30 April 2024 12:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | IRFC सह हे टॉप 10 शेअर्स खरेदी करा, ट्रेडिंग व्हॉल्यूम विक्रम तोडत आहेत, मोठी कमाई होईल IREDA Share Price | PSU IREDA शेअर्स श्रीमंत करू शकतात, अवघ्या 5 महिन्यात दिला 440% परतावा, खरेदी करणार? Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स आता सुसाट तेजीच्या दिशेने, तज्ज्ञांकडून स्टॉक सपोर्ट लेव्हल सह टार्गेट प्राइस जाहीर Infosys Share Price | इन्फोसिस आणि TCS सह 7 IT शेअर्स मालामाल करणार, मिळेल 39 टक्केपर्यंत परतावा SBI Mutual Fund | अशी म्युच्युअल फंड योजना निवडा, अवघ्या 25 हजार रुपयांची गुंतवणूक देईल 16 लाख रुपये परतावा Guru Rashi Parivartan | 'या' 4 भाग्यवान राशींमध्ये तुमची राशी आहे? 1 मे पासून गुरू रशिपरिवर्तन नशीब बदलणार Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
x

मनसेचे नाव पुढे करून आयोजकांवर नागपूरहून दबाव आला का? असीम सरोदे

मुंबई : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित उद्घाटक साहित्य अकादमी पुरस्कारविजेत्या लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्याच्या निर्णयावरुन मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. मनसेच्या स्थानिक शाखेने इंग्रजी लेखिका असल्याच्या कारणावरून सहगल यांना विरोध केल्याने त्यांचे निमंत्रण रद्द केले असे आयोजक कारणं देते आहे.

दरम्यान, वकील असीम सरोदे यांनी सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यावरुन आयोजकांसमोर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी समाज माध्यमांवर केलेल्या पोस्ट मध्ये ते म्हणतात की, ‘मनसेचे नाव पुढे करून कुणाच्या सांगण्यावरून नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यात आले ? कुणाच्या गैरसोयीचे त्या बोलणार होत्या? आयोजकांवर नागपूरहून दबाव आला का? यात मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात, कट्टरवादी विचारसरणीचा हस्तक्षेप आहे का? असे अनेक गंभीर प्रश्न सरोदे यांनी सार्वजनिकरित्या उपस्थित केले आहेत. दरम्यान स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पत्रक प्रसिद्ध करुन स्वतःची आणि पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट करून विषय निकाली काढला आहे.

दरम्यान, डॉ. वि. भि. कोलते संशोधन केंद्र व वाचनालय या संस्थेकडे संमेलनाचे यजमानपद आहे. संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांनी नयनतारा सहगल यांना पत्र पाठवून उद्घाटक म्हणून दिलेले निमंत्रण आम्ही रद्द करीत असल्याचे कळवले आहे. त्यात मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला इंग्रजीत लिहिणाऱ्या लेखिकेला का बोलावले, असा आक्षेप नोंदवत काही स्थानिक संघटनांनी संमेलन उधळण्याचा इशारा दिल्याने आम्ही हे निमंत्रण रद्द करीत असल्याचे कारण त्यांनी पुढे रेटले होते. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त करताना म्हटलं होतं की एवढा मोठा निर्णय एखाद्या स्थानिक शाखेच्या सांगण्यावर आयोजक कसे काय घेऊ शकतात असा प्रश्न उपस्थित करत दुसरीच शंका व्यक्त केली होती.

नेमके कोणते प्रश्न उपस्थित केले आहेत असीम सरोदे यांनी फेसबुक पोस्ट द्वारे?

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x