17 May 2024 2:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, संधी सोडू नका Rajnish Retail Share Price | अवघ्या 63 पैशाचा शेअर! 4 वर्षात दिला 14000% परतावा, स्टॉक आजही स्वस्त आणि फायद्याचा Suzlon Share Price | सुझलॉन स्टॉक ब्रेकआऊट लेव्हल अपडेट, शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा सल्ला काय? IREDA Share Price | तज्ज्ञांचा IREDA शेअर्स 'Hold' चा सल्ला, या प्राईसवर मजबूत सपोर्ट, पुढची टार्गेट प्राईस जाहीर HDFC Mutual Fund | अबब! जबरदस्त म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 9.57 कोटी रुपये परतावा दिला Gold Rate Today | टेन्शन वाढलं! आज सोन्याचा भाव अजून महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या My EPF Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यातही पैसे जमा झाले असतील तर पटापट तपासून घ्या, नियम बदलला
x

Telangana Election | तेलंगणा विधानसभा निवडणुकीतही बहुमताने सत्ता आणण्याची योजना आखात आहे काँग्रेस, KCR यांची चिंता वाढली

Telangana Assembly Election 2023

Telangana Assembly Election 2023 | तेलंगणा विधानसभा निवडणुकीत चांगल्या कामगिरीच्या शक्यतेबद्दल कॉंग्रेस खूप उत्सुक आहे. कर्नाटक पाठोपाठ तेलंगणाही जिंकण्याचा पक्षाला विश्वास आहे. राहुल गांधींच्या जाहीर सभांना होणारी ऐतिहासिक गर्दी आणि भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) नेत्यांचे काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर होणारं पक्षांतर आणि तेलंगणात नगण्य अस्तित्व असलेला भाजप पक्ष आणि त्यातही प्रदेश भाजपमधील अंतर्गत कलह यामुळे काँग्रेस पक्षाचा हा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

तेलंगणात बीआरएसशी थेट लढत असल्याचे काँग्रेसच्या रणनीतीकारांचे देखील मत आहे. बीआरएसचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव राज्याच्या स्थापनेपासून मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. मात्र आता लोक अनेक मुद्द्यांवर KCR सरकारवर नाराज आहेत आणि मतदारांच्या मोठ्या वर्गाला बदल हवा आहे. हे आव्हान स्वीकारण्यास पक्ष तयार आहे असं काँग्रेसच्या रणनीतीकारांनी सांगितले.

खम्मम रॅलीने बदलले वातावरण

खम्मम रॅलीतील गर्दीमुळे वातावरणही बदलल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. बीआरएसच्या आणखी अनेक नेत्यांना काँग्रेसमध्ये यायचे आहे. पण काँग्रेस पक्ष सध्या घाई करण्याच्या बाजूने नाही. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊ, असे प्रदेश काँग्रेसच्या एका नेत्याने माध्यमांना सांगितले. सुमारे तीन डझन मोठ्या बीआरएस नेत्यांनी यापूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

तेलंगणाच्या निर्मितीत काँग्रेसने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यूपीएने २०१४ मध्ये तेलंगणाची स्थापना केली होती. या मुद्द्यावर मतदारांना प्रभावित करण्यात पक्षाला अपयश आले आहे. पण यावेळी पक्ष आक्रमक पवित्रा घेऊन निवडणूक लढवत आहे. तेलंगण काँग्रेसचे अध्यक्ष ए. रेवंत रेड्डी म्हणाले की, आम्ही पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवू आणि बहुमताने सत्तेत येऊ.

लवकरच उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता

विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा करण्यासाठी २७ जून रोजी काँग्रेस मुख्यालयात झालेल्या बैठकीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचणे, पाच महत्त्वाच्या आश्वासनांसह निवडणूक जाहीरनामा सोपा करणे आणि जनतेशी संबंधित मुद्दे मांडण्याचा सल्ला दिला होता. यामुळे पक्ष लवकरच उमेदवारांची घोषणा करू शकतो. परिणामी स्थानिक नेत्यांना तयारीला मोठी वेळ मिळेल.

प्रदेश काँग्रेसला भाजपची फारशी चिंता नाही. २०१९ नंतर भाजपचा आलेख वाढण्याऐवजी घसरला आहे, असे प्रदेश काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले. केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांना प्रदेशाध्यक्ष केल्यास भाजपला फारसा निवडणुकीत फायदा होणार नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत CRPF शहीद जवानांच्या नावाने मतं मागत भाजपने 4 जागा जिंकल्या होत्या. मात्र आता लोकं त्यांच्या या राजकारणाला बळी पडणार नाहीत आणि ते महागाई ने त्रस्त असून याच मुद्यावर आणि बेरोजगारीवरून भाजपाला मतं देणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला.

तेलंगणात पक्षांचे बलाबल

2018 च्या विधानसभा निवडणुकीत बीआरएसला (तत्कालीन तेलंगणा राष्ट्र समिती) 88 जागांसह 47 टक्के मते मिळाली होती. भाजपला एका जागेसह सात टक्के मते मिळाली तर काँग्रेसला १९ जागांसह २८ टक्के मते मिळाली. तर एमआयएमला सुमारे तीन टक्के मतांसह सात जागा मिळाल्या होत्या.

News Title : Telangana Assembly Election 2023 Congress in action mode 11 July 2023.

हॅशटॅग्स

#Telangana Assembly Election 2023(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x