9 May 2025 9:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
7/12 Utara | कौटुंबिक जमीनीच्या 7/12 वर तुमचं नाव आहे? वारसा हक्काने 7/12 वर नाव जोडण्यासाठी लागतात ही कागदपत्रं SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Cash Limit At Home | तुम्ही घरामध्ये किती कॅश ठेवू शकता; नियम लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस येईल Cheque Bounce Alert | चेकने पेमेंट करणाऱ्या 90% लोकांना माहित नाही, ही चुका करू नका, सर्वकाही गमावून बसाल EPFO Money Alert | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, तुमच्या खात्यात EPF चे 1,56,81,573 रुपये जमा होणार Horoscope Today | 09 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

आजचा भारत बंद सरकार पुरस्कृत; मनसेचा धक्कादायक आरोप

MNS Sandeep Deshpande, Maharashtra Bandh

मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA), राष्ट्रीय नागरकत्व नोंदणी (NRC) आणि ईव्हीएमविरोधात बहुजन क्रांती मोर्चातर्फे आज (29 जानेवारी) भारत बंदची हाक देण्यात आली आहे. शिवाय, देशात डीएनएच्या आधारावर राष्ट्रीय नागरिक नोंदणी अर्थात एनआरसी लागू व्हावा, अशीही मागणी करण्यात येत आहे. व्यापारी, दुकानदार, शैक्षणिक संस्था, नागरिकांनी या भारत बंदमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन बहुजन क्रांती मोर्चातर्फे करण्यात आलं आहे. या भारत बंदला शाहीन बागमधील आंदोलक महिलांनाही पाठिंबा दिला आहे.

बहुजन क्रांती मोर्चा, ट्रेड युनियन्स आणि विविध संघटनातर्फे नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि ईव्हीएमला विरोध करण्यासाठी आज भारत बंदची हाक दिली आहे. या बंदवरून मनसेनं राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर आरोप केला आहे. बंद हा सरकार पुरस्कृत असल्याचा गंभीर आरोप मनसेनं केला आहे.

आजच्या बंदच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. त्यासाठी सर्व जिल्ह्यांना अलर्टही जारी करण्यात आला आहे. याशिवाय संवेदनशील भागांमध्ये विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. बहुजन क्रांती मोर्चाच्या या भारत बंदला एनआरसी-सीएएचा विरोध करणाऱ्या इतर संघटनांचाही पाठिंबा मिळण्याची शक्यता होती.

अनेक ठिकाणी या बंदला प्रतिसाद मिळत आहे. या बंदवरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मनसेनं राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. राज्यातील बंद हे सरकार पुरस्कृत आहे. राज्य सरकारच बंद पुकारत आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिली. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. भारत बंदबाबत नेमकं तेच घडत आहे, असंही ते म्हणाले.

नागरिकत्व सुधारित  कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) या दोन वेगळ्या गोष्टी आहे. मनसेचा सीएए कायद्याला विरोध असून एनआरसी कायद्याला आमचा पाठिंबा असल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले. राज ठाकरे यांनी आधीही आपल्या भाषणातून भारतात असलेल्या पाकिस्तानी आणि बांग्लादेशींना हकलून द्या असा उल्लेख केला होता असं देखील संदीप देशपांडे यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

Web Title:  MNS leader Sandeep Deshpande has alleged todays Maharashtra Bandh Government sponsored.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या