26 April 2024 6:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

बिहार निवडणूक येताच महाराष्ट्राच्या बदनामीचे कारस्थान | पण ते यशस्वी होणार नाहीत

NCP MLA Rohit Pawar, Bihar Assembly Election 2020, Marathi News ABP Maza

मुंबई, १४ सप्टेंबर : भारतीय जनता पक्ष बिहार विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे आणि त्यासाठी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सुद्धा बिहारच्या दौऱ्यावर गेले आहेत. सध्या राज्यातील वातावरण कंगना रानौतच्या विवादित मुद्यावरून ढवळून निघालं आहे. प्रसार माध्यमांवर देखील कंगना प्रत्येक मिनिटाला ट्विट करून महाराष्ट्रात वाद कायम ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र मागील काही दिवसांपासून विरोधक म्हणजे भाजप केवळ बिहार निवडणुकीसाठी सुशांत आणि कंगनाचा मुद्दा उचलून महाराष्ट्राला बदनाम करत असल्याचा आरोप करण्यात येतो आहे. त्यालाच अनुसरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपाला लक्ष केलं आहे.

“बिहार निवडणुकीत आपल्या पक्षाला फायदा होण्यासाठीच महाराष्ट्राला दूषणे दिली जात आहेत अस दिसतंय परंतु आपली जनता सुज्ञ आहे, विरोधकांचा ‘पॅटर्न’ सर्वांच्या लक्षात आलेला आहे. पीडितांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्य सरकारवर गोळ्या चालवण्याच काम विरोधकांनी बंद करावं, महाराष्ट्रात त्यांचा हा ‘पॅटर्न’ कधीच यशस्वी होणार नाही” असं देखील रोहित पवार यांनी म्हटलं आहे. सोशल मीडियावरून रोहित पवार यांनी याबाबतची पोस्ट शेअर केली आहे.

“धर्मा पाटील या शेतकरी आजोबांना भाजप सरकारच्या काळात आपल्याला न्याय मिळत नसल्यामुळे मंत्रालयात आत्महत्या करावी लागली. हे एक उदाहरण झालं, आज सुद्धा बिहार, उत्तरप्रदेश या भाजपशासित राज्यात बलात्कार,खून सारखे गुन्हे दिवसाढवळ्या घडत आहेत,सरकार विरोधात बोलणाऱ्या पत्रकारांना गाडीखाली चिरडून मारलं जात आहे. अशा वेळी पीडितांना न्याय देण्याची साधी मागणी न करणारे भाजपचे नेते, कार्यकर्ते महाराष्ट्रात मात्र आक्रमक होतात. आपलं महाविकास आघाडी सरकार हे न्यायाच्या बाजूने उभा राहणार सरकार आहे, मात्र काही लोकांचा दुर्दैवाने पीडितांना न्याय मिळवून देण्याऐवजी त्यांचा उपयोग करून हे सरकार डळमळीत करण्यात रस आहे. सुशांतसिंग राजपूत प्रकरण असो किंवा नागरिकाला झालेली मारहाण या प्रकरणात महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांनी योग्य ती कारवाई सुरू केलेली आहे.”

 

News English Summary: For the past few days, the opposition has been accused of defaming Maharashtra by raising the issue of Sushant and Kangana only for the Bihar assembly elections 2020. Following that, NCP MLA Rohit Pawar has turned his attention to BJP.

News English Title: NCP MLA Rohit Pawar slams BJP over Bihar Assembly Election 2020 politics Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#RohitPawar(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x