नवा शोध! प्रादेशिक पक्षांमुळे भ्रष्टाचार होतो...आइन्स्टाइनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला सांगणारे सुद्धा हेच
नवी दिल्ली: भारताच्या राजकारणात प्रादेशिक पक्षांची भूमिका योग्य नाही. देशानं १९९०-२०००मध्ये राजकीय अस्थिरता पाहिली आहे. प्रादेशिक पक्ष हे देशाच्या राजकारणासाठी योग्य नाहीत. प्रादेशिक पक्षांमुळेच भ्रष्टाचार होतो, असा आरोपही पीयूष गोयल यांनी केला आहे. लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्यात मुलाखती दरम्यान ते बोलत होते.
त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातल्या राजकारणावरही भाष्य केलं आहे. आम्ही युती म्हणून लढलेल्या २८८ पैकी १६४ जागा जिंकलो. भारतीय जनता पक्षानं १०५ जागांवर विजय मिळवला. महाराष्ट्रात आम्ही ६५-७० टक्के मतं मिळवून विधानसभेत पोहोचलो. पण शिवसेनेनं आमच्याशी गद्दारी केली. युतीचा धर्म पाळला नाही. जर भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रात स्वबळावर निवडणुका लढवल्या असत्या तर आमचं सरकार नक्कीच आलं असतं. शिवसेना शत्रूच्या गोटात जाऊन सामील झाली. शिवसेनेनं सर्वच सिद्धांत मोडीत काढले आहेत. शिवसेना कालपर्यंत ज्यांच्यावर टीका करत होती, त्यांच्यासोबतच जाऊन बसली आहे.
महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारला कोणतीही दूरदृष्टी किंवा ध्येयधोरणं नाहीत. त्यामुळे देशाला या सरकारनं नुकसानच होणार आहे. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षालाच विजय मिळालेला आहे, इतर तिन्ही पक्षांचा पराभव झालेला आहे. शिवसेनेच्या अरविंद सावंतांसाठी मी गल्लीबोळात जाऊन प्रचार केला होता, दक्षिण मुंबईतली जनता शिवसेनेला मतं देऊ इच्छित नव्हती. आम्हाला त्यावेळी माहिती नव्हतं की, हे लोक गद्दारी करतील. शिवसेनेनं आपल्या सिद्धांतांशी फारकत घेत महाराष्ट्रात सरकार बनवलं. आता ते स्वतःला हिंदू सम्राट म्हणायलाही घाबरतात, असंही केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी अधोरेखित केलं आहे.
प्रादेशिक पक्षांमुळे भ्रष्टाचार होतो असं सांगणारे पियुष गोयल यांच्या कुटुंबातील सदस्यांवर असेच आरोप झाले होते. दोन वर्षांपूर्वी केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल वादात अडकले होते. कारण २००५-०६ मध्ये केवळ १ लाखात कंपनी सुरु केलेली कंपनी जी सध्या त्यांच्या पत्नी सीमा गोयल यांच्या मालकीच्या होत्या त्या कंपनीच्या नफ्यात तब्बल ३००० पट वाढ झाली होती. त्यांच्या पत्नीच्या मालकीची कंपनी इंटरकॉन एडव्हायजर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी २००५- ०६ मध्ये केवळ १ लाख रुपयांची गुंतवणूक करुन सुरु करण्यात आली होती. त्यामुळे केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या पुढील अडचणी वाढल्या होत्या. काँग्रेसने थेट पत्रकार परिषद घेऊन त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती देत त्यांच्या कंपनीवर गंभीर आरोप केले होते.
अजब दावे करणाऱ्या भाजपच्या नेत्यांमध्ये, ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी ओला, उबरला जबाबदार धरल्यानं अर्थमंत्री निर्मला सीतारमन सोशल मीडियावर ट्रोल झाल्या होत्या. त्यानंतर रेल्वे मंत्री पीयूष गोयल नेटकऱ्यांच्या रडारवर घेतले होते. त्याला कारण होतं, गुरुत्वाकर्षणाचा शोध लावताना आईनस्टाईनला गणिताची मदत झाली नव्हती, असं अजब विधान गोयल यांनी केलं. यानंतर सोशल मीडियानं गोयल यांची चांगलीच खिल्ली उडवली होती. अर्थव्यवस्थेचा विचार करताना मोठमोठ्या आकड्यांमध्ये पडण्याची गरज नसते. आइन्स्टाइन यांनी आकडे आणि गणिताची चिंता केली असती तर त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध कधीच लावला नसता, असं गोयल यांनी सांगितलं होतं.
“Maths never helped Einstein discover Gravity”: Piyush Goyal pic.twitter.com/ClIIqXFvxb
— Newsd (@GetNewsd) September 12, 2019
गोयल यांच्या या वक्तव्यावर सीपीआयएमचे नेते सीताराम येचुरी यांनीही जोरदार टीका केली होती. ‘अर्थव्यवस्थेच्या गणिताची जाणीव होण्यासाठी सरकारने डोक्यावर सफरचंद पडण्याची वाट पाहू नये. हे सांगण्यासाठी आम्हाला आइन्स्टाइनचीही (न्यूटनची माफी मागून) गरज नाही. भविष्यातील स्वप्नांच्या मागे धावण्यापेक्षा मंत्र्यांनी वास्तवावर लक्ष केंद्रीत केलं तर बरं होईल,’ असा टोला येचुरी यांनी लगावला होता.
The govt shouldn’t wait for an apple to fall on its head before it realises that the Math about the economy is all bad. It doesn’t even need an Einstein (due apologies to Newton) to tell us that. Instead of focusing on distant dreams, minister would do well to focus on reality. https://t.co/rhegLhpcIf
— Sitaram Yechury (@SitaramYechury) September 12, 2019
Local Parties are Responsible for Corruption in States says Union Minister Piyush Goyal
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या
- Old Vs New Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीतून नव्या टॅक्स प्रणालीकडे कोणी जावे? डिक्लेरेशन पूर्वीच समजून घ्या
- Bank Account Alert | महाराष्ट्रातील या बँकेत तुमचं खातं आहे? आता पैसे काढू शकणार नाही, RBI ने बंदी घातली
- Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल
- Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल
- Penny Stocks | गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे 10 पेनी शेअर्स, अप्पर सर्किट हीट गतीने पैसा वाढतोय
- Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार?
- Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा