26 April 2024 11:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

धाडसी निर्णय घेतले पाहिजेत, पण सरकारची तशी तयारी दिसत नाही - देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis, Corona Virus, Unlock, MahaVikas Aghadi, CM Uddhav Thackeray

मुंबई, ३१ जुलै : “लॉकडाउन की, अनलॉक यामध्ये आता पडता येणार नाही. आता अनलॉकचं करावं लागेल. कोरोनाशी लढाई लढताना अर्थतंत्र पूर्वपदावर आणण्याचा विचार करावाच लागेल. अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्याच्या दृष्टीने योजना तयार केली पाहिजे. पण सरकारचा तसा विचार दिसत नाही”अशा शब्दात राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना ठाकरे सरकारवर टीक केली. एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ कार्यक्रमात ते बोलत होते.

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झालं आणि एक नवी आघाडी उदयास आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं. महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच राज्याला कोरोनाने विळखा घातला. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच आहे. अशातच आता या जीवघेण्या कोरोना व्हायरसमधून महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी सरकारचं व्हिजन काय आहे? त्याचबरोबर कोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या परिणामांचा सरकार कसा सामना करणार आहे? तसेच सरकारला त्यांच्या कार्याची जाण करुन देणाऱ्या विरोधकांची भूमिका काय आहे? हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझाचा खास उपक्रम माझा महाराष्ट्र माझं व्हिजन हा कार्यक्रम आज होणार आहे. पहिल्या सत्रात माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपलं व्हिजन मांडलं आहे.

“धाडसी निर्णय घेतले पाहिजेत पण सरकारची तशी तयारी दिसत नाही असेही ते म्हणाले. मुंबईत दिवसाला पाच ते साडेपाच हजार चाचण्या होत आहेत. चाचण्यांचे हे प्रमाण पुरेसे नाही. सरकारने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आवश्यक असलेले निर्णयही घेतलेले नाहीत” अशी टीका त्यांनी केली.

कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी दिल्लीत राज्य आणि केंद्र सरकारने केलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले. दिल्लीत २८ हजारच्या आसपास चाचण्या सुरु आहेत. तिथे आयसोलेशन सेंटर उभारण्यात आली. महाराष्ट्रात चाचण्यांचा वेग कमी आहे. त्यामुळे आयसोलेशन सेंटर रिकामी आहेत. जास्तीत जास्त चाचण्या आणि आयसोलेशनच्या माध्यमातूनच करोनाच्या साथीवर नियंत्रण मिळवता येईल’ असे फडणवीस यांनी सांगितले.

 

News English Summary: Lockdown unlock can no longer fall into this. Now you have to unlock. Fighting the Corona will have to consider rehabilitating the economy. Plans should be made to get the economy back on track. However, the state’s opposition leader Devendra Fadnavis criticized the Thackeray government saying that the government does not seem to have such an idea.

News English Title: Now Time Comes To Take Some Bold Decisions Devendra Fadnavis News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x