3 May 2025 2:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

भाजपा व शिवसेनेची युती तुटल्यास निवडणुकीत दोन्ही पक्षांचा पराभव निश्चित

मुंबई : शिवसेनेच्या स्वबळाचा नारा आणि त्यामुळे भाजपची झालेली राजकीय गोची आता स्पष्ट दिसू लागली आहे. भाजपा शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला तर दोन्ही पक्षांच्या मतांचे विभाजन होऊन त्याचा थेट फायदा आघाडीला होईल. त्यामुळे भाजपा – शिवसेना या दोन्ही पक्षांचा आगामी निवडणुकीत पराभव होऊ शकतो असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘हिंदूस्तान टाइम्स’ या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीदरम्यान केलं आहे.

आगामी निवडणूका स्वबळावर लढविण्याच्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाचा संदर्भ घेऊन मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलं आहे. भाजपा आणि शिवसेनेची युती तुटल्यास निवडणुकीत दोन्ही पक्षांचा पराभव निश्चित होणार, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. शिवसेना हा भाजपचा जुना मित्रपक्ष असून दोन्ही पक्षांची विचारधारा एक समानच आहे, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्ष शिवसेनेला युतीसाठी हात पुढे केला आहे. अमित शहा यांच्या मातोश्री भेटीनंतर राज्यातील भाजपचे नेते शिवसेनेबाबत नरमाईची भूमिका घेत आहेत.

भाजप आणि शिवसेनेच्या मतविभाजनाचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला होईल आणि त्यामुळे शेवटी भाजपा शिवसेना या दोन्ही पक्षांचा पराभव होईल. त्यामुळे युतीत राहून निवडणूका लढविल्यास दोन्ही पक्षांचा फायदा होईल, असे त्यांनी सांगितले. भाजप सुद्धा स्वबळावर लढण्यास तयार आहे. आमचा केवळ २- ३ जागेवर पराभव होईल. पण राष्ट्रीय स्तरावर युती अभेद्य ठेवण्याची गरज आहे. तसेच कितीही झालं तरी शिवसेना हा आमचा जुना मित्रपक्ष आहे, असे फडणवीस यांनी आवर्जून सांगितलं.

शिवसेनेची युतीसाठी मन कस वळवणार या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, राजकीय स्थितीच लोकांना युतीसाठी तयार करते. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष हे कट्टर विरोधक एकत्र येतील असे कधी कोणाला वाटले होते का?. महाराष्ट्रात आघाडीचे सरकार असताना राष्ट्रवादीने काँग्रेसशी फारकत घेतली होती. पण वर्षभरातच दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आले. त्यामुळे शिवसेनेसोबतच्या युतीबाबतही ते शक्य आहे, असे त्यांनी स्पष्ट सांगितले.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या