27 April 2024 1:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | एका वर्षात 67 टक्के परतावा देणाऱ्या येस बँक शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, दिले फायद्याचे संकेत IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, स्टॉकला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट Vedanta Share Price | कमाईची सुवर्ण संधी! वेदांता शेअर्स अल्पावधीत देईल 40 टक्के परतावा, वेळीच फायदा घ्या PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर! एका वर्षात 450% परतावा दिला, स्टॉक चार्टवर पुन्हा तेजीचे संकेत Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार, फायदा घ्या! ही कंपनी 1 शेअरवर 3 फ्री बोनस शेअर्स देणार Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र गुंतवणूकदारांची चांदी, लाभांश जाहीर, शेअर्स खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Post Office Interest Rate | महिलांच्या प्रचंड फायद्याची खास योजना, बचतीवर मिळेल मोठा व्याज दर, परतावा रक्कम?
x

महाराष्ट्रात लोकशाहीची चेष्टा चालवली आहे; चिराग पासवान यांची भाजपवर टीका

Chirag Paswan, BJP, Govt Formation

मुंबई: महाराष्ट्रात स्थापन झालेल्या देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकारविरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने (Shivsena, NCP and Congress) केलेल्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता आदेश देणार आहे. दोन्ही बाजूंकडून सोमवारी सकाळी दीड तास चाललेल्या सुनावणीनंतर, सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला. बहुमत नसताना घाईघाईने शपथविधी सोहळा उरकणाऱ्या फडणवीस सरकारचा शपथविधी उरकण्यात आला आहे. त्यामुळे विश्वासमताची तारीख लवकरात निश्चित करण्यात यावी, अशी मागणी करत या तिन्ही पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court of India) याचिका केली आहे.

तत्पूर्वी, शिवसेना-काँग्रेस-एनसीपी यांच्यासह छोटय़ा पक्षांच्या १६२ सदस्यांच्या पाठिंब्याचे पत्र एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात आणि जयंत पाटील यांनी राजभवनात जाऊन सादर केले. या वेळी राज्यपाल नवी दिल्लीत होते, पण त्यांच्या सचिवालयाकडे हे पत्र देण्यात आले. १६२ आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे. त्यामुळे फडणवीस सरकार (Devendra Fadnavis Government) हे अल्पमतात असल्याचे सिद्ध होते, असे जयंत पाटील म्हणाले.

अजित पवारांचा (Ajit Pawar) आदेश न मानल्यास अपात्रतेची कारवाई होईल, अशी भीती नवीन आमदारांना दाखवली जात होती. पण ते चुकीचे आहे. राष्ट्रवादीने अजित पवार यांना गटनेतेपदावरून दूर केले आहे. त्यामुळे आता अजित पवार यांना पक्षादेश काढण्याचा अधिकारच उरलेला नाही, असे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी आमदारांना मार्गदर्शन करताना स्पष्ट केले. अजित पवार यांनी पक्षादेश काढलाच तर त्यांच्याविरोधात मतदान करणाऱ्यांवर कसलीही कारवाई होणार नाही, अशी ग्वाही पवार यांनी दिली.

दुसरीकडे, केंद्रातील सत्तेतल्या एनडीएचा घटकपक्ष असलेल्या लोजपाच्या चिराग पासवान (Chirag Paswan) यांनी या सर्व प्रकारावर सडकून टीका केली आहे. महाराष्ट्रात लोकशाहीची चेष्टा चालवली आहे. महाराष्ट्रात आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. याहून लोकशाहीचा आणखी विनोद होऊ शकत नाही. जर माझ्या हातात असतं तर मी प्रामाणिकपणे पुन्हा जनादेश घेतला असता. पुन्हा जनतेमध्ये जाऊन पुन्हा लोकांचे विचार जाणून घेतले असते. महाराष्ट्रात जी राजकीय परिस्थिती उद्भवलेली आहे ती अत्यंत चुकीची आहे.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x