26 April 2024 11:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

बिहारला वादळाचा तडाखा; वीज कोसळून तब्बल ८३ जणांचा मृत्यू

Bihar, lightning strikes, Storm

पाटणा, २५ जून : बिहारमध्ये गुरुवारी आलेल्या वादळाने राज्यात थैमान घातलं असून यात मोठी जीवितहानी झाली आहे. राज्यात विविध भागात वीज कोसळून तब्बल ८३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सर्वाधिक १३ बळी हे गोपालगंज जिल्ह्यात गेले आहेत. मोठ्या प्रमाणावर झालेल्या या जीवितहानीमुळे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी वादळात मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांसाठी प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

बिहारमध्ये गुरूवारी वादळामुळे प्रचंड जीवितहानी झाली आहे. वादळादरम्यान राज्यात ठिकठिकाणी विजा कोसळून तब्बल ८३ नागरिक मरण पावले आहेत. यात सर्वाधिक वीजबळी गोपालगंज जिल्ह्यात गेले आहेत. गोपालगंजमध्ये वीज कोसळून १३ लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे मधुबनी व नबादा जिल्ह्यात प्रत्येकी ८ लोक मरण पावले आहेत.

बिहारमधील आठ जिल्ह्यामध्ये ५ वीजबळी गेले आहेत. यात गोपालगंज, पूर्वी, चंपारण, सिवान, बांका, दरभंगा, भागलपूर, मधुबनी व नबादा यांचा समावेश आहे. मृतांच्या आकडा समोर आल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मृतांच्या कुटुंबीयांना मदतीची घोषणा केली आहे. वीज कोसळून मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रूपयांची मदत देण्याची घोषणा नितीशकुमार यांनी केली आहे.

 

News English Summary: The storm that hit Bihar on Thursday has taken a heavy toll on the state. As many as 83 people have been killed in lightning strikes in various parts of the state. The highest number of 13 victims have gone to Gopalganj district.

News English Title: 83 people have been killed in lightning strikes in various parts of the Bihar state News latest Updates.

हॅशटॅग्स

#Bihar(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x