4 May 2024 2:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

सेनेचे सर्व मंत्री बिनकामाचे असा आरोप करणाऱ्या सेना आमदाराने राज्य काँग्रेसमुक्त होऊ दिलं नाही

Congress, Shivsena, Loksabha Election 2019

चंद्रपूर : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आघाडीची पुरती धूळदाण झाली आहे. राष्ट्रवादीने ५ तरी जागा जिंकल्या आहेत, मात्र काँग्रेस पक्ष केवळ एका जागेवर शिल्लक राहिला आहे आणि ती जागा आहे चंद्रपूरची जिथे भाजपचे हंसराज अहिर पराभूत झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमुक्त होण्यापासून थोडक्यात वाचला आहे.

मात्र राज्य काँग्रेसमुक्त होण्यापासून वाचलं आहे ते एका शिवसेना आमदारामुळे जे सध्या भाजपचे हंसराज अहिर यांना धूळ चारूल खासदार झाले आहेत. मागील काही महिन्यापूर्वी बाळू धानोरकर शिवसेनेचे आमदार असताना पक्षाच्या मेळाव्यात अनेक मान्यवर नेते मंचावर असताना पक्षाचे मंत्री आमदारांना कोणतीही मदत करत नाहीत आणि ते आमच्यासाठी व सामान्य जनतेसाठी बिनकामाचे असल्याचा जाहीर आरोप मंचावरूनच केला होता.

तसेच शिवसेनेचे मंत्री विदर्भातील नेतेमंडळींना दुय्यम स्थान देत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला होता. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस त्यांने अखेर शिवसेनेला जय महाराष्ट्र करत बाळू धानोरकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि याच लोकसभा निवडणुकीत जाईंट किलर ठरले आणि चंद्रपूरच्या खासदार हंसराज अहिर यांना माजी खासदार करत स्वतः बाळू धानोरकर चंद्रपूरचे खासदार झाले आहेत. त्यामुळे ही एकमेव जागा आहे जी काँग्रेसने राज्यात जिंकली आहे आणि त्यामुळे एका माजी शिवसैनिकानेच महाराष्ट्र काँग्रेसमुक्त होण्यापासून रोखला आहे असंच म्हणावं लागेल.

हॅशटॅग्स

#Congress(527)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x