26 April 2024 10:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | होय! या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, फायद्याचा मोठा व्याज दर SBI Mutual Fund | तज्ज्ञांनी सुचवल्या 5 व्हॅल्यू फंड योजना, SBI सहित मालामाल करणाऱ्या टॉप SIP योजना सेव्ह करा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढवणारी अपडेट, थेट महागाई भत्ता आणि HRA होणार परिणाम Old Vs New Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीतून नव्या टॅक्स प्रणालीकडे कोणी जावे? डिक्लेरेशन पूर्वीच समजून घ्या Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

चौकीदार सो रहा हैं! चीनच्या दोन बोटी परवानगी नसताना दाभोळ खाडीत

Konkan, Dabhol

रत्नागिरी : भारताचा सागरी किनारा किती असुरक्षित आहे त्याचा अजून एक धक्कादायक पुरावा समोर आला आहे. अरबी समुद्रच्या मार्गे कोकणातल्या दाभोळ खाडीत चीनच्या दोन मासेमारी करणाऱ्या बोटी आढळून आल्या आहेत. संबंधित बोटींवर तब्बल ३७ खलाशी असल्याचं वृत्त आहे. या बोटी दुरुस्तीसाठी आणल्याचा दावा बोट मालकांनी केला आहे. परंतु या बोटींकडे कुठलीही परवानगी नाही अशी महत्वपूर्ण माहिती पुढे आली आहे.

चीनच्या या मासेमारी बोटी १५० फुट लांबीच्या आहेत. या मोठ्या बोटी आढळून आल्याने सुरुवातीला सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. दुसऱ्या देशाच्या हद्दीत जाण्यासाठी संबंधीत बोटींना विविध परवानग्या घ्याव्या लागतात. त्यानंतरच अशा बोटी त्या सागरी हद्दीत प्रवेश शक्य असतो. त्यामुळे दाभोळ पोलीस आणि विविध सुरक्षा संस्था आता या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

या प्रकरणी रत्नागिरीतल्या खाजगी मरीन एजन्सीची देखील या गंभीर विषयाला अनुसरून सखोल चौकशी सुरु असल्याचे वृत्त आहे. या बोटींविषयी कुठलीच पूर्वकल्पना नसल्याने त्याविषयीचं गुढ वाढलं आहे. भारतामध्ये चीनबद्दल कायम संशयाचं वातावरण असल्याने सुरक्षा कारणांबाबातही चिंता व्यक्त करण्यात येत आहेत. परवानगी नसताना या बोटी जर दाभोळ खाडीपर्यंत आल्या असतील तर त्या एवढ्या आतमध्ये येईपर्यंत कुणालाच कसं कळालं नाही असाही प्रश्न विचारण्यात येतोय. तटरक्षक दल किंवा नौदलाला या बोटींविषयी काही माहिती का कळली नाही असाही प्रश्न आता विचारण्यात येतोय.

या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनाही कळविण्यात आल्याची माहिती आहे. या बोटींकडे कुठलीही परवानगी आढळून आली नाही तर तो सागरी सुरक्षा यंत्रणांना धक्का असणार आहे. या आधाही कोकण किनाऱ्यावरून अवैध शस्त्रास्त्र आल्याची प्रकरणं उघडकीस आली होती.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x