
आज नरकचतुर्दशी म्हणजे दिवाळीची पहिली अंघोळ. आज प्रथेनुसार या दिवशी केलं घरोघरी अभ्यंगस्नान केलं जातं. नेमका याच अभ्यंगस्नानाचा संदर्भ घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना लक्ष केलं आहे. सध्या राज्यात महागाई, दुष्काळ, शेतकरी आत्महत्या अशा एक ना अनेक विषयांवरून राज्य सरकारवर सामान्य जनता प्रचंड नाराज आहे आणि त्याचा सुद्धा अप्रत्यक्ष संदर्भ यात आहे.
7 वर्षांपूर्वी -
वनविभाग अव्नीचे शत्रू नाही: सुधीर मुनगंटीवार
रविवारी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर अव्नी वाघिणीला ठार मारण्याचे आदेश दिल्याबद्दल एकावर एक ट्विट करत टीका केली होती. त्यानंतर, आम्ही अव्नी वाघिणीला नाईलाजाने मारल्याचे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीयमंत्री मेनका गांधी यांना प्रतिउत्तर देताना म्हटले आहे. त्यामुळे मनेका गांधी यांना अजून सविस्तर माहिती माहित नाही असं वनमंत्री म्हणाले. दरम्यान, वाघिणीला मारण्याचा निर्णय हा राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाने घेतला आहे. तसेच वाघिण काय वनखात्याच्या कर्मचाऱ्यांची शत्रू नव्हती, असं सुद्धा म्हटलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यात दंगली उसळतील: आमदार बच्चू कडू
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्र सरकार जर असंच असंवेदनशील राहिल्यास दंगली उसळतील असा सज्जड इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या मुक्काम मोर्चादरम्यान उपस्थितांना संबोधित करताना आमदार बच्चू यांनी हे वक्तव्य केलं आहे. दरम्यान, यावेळी बोलताना शेतकऱ्यांच्या तुरीचे चुकारे द्या, अन्यथा अमरावतीचं विभागीय मार्केटिंग अधिकाऱ्याचं कार्यालय जाळून टाकू, अशी धमकी सुद्धा आमदार बच्चू कडू यांनी जाहीरपणे दिली आहे.
7 वर्षांपूर्वी -
जायकवाडी धरणात पाणी सोडण्यावरून नगर-नाशिक विरुद्ध मराठवाडा संघर्ष
दुष्काळजन्य परिस्थिती ओढावल्याने नगर-नाशिक विरुद्ध मराठवाडा असा पाणी संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत. नाशिक जिल्ह्यांमधील धरणांमधून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यावरून अहमदनगर – नाशिक विरुद्ध मराठवाडा असा संघर्ष सध्या सुरू आहे. अहमदनगर – नाशिकमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे जायकवाडीला पाणी देण्यास स्थानिक प्रतिनिधींचा आणि लोकांचा तीव्र विरोध होत आहे. परंतु, राज्य पाटबंधारे विभागाच्यावतीने धरणात पाणी सोडण्याची तयारी सुरू झाली आहे असे वृत्त आहे. आज जिल्हाधिकाऱ्यांची अकरा वाजता बैठक घेण्यात आहे. त्यामुळे या बैठकीनंतर पाणी सोडण्यात येणार का? यावर अंतिम निर्णय होणार असल्याचे समजते.
