मोदींनी पाकशी चर्चेची संधी सोडू नये, राज ठाकरेंचे आवाहन - सविस्तर वृत्त

२७ फेब्रुवारी २०१९ रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला शांततेच्या मार्गाने चर्चेतून हा विषय सोडवू असे आवाहन केले आहे. त्यांनी भारत सरकारला पुलवामा हल्ल्याबद्दल पाकिस्तान कनेक्शन चे पुरावे द्यावे, जेणेकरून आम्ही त्यावर पूर्ण सहकार्य करत हवी ती मदत करू असे आवाहन केले होते. आणि काल पुन्हा त्यांनी भारत सरकारला शांततेच्या मार्गाने चर्चेतून हा विषय सोडवू असे आवाहन केले.
राज ठाकरेंनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेज वर जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे कि, जर पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांनी चर्चेचे निमंत्रण दिले आहे तर त्यांनी ताबडतोब भारतीय वैमानिक अभिनंदन यांना भारतात परत पाठवावे आणि बॉर्डरवर होणारा गोळीबार थांबवावा. म्हणजेच आपण खरंच शांततेच्या मार्गाने हा विषय सोडवण्याच्या मानसिकतेत आहेत हे स्पष्ट होईल.
राज ठाकरेंच्या मते जर पाकिस्तान सरकार वैमानिक अभिनंदन यांना सोडत असेल आणि चर्चेसाठी तयार असेल तर मोदींनीहि या चर्चेला तयारी दाखवावी. अशीच चर्चेतून मार्ग काढण्याची संधी स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयीजी आणि जनरल मुशर्रफ यांना मिळाली होती आणि त्याचा योग्य वापर करत अटलजींनी समझोता एक्स्प्रेस सुरु केली. आग्र्यात ऐतिहासिक चर्चा झाली पण दुर्दैवाने ह्या चर्चा पूर्णत्वाला जाऊ शकल्या नाहीत.
जी संधी अटलजींच्या काळात दोन्ही देशांच्या हातून निसटली आहे ती संधी पुन्हा आपल्यासमोर आहे. जर उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया सारखे कट्टर शत्रुराष्ट चर्चेतून मार्ग काढत असतील तर आपण का नाही. युद्ध हे दोन्ही देशांच्या भल्याचे नाही त्यामुळे महागाई बोकाळले आणि काश्मिरी जनतेला याचा नाहक त्रास होईल. तसेच युद्ध हे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर असू शकत नाही. युद्ध दोन्ही देशांना कित्तेक वर्ष मागे घेऊन जाईल.
युद्ध आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण करून कोणीही याचा राजकीय फायदा घेऊ नये. राज ठाकरेंच्या मते दोन्ही देशांनी चर्चेतून मार्ग काढावा आणि दोन्ही देशात शांततेचं वातावरण निर्माण करावं.
शेवटी राज ठाकरेंनी आपल्या पत्रात म्हटले आहे “मी पुन्हा एकदा सांगतो कि युद्ध अथवा युद्धजन्य परिस्थिती हे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर होऊ शकत नाही, आणि त्याचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न करणे हे कोणत्याही उमद्या राजकारण्याचं लक्षण असू शकत नाही, हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं”.
सविस्तर पत्र खालील प्रमाणे:
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Post Office Scheme | पगारदारांनो, पत्नीच्या नावावर पोस्ट ऑफिसमध्ये FD करा, 2 वर्षांनंतर किती परतावा मिळेल पहा
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER