27 April 2024 9:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

कर्नाटक: त्या आमदारांची धमकी..ही मंत्रालय द्या अन्यथा...येडियुरप्पा तातडीने दिल्लीला

Karnataka, Chief Minister BS Yeddyurappa

बंगळुरू: कर्नाटक विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या आणि आपली जागा निश्चित करणाऱ्या मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्यासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. येडियुरप्पा यांनी विजयी आमदारांना मंत्रीपदाची ऑफर दिली पण त्यांच्या अपेक्षा मोठ्या झाल्या आहेत आणि आमच्यामुळेच सरकार टिकणार आहे त्यामुळे त्यांनी मोठ्या मागण्या पुढे रेटल्या आहेत. आमदारांच्या मनात काहीतरी वेगळंच आहे असं वृत्त आहे. त्यांना केवळ मंत्रीपदावरच आनंद नाही, तर त्यांना मोठी आणि महत्वाची खाती हवी आहेत आणि ती दिल्यास पक्षातील मोठ्या नेत्यांना खुर्च्या खाली कराव्या लागतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

कर्नाटक विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजपने एकूण १२ जागा जिंकल्या. या जागांवर विजय मिळविणारे नेते असे आहेत की ज्यांनी कॉंग्रेस किंवा जेडीएसमधून बंड केले आणि भाजपच्या समर्थनार्थ पुढे आले. येडियुरप्पा यांचे सरकार वाचविण्यासाठी ७ आमदारांची गरज होती, त्यामुळे या निकालांनी येडियुरप्पा यांच्या नेतृत्वात भाजपा सरकारला बळ दिले. हेच कारण होते की निकाल येताच येडियुरप्पा यांनी विजयी आमदारांना मंत्री करण्याची घोषणा केली.

निकाल लागल्यानंतरच येडियुरप्पा म्हणाले की विजयी झालेल्या १२ पैकी ११ आमदारांना कॅबिनेट मंत्री केले जाईल. मात्र, येडियुरप्पा यांच्या या ऑफरवर नवनिर्वाचित आमदार खूश नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना गृह, पीडब्ल्यूडी, पाटबंधारे आणि ऊर्जा यासारखी महत्वाची खाती देण्यात यावीत, अशी मागणी आमदार करत आहेत.

मजबूत मंत्रालयांची मागणी का आहे?

नवनिर्वाचित आमदारांनीही त्यांच्या मागणी मागील कारण सांगितले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या आमदारांचा असा विश्वास आहे की येडियुरप्पा सरकार स्वबळावर चालत आहे, अशा परिस्थितीत त्यांना मजबूत मंत्रालये दिली जावीत. एवढेच नव्हे तर निवडणूक हरलेल्या तीन नेत्यांकडे दुर्लक्ष करू नये अशी मागणी आमदारांकडून केली जात आहे. पोटनिवडणुकीत एमटीबी नागराज, विश्वनाथ आणि रोशन बेग यांचा पराभव झाल्याने त्यांचा देखील विचार करून पुनर्वसन करावं.

बेंगळुरूमध्ये आज मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि नवनिर्वाचित आमदार यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक आहेत. असं म्हटलं जात आहे की त्यानंतर येडियुरप्पा गुरुवारी दिल्ली गाठतील आणि आमदारांच्या मागणीवर हाय कमांडशी चर्चा करतील. आमदार आपली मागणी नाकारण्यास तयार नाहीत असे सांगितले जात आहे, अशा परिस्थितीत येडियुरप्पा यांच्यासमोर स्थिर सरकार चालवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. मात्र अशा परिस्थितीत येडियुरप्पा नवनिर्वाचित आमदारांची मागणी पूर्ण करण्यासाठी कोणता मार्ग अवलंबतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

BJPs Challenge Run Stable Government in Karnataka State Chief Minister BS Yeddyurappa Left for Delhi Immediately

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x