7 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांची चेष्टा; फडणवीस सरकारकडून बॅटरीच्या प्रकाशात शेताचे दाखले व पीकाचा सर्वे
सध्या ग्रामीण महाराष्ट्रावर तीव्र दुष्काळाचे सावट आहे. त्यात सरकारने सध्या केवळ ‘दुष्काळ सदृश्य’ परिस्थिती असा उल्लेख केल्याने विरोधकांनी रोष व्यक्त केला असताना फडणवीस सरकारचा शेताचे दाखले आणि पीकाचा दिखाऊ सर्वे समोर येत आहे. कारण, सध्या महाराष्ट्र सरकारकडून दुष्काळी ग्रामीण भागाची पाहणी सुरु आहे. परंतु, धक्कादायक म्हणजे राज्य मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी बीडमध्ये रात्रीच्या वेळेला चक्क बॅटरीच्या प्रकाशात पीक पाहणी केल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. पुढे असेच दिखाऊ प्रकार आणि सर्वे अनेक भागात होऊ शकतात अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
7 वर्षांपूर्वी -
शिवस्मारक पायाभरणी; मृत्यू झालेल्या सीए सिद्धेश पवारचं वर्षभरापूर्वीच लग्न झालेलं, कुटुंबावर शोककळा
शिवस्मारक पायाभरणीच्या शुभारंभासाठी समुद्रात गेलेली स्पीड बोट उलटून झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेला ३३ वर्षीय सिद्धेश पवारच वर्षभरापूर्वीच लग्न झालेलं. सिद्धेश मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील गुणदे या गावातील असल्याची माहिती आहे. त्यांच्या बोटीला अपघात झाला तेव्हा, सिद्धेश पवार याचे मामा विक्रांत आंबरे सुद्धा त्याच्यासोबत बोटीवर उपस्थित होते, ते सुद्धा जखमी झाले आहेत. सिद्धेशच्या मामांवर मुंबईतील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार सुरु आहेत.
7 वर्षांपूर्वी -
शिवस्मारक बांधकाम सुरु होण्याआधीच चौकशीच्या फेऱ्यात? विनायक मेटेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी फडणवीसांकडे शिवस्मारकाच्या बांधकामातील अनियमिततेची चौकशी करण्याची लेखी मागणी केल्याचे वृत्त आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनाच अंधारात ठेवून संबंधित कंत्राटदार आणि शिवस्मारकाच्या सल्लागारांनी स्मारकाच्या मूळ रचनेत हवेतसे बदल केले आहेत, असा गंभीर आरोप मेटेंनी लेखी पत्रातून केला आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरोधात थेट हक्कभंग आणण्याचा इशारा मेटेंनी दिला आहे.
7 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र सरकारकडून ‘दुष्काळसदृश’ परिस्थितीची घोषणा
महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील तब्बल १८० तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती असल्याची प्राथमिक घोषणा करण्यात आली आहे. राज्य मंत्रीमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळाबाबत अधिकृत घोषणा केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
युतीचा निर्णय लवकर कळवा नाहीतर विधानसभा आणि लोकसभा एकत्र सामोरे जा
शिवसेनेच्या एकाला चलोरेच्या भूमिकेमुळे भाजपने आता सेनेवर युतीबाबत दबाव टाकण्यास सुरुवात केल्याचे वृत्त आहे. तसेच लवकरात लवकर युतीबाबत कळवलं नाही तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना एकत्रच सामोरे जाण्यास तयार रहा असा अप्रत्यक्ष सज्जड दमच शिवसेना देण्यात आल्याचे वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
मी तिथं सेल्फीसाठी गेले नव्हते, ताजी हवा एन्जॉय करायला गेले होते: अमृता फडणवीस
अमृता फडणवीस यांची अखेर त्या सेल्फीशो बाबत अधिकृत प्रतिक्रिया आलेली आहे. त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, मी त्या ठिकाणी सेल्फीसाठी गेलेच नव्हते. तर शुद्ध हवा अनुभवण्यासाठी गेले होते. तसेच मी ज्या जागेवर बसले होते, ती जागा सुद्धा सुरक्षितच होती, असा अजून एक दावा दावादेखील त्यांनी केला. दरम्यान, माझ्यावर कारवाई केल्यानं एखाद्या माणसाचं जरी भलं होत असेल, तर कारवाई करण्यात यावी, असं अमृता फडणवीस स्पष्ट केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
काय शिकावं यातून? क्रुझच्या टोकावर सेल्फी-शो; मुख्यमंत्र्यांच्या पत्नीसमोर पोलीस हतबल
काल मुंबई-गोवा पहिली आंग्रीया ही अलिशान क्रूझ सेवा सुरू करण्यात आली. दरम्यान, या आलिशान क्रुझच्या शुभारंभाचा कार्यक्रम भाऊच्या धक्क्यावर मोठ्या दिमाखात काल पार पडला. या उदघाटन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी क्रुझच्या टोकावर बसून सेल्फी काढला. परंतु त्यांच्या अशा वागण्याने त्या खूप चुकीचा संदेश देऊन गेल्या आहेत. आपण कुठे आहोत आणि काय करत आहोत याचं साधं भान त्यांना नव्हतं असच म्हणावं लागेल.
7 वर्षांपूर्वी -
राज्य दुष्काळाच्या उंबरठ्यावर; खोट्या विहिरींची राज ठाकरेंकडून पोलखोल
सध्या महाराष्ट्र दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे आणि ग्रामीण भागावर सप्टेंबरच्या सुरुवातीलाच दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारने जलयुक्त शिवार आणि १ लाख २५ हजार विहिरी बांधल्याचा दावा सुद्धा त्यामुळे फसवा ठरल्याने राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून फडणवीसांना लक्ष केले आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज्य दुष्काळाच्या छायेत? मराठवाडा भयाण स्थितीकडे, केवळ २७.७९ टक्के पाणीसाठा
राज्यातील तब्बल २०० तालुक्यांत ७५ टक्के पेक्षा सुद्धा कमी पाऊस झाला असल्याचे वृत्त आहे. राज्याच्या अनेक भागात सरासरीपेक्षा सुद्धा कमी पाऊस पडल्यामुळे महाराष्ट्रातील तब्बल १४ जिल्ह्यामध्ये दुष्काळाची स्थिती ओढवली आहे. सप्टेबर महिन्या अखेर राज्यात सरासरीच्या ७७ टक्के इतक्या पावसाची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे राज्यातील धरणांमधील आजचा एकूण पाणीसाठा २६,७३६ दशलक्ष घनमीटर असून तो प्रकल्पीय पाणी साठय़ाच्या ६५.४८ टक्के इतका आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज्य सरकार 'पी-तू' मोहीम राबविणार...आता दारु सुद्धा घरपोच मिळणार?
दारूच्या शौकिनांसाठी राज्य सरकार आनंदाची बातमी देण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्र सरकार आता एक नवीन धोरण अंमलात आणण्याच्या विचाराधीन आहे, ज्याअंतर्गत दारुची डिलिव्हरी सुद्धा थेट तुमच्या घरपोच दिली जाईल. ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ केसचं प्रमाण कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्याचा सरकारचा मानस आहे असं समजत. त्यामुळे दारू घरपोच देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरू शकत.
7 वर्षांपूर्वी -
भाजपचा गोपनीय सर्वेक्षण अहवाल, जवळपास ५० आमदारांचा निवडणुकीत सुपडा साफ होणार?
भाजपने केलेल्या पक्षाच्या अंतर्गत अहवालात जवळपास ६ खासदारांचा आणि तब्बल ५० च्या आसपास आमदारांचा आगामी निवडणुकीत सुपडा साफ होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त अंतर्गत गोटातून समजले आहे. त्यामुळे ते बंद लिफाफ्यात भाजपच्या आमदारांना तसेच खासदारांना देण्यात आले आहेत. भाजप सरकारने दिल्लीतील ‘चाणक्य’ या संस्थेकडून गुप्तपणे सर्वेक्षण करुन घेतले होते. त्यात हा धक्कादायक अहवाल समोर आला आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
SBI Car Loan | कार खरेदी करण्यासाठी हा आहे सर्वोत्तम बँक पर्याय, 7 लाखाच्या कार लोनवर इतका EMI द्यावा लागेल