29 April 2024 12:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

असलेलं नीट सांभाळता येत नाही आणि निघालेत स्मार्ट सिटी करायला - अजित पवार

ajit pawar, ncp congress, bjp, shivsena, bjp maharashtra, devendra fadnavis, uddhav thackeray

सध्या मुसळधार पाऊसामुळे मुंबईची तुंबई झाल्याचे सर्वत्र पाहायला मिळत आहे. मुंबईत मुसळधार पावसामुळे मालाडमध्ये भिंत कोसळून दुर्घटना झाली आणि या दुर्घटनेवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवसेना – भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधत महापौरांना तुंबलेली मुंबई दिसत नाही तसेच हा सत्तेचा माज आणि सरकारचा बेजबाबदारपणा आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली.

पुढे अजित पवार म्हणाले दरवर्षी मुंबई महानगरपालिका नालेसफाई झाल्याचा दावा करते आणि प्रत्येकवर्षी तो दावा फोल ठरतो. सरकार यावर काहीच खबरदारी घेत नसल्याने माणसं किड्या-मुंग्यांसारखी मरत आहेत. जे आधीच आहे तेच सरकारला आणि महानगरपालिकेला सांभाळता येत नाही आणि निघालेत स्मार्ट सिटी करायला, असा टोला देखील अजित पवारांनी लगावला.

मालाडमधील पिंपरीपाडा परिसरातील झोपड्यांवर भिंत कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. यात १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच जवळपास ६० जखमी झाले आहेत. या घटनेनंतर मुंबईकरांनी पालिका प्रशासनाच्या पावसाळी उपाययोजनांवर प्रश्न उपस्थित केला.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x