26 April 2024 12:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली Bonus Shares | खरेदी करा हा शेअर! फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील, शेअरने 6 महिन्यांत 210% परतावा दिला Post Office Interest Rate | होय! या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, फायद्याचा मोठा व्याज दर SBI Mutual Fund | तज्ज्ञांनी सुचवल्या 5 व्हॅल्यू फंड योजना, SBI सहित मालामाल करणाऱ्या टॉप SIP योजना सेव्ह करा
x

उद्धव ठाकरेंना परदेश दौरा संपल्यावर शेतकऱ्यांची आठवण: अजित पवार

Ajit Pawar, Sharad Pawar, Udhav Thackeray, Shivsena, NCP, Drought in Maharashtra state

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागली असून, आतापासूनच आरोप-प्रत्यारोप सुरु झाली आहे. त्यातच, परदेशी दौरे करून आल्यावर शिवसेनेला शेतकऱ्यांची आठवण येत असल्याची टीका, एनसीपीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. एनसीपी पक्षाचा आज २० वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने ते बोलत होते.

सत्तेत असून शिवसेना म्हणते की, शेतकऱ्यांना पिकविम्याचे पैसे मिळाले नाही तर, आम्ही बघून घेऊ. शिवसेनला अजून देखील कळेना, आपण विरोधीपक्षात आहे की सत्ताधारी पक्षात. असा सणसणीत टोला अजित पवार यांनी शिवसेनेला लगावला. परदेशी दौरे पूर्ण झाली आहे शिवसेनेचे, दौरे पूर्ण झाल्यांनतर आता त्यांना दुष्काळाची आठवण येत आहे, असा खोचक टोला अजित पवारांनी सेनेला लगावला.

लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेत परिस्थिती रहणार नाही. समविचारी पक्षांना एकत्र घेऊन चालायचे आहे. त्यासाठी अनेकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही पवार म्हणाले. जनतेने आम्हाला पंधरा वर्षे संधी दिली होती,त्यामुळे, त्या जनतेसाठी जे-जे करता येईल ते करण्याचा आम्ही प्रयत्न करू असे पवार म्हणाले. राम मंदिराच्या मुद्यावरूनही अजित पवारांनी शिवसेनेचा समाचार घेतला. भावनिक मुद्दे हाती घेऊन सेना मते मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असते. शिवसेना राम मंदिराचा विषय पुढे करून फक्त राजकरण करत असल्याचे अजित पवार म्हणाले.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x