26 April 2024 4:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Gold Rate Today Pune | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार
x

Facebook India | पब्लिक पॉलिसी विभागप्रमुख अंखी दास यांचा राजीनामा

Facebook India head, Public policy Ankhi Das, quits Facebook

नवी दिल्ली, २७ ऑक्टोबर: फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या भारतातील पब्लिक पॉलिसी विभागाच्या प्रमुख अंखी दास यांनी राजीनामा दिला आहे. अंखी दास या ऑक्टोबर २०११ पासून फेसबुक इंडियासाठी काम करत होत्या. फेसबुकच्या आधी त्या भारतातील मायक्रोसॉफ्टमध्ये पब्लिक पॉलिसी हेड होत्या. जानेवारी २००४ मध्ये त्या मायक्रोसॉफ्टमध्ये रुजू झाल्या होत्या.

मुंबईवरच्या हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण झाली तेव्हा अंखी दास यांचा एक लेख प्रसिद्ध झाला होता ज्याचं नाव होतं No Platform For Violence. हा लेख इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झाला होता. कट्टरतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या १ लाख ४० हजार पोस्ट आम्ही फेसबुकवरुन हटवल्याचं त्यांनी या लेखात म्हटलं होतं. त्यांच्या या लेखामुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या.

अंखी आता चर्चेत का?
हे जाणून घेण्यासाठी आधी अंखी दास यांनी इंडियन एक्सप्रेसमध्ये छापलेल्या एका लेखाची चर्चा करायला हवी.

मुंबईवरील हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण झाली तेव्हा म्हणजेच 24 नोव्हेंबर 2018 ला अंखी दास यांचा लेख प्रसिद्ध झाला होता. त्याचं शीर्षक होतं- No Platform For Violence. त्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं, “कट्टरतावादाला प्रोत्साहन देणाऱ्या लोकांना आपला वापर करू न देण्याबद्दल फेसबुक कटिबद्ध आहे.” या वर्षभरात आम्ही 1 लाख 40 हजार गोष्टी हटवल्या आहेत, ज्यामध्ये कट्टरतावादाशी संबंधित गोष्टी होत्या.

या लेखात त्यांनी म्हटलं होतं की, फेसबुककडे तज्ज्ञांची एक टीम आहे. यामध्ये माजी सरकारी वकील, कायदेतज्ज्ञ, कट्टरतावाद विरोधी संशोधक, बुद्धिजीवी सहभागी आहेत. त्याचबरोबर जिथे कट्टरतावादी कारवाया चालतात अशा केंद्रातील भाषा समजणारे लोकही आहेत.

एकूणच त्यांच्या लेखाचा सूर असा होता, की फेसबुक कट्टरतावादाशी संबंधित गोष्टींचा प्रचार-प्रसार करणाऱ्या गोष्टी पकडण्याबद्दल अतिशय सजग आहे आणि त्यावर त्यांचं प्रभावी नियंत्रणही आहे. सध्या जो वाद सुरू आहे त्याच्या केंद्रस्थानी हाच मुद्दा आहे- भारतात फेसबुकवर काही द्वेष पसरवणाऱ्या गोष्टी प्रसिद्ध झाल्या, मात्र अंखी दास यांनी त्या हटवण्यास विरोध केल्याची चर्चा आहे.

 

News English Summary: Facebook executive Ankhi Das, whose name came up in a recent controversy over alleged bias by the social networking giant in dealing with hate speeches, has resigned from the company. A statement by Ajit Mohan, Facebook India’s Managing Director, said: “Ankhi has decided to step down from her role in Facebook to pursue her interest in public service. Ankhi was one of our earliest employees in India and played an instrumental role in the growth of the company and its services over the last nine years.

News English Title: Facebook India head of public policy Ankhi Das quits says company News Updates.

हॅशटॅग्स

#facebook(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x